शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावच्या मदतीला जागतिक बँक धावली

By admin | Updated: June 5, 2015 00:14 IST

30 कोटींच्या आराखड्यास मंजूरी : नव्या पाणी योजनेसह घनकचरा निर्मूलन व सांडपाणी प्रकल्पासाठी निधीची तरतूद

कोरेगाव : कोरेगाव शहराला पुढील २५ वर्षातील लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेऊन नव्या पाणी योजनेसह घनकचरा निर्मूलन व सांडपाणी प्रकल्पासाठी सुमारे ३० कोटी रुपयांच्या सुधारीत आराखड्यास मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती नगर विकास कृती समितीचे संघटक राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे व संतोष नलावडे यांनी दिली.शहरातील अपुरा पाणी पुरवठा, कचऱ्याचे साम्राज्य आणि सांडपाणी समस्या सोडविण्यासाठी नगर विकास कृती समितीने जलसंपदा मंत्री असताना आ. शशिकांत शिंदे यांना आॅगस्ट २०१४ मध्ये एक निवेदन सादर केले होते. कृती समितीने तीळगंगा नदी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती देत या कामाला भासणारी निधीची कमतरता व पुढील २५ वर्षात वाढणाऱ्या समस्यांचा एक अहवाल आ. शिंदे यांना दिला होता, त्यानुसार आ. शिंदे यांनी तातडीने जलसंपदा विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करुन कोरेगावसाठी नवीन पाणी योजना उभारता येईल काय याबाबत सूचना दिल्या होत्या.त्याच दरम्यान जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव मागणीला काही दिवस उरलेले होते. नगर विकास कृती समितीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ६ सप्टेंबर २०१४ रोजी आ. शिंदे यांच्या शिफारसीने जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कोरेगावचा समावेश होण्यासाठी समितीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जिल्हा परिषदेकडे केली होती. याकामी अधिकारी कोळी, प्रकल्प प्रमुख पी. डी. भोसले, राजेंद्र बर्गे यांनी तातडीने प्रस्ताव तयार करुन त्यास मंजुरी मिळवली. नव्या ४.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या या पाणी योजनेमध्ये नव्या उपसा विहीरीसह जलवाहिन्या, पंपगृह, उच्च अश्वशक्तीची पंप मशिनरी, दाबनलीका, २.५ दशलक्ष लिटर क्षमेतेचे पाणी शुध्दीकरण केंद्र, रेल्वेस्टेशन परिसर, जुन्या गावठाण परिसर व दत्त नगर या तीन ठिकाणी उंच पाणी साठवण टाक्या व अत्याधुनिक वितरण व्यवस्थेसाठी सुमारे ११. ४३ कोटी रुपयांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. या नव्या योजनेमुळे प्रतीमाणसी १३५ लिटर पाणी उपलब्ध होणार असून या संपूर्ण प्रकल्पासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे.तीन्ही नव्या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी बुधवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच विद्या येवले, उपसरपंच मंदा बर्गे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी प्रायमो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे अधिकारी राहुल कुंभार, जलस्वराज्य प्रकल्पाचे अधिकारी पी. डी. भोसले, राजेंद्र बर्गे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. (प्रतिनिधी)अत्याधुनिक घनकचरा निर्मुलन प्रकल्प लवकरचसंपूर्ण शहरात भुयारी गटर योजना कार्यान्वित करुन सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पही उभारण्यात येणार असून शहरातील सर्व सांडपाणी तीळगंगा नदी पात्रास मिसळत असते, त्या पाण्यावर सहा ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, तर शहराला मोठ्या प्रमाणात भेडसावणाऱ्या कचरा समस्येवर मात करण्यासाठी अत्याधुनिक घनकचरा निमूर्लन प्रकल्प उभारण्यात येणार असून सुमारे अडीच एकर जागेत होणाऱ्या या प्रकल्पामुळे कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी १८.८९ कोटींचा खर्च अपेक्षीत असून या प्रकल्पासाठीही जागतिक बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे.