जयसिंगपूर : आधुनिक महाराष्ट्राच्या जडण घडणीमध्ये कामगारांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळेच स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर भारतातील अव्वल क्रमांकाचे राज्य म्हणून ख्याती प्रास्त झालेली आहे, अशीच प्रगती भावी काळात होण्यासाठी सर्वांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले.तमदलगे (ता. शिरोळ) येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर महाराष्ट्र दिन व कामगार दिन तसेच शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल कांबळे-माणगांवकर होते. कांबळे म्हणाले, सर्व कामगार वर्गांनी संस्थेशी प्रामाणिक राहून संस्थेच्या प्रगती बरोबरच स्वत:चा व्यक्तीगत विकास करावा तरच महाराष्ट्र बलशाली होईल, छ. शिवरायांनी दिलेला स्वाभिमानाचा विचार आत्मसात करावा.प्रारंभी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण व छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन दलितमित्र अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत जी. आर. माने यांनी केले. यावेळी पिरगोंडा पाटील, सागर माने, विवेक कुलकर्णी, शेषगोंडा पाटील, डी. जी. रजपूत, संतोष कदम, एन. बी. पिष्टे, मिलींद रावण, वडेकर, राहूल भापकर, शितल अडसुळे, सुहास राजमाने, विनोद सुतार, नायकु माने, पोपट चौगुले, लालन चव्हाण, संतोष शिंदे, जगदिश जाधव, जितेंद्र कांबळे यांच्यासह सभासद, कामगार उपस्थित होते. संचालक वैभव पाटील यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान मोलाचे : अशोकराव माने
By admin | Updated: May 3, 2014 14:39 IST