शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वांग-मराठवाडी धरणाचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:13 IST

ढेबेवाडी : सातारा जिल्हा प्रशासनाने वांग-मराठवाडी धरणग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ...

ढेबेवाडी : सातारा जिल्हा प्रशासनाने वांग-मराठवाडी धरणग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या धरणग्रस्तांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत धरणाचे काम बंद पाडले.गेल्या वीस वर्षांपासून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अर्धवट लोंबकळत आहे व गेल्या वीस वर्षांपासूनच हे धरणग्रस्त जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेला कंटाळले आहेत तर जबाबदारी टाळून टंगळ मंगळ करणे या प्रवृत्तीवर गेल्या महिनाभरापासून वांग-मराठवाडी धरणग्रस्तांमध्ये संतप्त व नाराजीचा सूर आहे. मात्र जिल्हा प्रशासनावर याचा काहीही फरक पडक नाही तसेच धरणाचे काम मात्र वेगाने उरकून घेण्याची कुटीलनिती प्रशासनाने आखली आहे, असा आरोप करून वांग-मराठवाडी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुनील मोहिते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी धरणस्थळी जाऊन आंदोलन केले. यावेळी प्रतापराव मोहिते, सुरेश पवार, आनंदराव मोहिते, नाना देसाई, लक्ष्मण पवार, गणपत मोहिते यांच्यासह पदाधिकारी, धरणग्रस्त उपस्थित होते.उमरकांचन वर सरकून गावठाणात आवश्यक भूखंड पाडून सर्व नागरी सुविधायुक्त गावठाण तयार करून भूखंडांचा ताबा द्या, कमी पडणारी जमीन शासनाने उपलब्ध करून घ्यावी आणि तिथे भूखंड पाडून सुविधा निर्माण करा व ताबा द्या, ताईगडेवाडी गावठाणातील अडथळे असलेल्या जमिनीवरील अडथळे ताबडतोब दूर करून जमिनीचा ताबा द्या, ज्यांना जमीन देय आहे; पण जमिनी उपलब्ध नाहीत त्यांना २०१३ च्या पुनर्वसन नियमाला अनुसरून बागायती क्षेत्र जमिनीच्या दराप्रमाणे मोबदला द्या, कारण जमिनी उपलब्ध आहेत, असे सांगून धरणग्रस्तांना स्थलांतरित केले व नंतर जमिनी नाहीत म्हणता म्हणजे आमची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे हा कायदा आम्हाला लागू होतो.संकलनाचा घोळ जिल्हा पुनर्वसन विभागाने निर्माण केला आहे; पण आम्ही त्याला फसणार नाही. २००७ च्या जीआर प्रमाणेच पुनर्वसितांना जमिनी वा मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी जे काय करायचे ते पुनर्वसन अधिकारी व जिल्हाधिकाºयांनी निस्तरावे; पण त्याप्रमाणेच वाटप झाले पाहिजे. यासह अनेक मागण्या आहेत. त्या सोडविण्यात पुनर्वसन विभाग, महसूल यंत्रणा व कृष्णाखोरे घोळ घालीत आहेत. त्यांनी तो घोळ संपवून तातडीने मागण्या पूर्ण कराव्या. नंतरच धरणाचे काम सुरू करावे, अन्यथा वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, याची नोंद घ्यावी, असा इशाराही संघटनेने दिला आहे.धरणग्रस्त संग्राम संघटनेचाही पाठिंबाजिल्हा प्रशासनाचे धरणग्रस्तांबाबत चुकीचे धोरण आहे. सर्व धरणग्रस्तांना विश्वासात घेऊन जिल्हाधिकाºयांनी एकही बैठक घेतली नाही. संकलनाचा घोळ कायम आहे. मग प्रशासन धरणाच्या कामाची घाई का करत आहे? असा प्रश्न करत काम बंद आंदोलनाला आमचा ही पाठिंबा आहे, असे संघटनेचे दिलीप पाटील यांनी यावेळी सांगितले.