शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

रहिमतपूरचा पंधरा वायरमनांवर ३७ जणांच्या कामाचा लोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:54 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे.

ठळक मुद्देउपविभाग कार्यालयातील प्रकार : उपकार्यकारी अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंत्यांचे पदही रिक्त

रहिमतपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वायरमन तणावाखाली कामकाज करत आहेत. दरम्यान, उपविभागाचे प्रमुख असलेले उपकार्यकारी अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंत्यांचे पदही सुमारे वर्षभरापासून रिक्त आहे. त्यामुळे अतिरिक्त कामकाज पाहणारे कर्मचारीही ‘हाय होल्टेज’ तणावाखाली आहेत.

वीज वितरणच्या रहिमतपूर उपविभाग कार्यालयांतर्गत परिसरातील सुमारे ४१ गावांत कामकाज चालते. घरगुती वीज कनेक्शन, शेतीपंप वीज कनेक्शन यासह आदी विविध काम दररोज नियमितपणे सुरू असतात. याबरोबरच पावसामुळे, अपघातामुळे तसेच काही कारणामुळे नादुरुस्त झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम कर्मचारी करत असतात. रहिमतपूर शहरासह परिसरातील ४१ गावांतील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वायरमन तांत्रिक कर्मचारी यांची संख्या पुरेशी असणे गरजेचे असते. मात्र अत्यंत अल्प कर्मचाऱ्यांच्या बळावर सध्या हे कामकाज सुरू आहे.

रहिमतपूर शहर परिसरासाठी १७ वायरमनची पदे मंजूर आहेत. मात्र सध्या केवळ ४ वायरमन उपलब्ध असून, १७ पदे रिक्त आहेत. रहिमतपूर ग्रामीण परिसरासाठी १३ वायरमनची पदे मंजूर आहेत. मात्र ५ वायरमन उपलब्ध असून, ८ पदे रिक्त आहेत. वाठार किरोली परिसरासाठी वायरमनची ११ पदे मंजूर असून, केवळ २ वायरमन उपलब्ध आहेत. या ठिकाणी ९ पदे रिक्त आहेत. तारगाव परिसरासाठी वायरमनची ११ पदे मंजूर आहेत. मात्र ४ वायरमन उपलब्ध असून, ७ पदे रिक्त आहेत.उपविभागात उपलब्ध असलेल्या पंधरा वायरमनच्या अंगावर ३७ वायरमनच्या कामाचा लोड दिला आहे. अतिरिक्त कामाच्या लोडमुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत आहेत.

अनेकदा अपुºया कर्मचाºयांच्या संख्येमुळे ज्या ठिकाणी दोन कर्मचाºयांची गरज आहे. त्या ठिकाणी धोका पत्करून एकच कर्मचारी काम करताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी सचिन फाळके नावाचे वायरमन यांचा शॉक लागून मृत्यू झाला. विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करताना कर्मचाºयाचा जीव वाचला असता. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून वीज वितरणच्या अधिकाºयांनी तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी कर्मचाºयांसह नागरिकांतून होत आहे.रिक्त जागा भरणे गरजेचे ....रहिमतपूर उपविभाग कार्यालयाचे प्रमुख असलेले उपकार्यकारी अभियंता पद गेल्या सात महिन्यांपासून रिक्त आहे. सहायक अभियंता यांच्याकडे उपकार्यकारी अभियंता म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दोन टेबलची कामे करावी लागत आहेत. कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या कामासह रहिमतपूर ग्रामीण शाखेचे पूर्ण कामकाज पाहावे लागत आहे. हे पद सप्टेंबर २०१६ पासून रिक्त आहे. तसेच वाठार किरोली येथील गुण नियंत्रण कक्षाची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांवर देण्यात आली आहे. त्यांनाही अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. जिल्हा कार्यालयाकडे या रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्यात, अशी अनेकदा मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण