शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

जिल्ह्यात मानवी विकासाबाबतचे काम समाधानकारक : जलाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:55 IST

सातारा : ‘जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अतिशय चांगले असून आरोग्य, अन्न सुरक्षा, मनरेगा, अंगणवाडी याबाबतीतही उल्लेखनीय काम करून मानवी विकासाबाबत चांगले काम झाले आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या जलाजा यांनी काढले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी ...

ठळक मुद्देआढावा बैठक : जिल्ह्यात शासकीय यंत्रणांच्या कामाचे कौतुकजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा

सातारा : ‘जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अतिशय चांगले असून आरोग्य, अन्न सुरक्षा, मनरेगा, अंगणवाडी याबाबतीतही उल्लेखनीय काम करून मानवी विकासाबाबत चांगले काम झाले आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या जलाजा यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या, ‘माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांचा काही भाग अवर्षण प्रवण क्षेत्र असल्याने पाण्याचे दुर्भीक्ष हा नेहमीचाच प्रश्न होता; पण गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

अंगणवाडीतील पोषण आहार, कुपोषण निर्मूलनासाठी उपयुक्त असून, त्यासाठी अधिकाधिक लहान मुलांना अंगणवाडीत येण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सातारा हा राज्यातील पहिला हागणदारी मुक्त जिल्हा असून, आता घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणार आहे.’‘जिल्हा प्राथमिक शिक्षणात राज्यात दुसºया क्रमांकावर असून, आम्ही शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपाय अवलंबले आहे,’ अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.जलजा म्हणाल्या, ‘स्त्री-पुरुष जन्मदराचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आणि शहरात कमी आहे त्यावर उपाय करावेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी पंचायत समिती स्तरावर लक्ष द्यावे.’गुन्हे निकालाचे प्रमाण ४२ टक्केजिल्ह्यात तीस पोलिस ठाणे, अठरा आऊटपोस्ट आहेत. जिल्ह्यातील गुन्हे निकाली काढण्याचे प्रमाण ४२ टक्के आहे. महिलांच्या सुरक्षतेसाठी निर्भया पथक, प्रतिसाद पथक सुरू करण्यात आले आहे. यामुळे गुन्हे मोठ्या प्रमाणात आटोक्यात आले आहेत,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.