शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जिल्ह्यात मानवी विकासाबाबतचे काम समाधानकारक : जलाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:55 IST

सातारा : ‘जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अतिशय चांगले असून आरोग्य, अन्न सुरक्षा, मनरेगा, अंगणवाडी याबाबतीतही उल्लेखनीय काम करून मानवी विकासाबाबत चांगले काम झाले आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या जलाजा यांनी काढले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी ...

ठळक मुद्देआढावा बैठक : जिल्ह्यात शासकीय यंत्रणांच्या कामाचे कौतुकजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा

सातारा : ‘जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अतिशय चांगले असून आरोग्य, अन्न सुरक्षा, मनरेगा, अंगणवाडी याबाबतीतही उल्लेखनीय काम करून मानवी विकासाबाबत चांगले काम झाले आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या जलाजा यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या, ‘माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांचा काही भाग अवर्षण प्रवण क्षेत्र असल्याने पाण्याचे दुर्भीक्ष हा नेहमीचाच प्रश्न होता; पण गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

अंगणवाडीतील पोषण आहार, कुपोषण निर्मूलनासाठी उपयुक्त असून, त्यासाठी अधिकाधिक लहान मुलांना अंगणवाडीत येण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सातारा हा राज्यातील पहिला हागणदारी मुक्त जिल्हा असून, आता घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणार आहे.’‘जिल्हा प्राथमिक शिक्षणात राज्यात दुसºया क्रमांकावर असून, आम्ही शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपाय अवलंबले आहे,’ अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.जलजा म्हणाल्या, ‘स्त्री-पुरुष जन्मदराचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आणि शहरात कमी आहे त्यावर उपाय करावेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी पंचायत समिती स्तरावर लक्ष द्यावे.’गुन्हे निकालाचे प्रमाण ४२ टक्केजिल्ह्यात तीस पोलिस ठाणे, अठरा आऊटपोस्ट आहेत. जिल्ह्यातील गुन्हे निकाली काढण्याचे प्रमाण ४२ टक्के आहे. महिलांच्या सुरक्षतेसाठी निर्भया पथक, प्रतिसाद पथक सुरू करण्यात आले आहे. यामुळे गुन्हे मोठ्या प्रमाणात आटोक्यात आले आहेत,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.