शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

इंधनाचे वाढतायत दाम अन् करावे लागतेय मिळेल ते काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:47 IST

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय अडचणीत आले. याची झळ आता रिक्षाचालकांना देखील बसू लागली ...

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय अडचणीत आले. याची झळ आता रिक्षाचालकांना देखील बसू लागली आहे. महागाईबरोबरच इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रिक्षाचालकांना जोड व्यवसाय करून कुटुंबाची गाडी चालवावी लागत आहे.

सातारा जिल्ह्यातील रिक्षाचालकांची संख्या सात हजारांच्या घरात आहे. बहुतांश रिक्षाचालकांचे रिक्षा हेच उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. काही दिवसांपूर्वी रिक्षा व्यवसाय प्रतिष्ठेचा मानला जात होता. त्यातून उत्पन्नही चांगले मिळत होते. मात्र, स्पर्धा वाढल्याने हळू-हळू रिक्षा व्यवसाय अडचणीत आला अन् अनेकांनी रिक्षा ऐवजी नोकरी व व्यवसाय सुरू केला. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हा रिक्षा व्यवसाय पूर्णत: डबघाईला आहे. सात ते आठ महिने रिक्षा बंद असल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला.

अनेक रिक्षाचालकांनी बॅँका, पतसंस्थांकडून कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केल्या. कर्जाचे हप्ते वेळेत अदा न झाल्याने अनेकांना रिक्षा विकावी लागली. पूर्वीप्रमाणे उत्पन्न मिळत नसल्याने आता अनेकांनी जोड व्यवसाय सुरू केला आहे. कोणी हॉटेलमध्ये नोकरी करत आहे. कोणी दूध विक्री तर कोणी भाजी विक्रीचा व्यवसाय सांभाळून रात्रीच्या वेळी रिक्षा चालवत आहेत. काहीजण दिवसभर मिळेल ते काम करून त्यानंतर रिक्षा चालवत आहेत. एकूणच रिक्षाचालकांची अवस्था कोरोनानंतर अधिकच बिकट झाली आहे.

(चौकट)

दरवाढीचा परिणाम

गेल्या तीन-चार महिन्यांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहे. त्यात प्रवाशांच्या क्षमतेवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. वाढीव भाडे देण्यास ग्राहक तयार होत नाहीत. त्यामुळे अनेकांनी रिक्षा चालविणेच बंद केले आहे.

(चौकट)

पैसा उरत नसल्याने करावे लागते इतर काम

रिक्षा व्यवसाय पूर्वीसारखा राहिला नाही. पूर्वी खर्चवजा करता तीनशे ते चारशे रुपयांचा नफा मिळत होता. आता तो शंभर-दोनशे रुपयांवर आला आहे. एवढ्या पैशांंत घरखर्च चालविणे जिकीरीचे बनत असल्याने रिक्षाचालकांना मिळेत ते काम करून कुटुंब चालवावे लागत आहे.

(चौकट)

जिल्ह्यातील एकूण रिक्षा

पेट्रोल रिक्षा ४५००

डिझेल रिक्षा २५

एलपीजी रिक्षा २४००

(चौकट)

पेट्रोल-डिझेलचे दर (प्रति लिटर)

डिसेंबर - पेट्रोल ९०.९७

डिझेल ७९.९१

जानेवारी - पेट्रोल ९१.९४

डिझेल ८०.९७

फेब्रुवारी - पेट्रोल ९५.९७

डिझेल ८५.५२

(कोट)

कोरोनामुळे रिक्षाचालकांना मोठा आर्थिक फटका बसला. सलग आठ महिने व्यवसाय बंद असल्याने आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर दिलासा मिळेल असे वाटत असताना इंंधनाचे दर वाढल्याने व्यवसायावर परिणाम झाला. उत्पन्न मिळत नसल्याने मी हॉटेलमध्ये काम करून वेळेनुसार रिक्षा चालवितो.

- मुश्ताक शेख, रिक्षाचालक

(कोट)

महामागाईची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे. रिक्षा व्यवसायिकांची देखील यातून सुटका झालेली नाही. पेट्रोल, डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची संंख्याही कमी झाली आहे. मी आता आचारी म्हणून काम करत आहे. जेव्हा जेवण बनविण्याचे काम नसते तेव्हाच रिक्षा चालवितो.

- नजीर बागवान, रिक्षाचालक

(कोट)

लॉकडाऊनच्या कालावधीत रिक्षाचालकांचे प्रचंड नुकसान झाले. कुटुंबांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी आम्हाला मिळेल ते काम करावे लागले. महागाई व इंधन दरवाढीचा फटका सातत्याने या व्यवसायाला बसत आहे. आम्हाला रिक्षावर घरखर्च चालविणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे वेळोवेळी मिळेल ते काम आम्ही करतो.

- अभिजित रणभिसे, शनिवार पेठ

फोटो : १६ रिक्षा ०१/०२

फोटो : १६ मुश्ताक शेख

१६ नजीर बागवान

१६ अभिजित रणभिसे