शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कोरेगाव तालुक्यातील कोरोना समित्यांचे काम असमाधानकारक : संजय साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:40 IST

वाठार स्टेशन : ‘गतवर्षी जिल्ह्यात कोरोना रोखण्यात कोरेगाव तालुक्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र चालूवर्षी गावपातळीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार ...

वाठार स्टेशन : ‘गतवर्षी जिल्ह्यात कोरोना रोखण्यात कोरेगाव तालुक्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र चालूवर्षी गावपातळीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार नेमलेल्या ग्रामस्तरीय कमिट्या या कामात सक्रिय राहिल्या नसल्याने कोरेगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे, अशी खंत कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे यांनी व्यक्त केली.

राज्यभर कोरोना महामारीचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. गावच्या गाव एकाचवेळी बाधित होत आहेत. यासाठी सरकार सर्वतोपरी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत असूनही रुग्ण संख्या घटत नसल्याने सध्या राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. शहराबरोबरीने गावातही दररोज रुग्ण वाढत आहेत. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांची गावागावात ग्रामस्तरीय कमिटी नेमण्यात आली आहे. या कमिट्यांना याबाबतीत अधिकार दिले आहेत. मात्र जे काम गतवर्षी या समितीने केले ते चालूवर्षी दिसून येत नसल्याने कोरोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.

अनेक गावात याबाबत चांगले काम दिसत असलेतरी गेल्यावर्षी ज्या गावांनी अनेक दिवस कोरोना वेशीवरच रोखला, या गावात चालूवर्षी कोरोना बाधित रुग्ण वाढ झालेली दिसत आहे. याबाबत ग्रामस्तरीय समित्यांना प्रशासनाने योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.