शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

सभेपुढे विषय न येताच होत आहेत कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:36 IST

ओगलेवाडी : हजारमाची ता.कऱ्हाड ग्रामपंचायतीतील सत्ताधारी हे विरोधी सदस्यांना विश्वासात न घेता व सभेपुढे विषय न घेताच, मनमानी पद्धतीने ...

ओगलेवाडी : हजारमाची ता.कऱ्हाड ग्रामपंचायतीतील सत्ताधारी हे विरोधी सदस्यांना विश्वासात न घेता व सभेपुढे विषय न घेताच, मनमानी पद्धतीने कामे करीत आहेत. सभा सुरू असताना इतिवृत्त लिहिण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश असतानाही ग्रामसेवक टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे बुधवारी विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असल्याची माहिती सदस्य शरद कदम यांनी दिली.

हजारमाची ग्रामपंचायतीतील सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारीशाहीची माहिती देण्यासाठी विरोधी सदस्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सदस्य शरद कदम, पितांबर गुरव, विनोद डुबल, संगीता डुबल, सारिका लिमकर, ऐश्वर्या वाघमारे, जयश्री पवार, ॲड.चंद्रकांत कदम, ॲड.दादासाहेब जाधव, नंदकुमार डुबल, बबनराव पवार, कुमार इंगळे, बाबासाहेब पावार, जयवंत वीरकायदे, सतीश पवार, राजू काटवटे आदींची उपस्थिती होती.

शरद कदम म्हणाले, ‘ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामांची नियमाप्रमाणे सभेत चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, असे न होता, सभेत केवळ पाच ते सहा विषय होतात. सभेनंतर सत्ताधारी हवे ते ठराव इतिवृत्तात घुसडतात, तसेच तीन लाखांच्या पुढच्या कामांचे टेंडर काढणे गरजेचे असतानाही नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे विरोधी सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सभा सुरू असताना, इतिवृत्त लिहिण्याची मागणी केली होती. त्यानुसार, गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना तसे आदेश दिले होते. मात्र, बुधवारी झालेल्या सभेत त्याच वेळी इतिवृत्त लिहिण्यास ग्रामसेवकांनी असमर्थता दर्शविल्याने उपस्थित असलेल्या विरोधी सात सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर, केवळ सहा सत्ताधारी सदस्य असताना व कोरम पूर्ण नसतानाही सभा घेण्यात आली.

संगीता डुबल म्हणाल्या, ‘ग्रामपंचायतीत सरपंचाचे दीर, उपसरपंच व ग्रामसेवकच मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत. विरोधी दूरच सत्ताधारी सदस्यांनाही अनेक गोष्टींची कल्पना नसते. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी सदस्यांच्या मागणीची दखल घेतली जात नाही.’

शरद कदम म्हणाले, ‘ग्रामपंचायतीच्या करवसुलीचे नियोजन नसल्याने सत्ताधारी सर्व कामे पंधराव्या वित्त आयोगातून करण्यात येत आहेत. सध्या पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ऐंशी लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. आराखड्याबाहेरील कामांना परवानगी नसतानाही पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे खर्च करण्यात येत आहेत.’

चौकट

न केलेल्या कामांचेही श्रेय घेण्यासाठी आटापिटा

गेल्या पंचवार्षिकमध्ये मंजूर झालेल्या कामांचे नारळही सत्ताधारी फोडत असल्याचा आरोप माजी सरपंच सतीश पवार यांनी केला. इंदिरानगर व राजारामनगर येथील काँक्रिट रस्ता व गटर गेल्या पंचवार्षिकमध्ये मंजूर झाले असताना, गुरुवारी सत्ताधाऱ्यांनी या कामाचे नारळ फोडण्याचा घाट घातला आहे. मात्र, या कामांची वर्कऑर्डर मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या हस्ते शुभारंभ करणार असल्याचे सतीश पवार यांनी सांगितले

चौकट 2

विरोधी सदस्यांच्या मताचाही आदर करणार

‘विरोधी सदस्यांच्या लोकहिताच्या सर्व प्रस्तावांना मान देऊन तेही मंजूर करणार आहे, परंतु त्यांनी सभेला पूर्ण वेळ हजर राहून सहकार्य करावे. हजारमाची गावाचे लोकहिताच्या प्रश्नासाठी सर्व जण मिळून काम करू यात,’ असे मत उपसरपंच प्रशांत यादव यांनी व्यक्त केले.