शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विसापुरात २२५ हेक्टरवर काम पूर्ण...

By admin | Updated: January 4, 2016 00:33 IST

जितेंद्र शिंदे : पाण्याबाबत गाव लवकरच स्वयंपूर्ण होणार

पुसेगाव : ‘विसापूर ग्रामस्थांनी लोकसहभाग व शासनाने उपलब्ध करून दिलेल्या पोकलेन मशीनद्वारे सुमारे २२५ हेक्टर क्षेत्रावर डीप सीसीटीचे काम पूर्ण केले. या कामामुळे पावसाचे पाणी जमिनीत अडविले जाणार असून, भूगर्भातील पाणी पातळीत चांगलीच वाढ होणार आहे. विसापूर हे लवकरच पाण्यामध्ये स्वयंपूर्ण होईल,’ असा विश्वास जिल्हा कृषी अधिक्षक जितेंद्र शिंदे यांनी व्यक्त केला.विसापूर, ता. खटाव येथे नादुरुस्त असलेल्या दगडी सिमेंट बंधारे व डीप सीसीटी पाहणीदरम्यान ते बोलत होते. उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठलराव भुजबळ, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, कोरेगाव तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, सरपंच सागर साळुंखे, उपसरपंच शोभा शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र साळुंखे, रेवलकरवाडीचे उपसरपंच आनंदराव बिटले, ग्रामविकास अधिकारी एस. एस. पवार, मंडल कृषी अधिकारी हेमंत भोंगळे, आर. एन. देशमुख, एस. के. पाटणे, एस. के. जगदाळे, एन. टी. कोळेकर, के. व्ही काळे, टी. एम. सूळ, एच. बी. भोसले, सयाजी सावंत, सुहास साळुंखे, संतोष साळुंखे, नीलेश साळुंखे उपस्थित होते. कृषी अधीक्षक शिंदे म्हणाले, ‘विसापूर पंचक्रोशीला तिन्ही बाजूने डोंगर, दोन मोठे ओेढे व पोटनाले ही फार मोठी नैसर्गिक संपत्ती लाभलेली आहे. विसापूरचा ‘जलयुक्त शिवार’ अभियानामध्ये समावश आहे. या अभियानाच्या माध्यमातून विसापूर ग्रामस्थांनी अत्यंत नियोजनबद्ध पायथा ते माथा दिशेने डीप सीसीटीचे काम सुरू केले आहे. डीप सीसीटीमुळे पावसाच्या पाण्याचा गढूळ पूर येण्याच्या ऐवजी ते पाणी जमिनीत मुरले जाईल. त्यानंतरच स्वच्छ पाण्याचा ओढ्यांना पूर येईल. जमिनीची होणारी धूपही पूर्णत: थांबेल. काढलेल्या डीप सीसीटीच्या मातीबांधावरती सीताफळ, आवळा फळबाग लागवड करावी. त्यासाठी अनुदान दिले जाईल.’ (वार्ताहर)