शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

दिला शब्द नेत्यांनी; अर्ज घेतला माघारी !

By admin | Updated: July 24, 2015 00:39 IST

ग्रामपंचायत निवडणूक : नाराज उमेदवारांच्या भूमिकेकडे लक्ष

सातारा : जिल्ह्यातील ७११ सार्वत्रिक व १५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. अनेक गावांमध्ये गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांचीही डोकेदुखी वाढली; परंतु नेत्यांचा शब्द पाळून अनेकांनी या निवडणुकीच्या रणांगणातून माघार घेतली असली तरी त्यांच्या मनातील नाराजी मात्र तसीच राहणार आहे. त्यामुळे रणांगणातून परत आलेले उमेदवार काय भूमिका घेणार, हेही या निवडणुकीतील महत्त्वाचे सत्ताकेंद्र ठरणार आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावात गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर असते. काही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीअंतर्गतचे गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने नेतेमंडळींनी स्थानिक कार्यकर्त्यांना समज देत आहेत. दोघांच्या वादात ग्रामपंचायत हातातून निसटेल, असा इशाराही दिला जात आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांना थोपविण्यासाठी नेतेमंडळी साम, दाम, दंड नीतीचा वापर करत आहेत. अशा इच्छुकांनी अर्ज माघारी घेतले तरी त्यांची नाराजी कायम आहे. त्यामुळे नाराज असलेला गट आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कधीही धोका देऊ शकतो, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. गावागावांत रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू झाल्या आहेत. बहुतांश गावांत राष्ट्रवादीविरोधात काँगे्रसचे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेनेनेही ‘करो या मरो’ ची भूमिका घेतली आहे. भाजपकडूनही मोर्चेबांधणी सुरू आहे.माण तालुक्यामध्ये आमदार जयकुमार गोरे, त्यांचे बंधू पंचायत समिती सदस्य शेखर गोरे, माजी आमदार सदाशिव पोळ यांचे गट आक्रमक झाले आहेत. दहिवडी, गोंदवले बु., गोंदवले खु., पिंगळी या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.पाटण तालुक्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मूळगाव असणाऱ्या कुंभारगावातील सत्ता हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, जिल्हा बँकेचे माजी संचालक भगवानराव पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आ. शंभूराज देसाई यांच्या गटाचे डॉ. दिलीप चव्हाण यांनीही तयारी सुरू केली आहे. चिखलेवाडी, जानुगडेवाडी या ग्रामपंचायतींमध्येही मोठी टस्सल होणार आहे. पाटणकर गट अद्यापही सक्रिय नसला तरी आ. शंभूराज देसाई गटाने सत्ता टिकविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जावळीत कुडाळ, रायगाव, बामणोली तर्फ कुडाळ, महिगाव, सायगाव, हुमगाव, दरे खुर्द, वरोशी, करंदी तर्फ कुडाळ, खर्शी या गावांत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, मोहन शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, सुहास गिरी, निर्मला कासुर्डे, संगीता चव्हाण यांचे गट आक्रमक झाले आहेत. फलटणमध्ये कोळकी, निंबोरे, साखरवाडी या प्रमुख ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे गट साखरवाडीत समोरासमोर असणार आहेत.खटावमध्ये पुसेगाव, पुसेसावळी, सिद्धेश्वर कुरोली, कातरखटाव या निवडणुकांकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. चंद्रकांत पाटील, आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे रणजित देशमुख यांचे गट वेगाने कामाला लागले आहेत.खंडाळा तालुक्यात विंग, सांगवी, खंडाळा, भादे, कणेरी या राजकीयदृष्ट्या संवेदनशील ग्रामपंचायतींसाठी राजकीय आखाडा तापला आहे. आमदार मकरंद पाटील, शिवसेनेच्या शारदा जाधव, हणमंतराव साळुंखे, आनंदराव गायकवाड, राजेंद्र नेवसे, बंटी महांगरे, साहेबराव महांगरे यांचे गट वेगाने कामाला लागले आहेत. वाईमध्ये बावधन, पसरणी, उडतारे, बोपेगाव, शिरगाव, अभेपुरी या गावांत सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी)तुमच्या वादात आम्ही पडणार नाही!सातारा तालुक्यातील एका गावातील दोन्ही गटांची मंडळी नेत्यांकडे जाऊन बसली होती. पॅनेलचे नेतृत्व करण्याची विनंती दोन्ही गटांकडून करण्यात आली; पण जो निवडून येईल तो आमचा, असे सूत्र संबंधित नेत्याने दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केले.