शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

शिरवळजवळ टेम्पोखाली चिरडून महिला ठार

By admin | Updated: November 7, 2015 23:41 IST

चार जखमी : महामार्गालगत वाहनांची वाट पाहत थांबणे बेतले जिवावर

शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ हद्दीत मालट्रकने टेम्पोला धडक दिली. त्यानंतर कलंडलेल्या टेम्पोखाली महामार्गाच्या कडेला वाहनाची वाट पाहत बसलेल्या महिला प्रवासी चिरडल्या गेल्या. या विचित्र अपघातात एक महिला जागीच ठार असून, चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पारगाव खंडाळा येथे वर्षापूर्वी झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती शिरवळमध्ये झाली. घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौपाळा, शिरवळ येथील एका कंपनीत कामावर जाण्यासाठी शिरवळ येथील अलका यशवंत गुंजवटे, बिना हरिदास बाला, नीता प्रकाश यादव, सरला प्रभाकर कोळी, सुवर्णा कृष्णदेव भणगे या पाच महिला शिरवळ पोलीस स्टेशनसमोर महामार्गावर वाहनांची वाट पाहत थांबलेल्या होत्या. यावेळी संबंधित महिलांनी हात केल्याने कोल्हापूर बाजूकडे निघालेल्या टेम्पोचा (एमएच ११ एएल ६५२) चालक विकास दुरेकर (३२, रा. फुरसुंगी, ता. हवेली) याने टेम्पोचा वेग कमी केला. दरम्यान, पुण्याहून सातारा बाजूकडे भरधाव निघालेल्या मालट्रकने (एमएच ११ एम ६००७) टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो महामार्गावर उलटल्याने सुमारे पन्नास ते साठ फुटांवर फरफटत जाऊन महामार्गावर थांबलेल्या महिलांंच्या अंगावर गेला. यामध्ये अलका गुंजवटे व सरला कोळी प्रसंगावधान दाखवत बाजूला पळत असताना पडल्याने जखमी झाल्या, तर बिना बाला, नीता यादव, सुवर्णा भणगे या गंभीर जखमी झाल्या. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा कृष्णदेव भणगे (वय ३५, रा. मूळगाव आसगाव, ता. सातारा, सध्या रा. शिर्के कॉलनी, शिरवळ) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेला ट्रकचालक तानाजी प्रल्हाद यादव (३६, रा. अतिट ता. सातारा) याला पंढरपूर फाटा येथे शिरवळ पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडून ताब्यात घेतले. गंभीर जखमींना स्थानिकाच्या मदतीने शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली होती. शिरवळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, हवालदार चंद्रकांत निकम तपास करत आहेत. (प्रतिनिधी) वर्षापूर्वीच्या अपघाताची आठवण महामार्गावर थांबलेल्या पंधरा वाहनांवर काही दिवसांपूर्वीच सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. या अपघातामुळे साधारणत: वर्षापूर्वी पारगाव-खंडाळा येथे कंटेनर उलटून आठजणांना जीव गमवावा लागला होता. त्याच्या आठवणी ताज्या झाल्या. अनर्थ टळला अपघातस्थळापासून सुमारे शंभर फुटांवर सातारा व इतर ठिकाणी जाण्यासाठी महामार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहनांची वाट पाहत बसलेले असतात. हा अपघात थोडा पुढे झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता.