शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

शिरवळजवळ टेम्पोखाली चिरडून महिला ठार

By admin | Updated: November 7, 2015 23:41 IST

चार जखमी : महामार्गालगत वाहनांची वाट पाहत थांबणे बेतले जिवावर

शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ हद्दीत मालट्रकने टेम्पोला धडक दिली. त्यानंतर कलंडलेल्या टेम्पोखाली महामार्गाच्या कडेला वाहनाची वाट पाहत बसलेल्या महिला प्रवासी चिरडल्या गेल्या. या विचित्र अपघातात एक महिला जागीच ठार असून, चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पारगाव खंडाळा येथे वर्षापूर्वी झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती शिरवळमध्ये झाली. घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौपाळा, शिरवळ येथील एका कंपनीत कामावर जाण्यासाठी शिरवळ येथील अलका यशवंत गुंजवटे, बिना हरिदास बाला, नीता प्रकाश यादव, सरला प्रभाकर कोळी, सुवर्णा कृष्णदेव भणगे या पाच महिला शिरवळ पोलीस स्टेशनसमोर महामार्गावर वाहनांची वाट पाहत थांबलेल्या होत्या. यावेळी संबंधित महिलांनी हात केल्याने कोल्हापूर बाजूकडे निघालेल्या टेम्पोचा (एमएच ११ एएल ६५२) चालक विकास दुरेकर (३२, रा. फुरसुंगी, ता. हवेली) याने टेम्पोचा वेग कमी केला. दरम्यान, पुण्याहून सातारा बाजूकडे भरधाव निघालेल्या मालट्रकने (एमएच ११ एम ६००७) टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो महामार्गावर उलटल्याने सुमारे पन्नास ते साठ फुटांवर फरफटत जाऊन महामार्गावर थांबलेल्या महिलांंच्या अंगावर गेला. यामध्ये अलका गुंजवटे व सरला कोळी प्रसंगावधान दाखवत बाजूला पळत असताना पडल्याने जखमी झाल्या, तर बिना बाला, नीता यादव, सुवर्णा भणगे या गंभीर जखमी झाल्या. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा कृष्णदेव भणगे (वय ३५, रा. मूळगाव आसगाव, ता. सातारा, सध्या रा. शिर्के कॉलनी, शिरवळ) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेला ट्रकचालक तानाजी प्रल्हाद यादव (३६, रा. अतिट ता. सातारा) याला पंढरपूर फाटा येथे शिरवळ पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडून ताब्यात घेतले. गंभीर जखमींना स्थानिकाच्या मदतीने शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली होती. शिरवळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, हवालदार चंद्रकांत निकम तपास करत आहेत. (प्रतिनिधी) वर्षापूर्वीच्या अपघाताची आठवण महामार्गावर थांबलेल्या पंधरा वाहनांवर काही दिवसांपूर्वीच सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. या अपघातामुळे साधारणत: वर्षापूर्वी पारगाव-खंडाळा येथे कंटेनर उलटून आठजणांना जीव गमवावा लागला होता. त्याच्या आठवणी ताज्या झाल्या. अनर्थ टळला अपघातस्थळापासून सुमारे शंभर फुटांवर सातारा व इतर ठिकाणी जाण्यासाठी महामार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहनांची वाट पाहत बसलेले असतात. हा अपघात थोडा पुढे झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता.