सातारा : शहरातील लंबे बोळ परिसरात काही घरांमध्ये आठ दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मोती चौकात रास्ता रोको आंदोलन केले.लंबे बोळ येथील काही नळकनेक्शनला आठ दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे येथील भाडेकरूंना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. वापरासाठी पाणी नसल्याने संतप्त झालेल्या भाडेकरूंनी एकत्र येऊन मोती चौक येथे रस्तादुभाजकाला बांबू बांधून रस्ता अडवला. त्यानंतर महिलांनी भांडी रस्त्यात मांडून साखळी करून रास्ता रोको आंदोलन केले. शहराच्या मुख्य चौकात अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे वाहनचालकांची चांगलीच धांदल उडाली. नगरसेवक जयेंद्र चव्हाण, राजू गोरे, चारुदत्त बागल यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित झाले. (प्रतिनिधी)
बांबू बांधून महिलांनी अडविला रस्ता
By admin | Updated: June 17, 2014 00:47 IST