शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बारविरोधात महिलांनी उठविला आवाज!

By admin | Updated: January 1, 2016 00:10 IST

विंगमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार : विशेष ग्रामसभेत महिलांचा एकमताने ठराव; गावातून फेरी

विंग : येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ग्रामसभेत देशी-विदेशी व बिअरबारच्या परवान्यावरून खडाजंगी झाली. तेव्हा ३० डिसेंबरला विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने ३० डिसेंबरला महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत एकमतांनी महिलांनी नवीन परवाने न देण्यावर शिक्कामोर्तब केला तसेच चालू परवाने रद्द करण्यासाठी पुढील प्रक्रिया करण्याचा ठराव मंजूर केला.विंग गावामध्ये सध्या एक परमिटरूम बिअरबार आहे तर गावामध्ये जवळजवळ दहा ते बारा ठिकाणी दारूची अवैद्य विक्री होते. यामध्ये देशी-विदेशी, बिअर या सर्व प्रकारची दारू राजरोसपणे विकली जाते. याचा नाहक त्रास गावकऱ्यांना तर होतोच तसेच शासनाचा देखील तोटा होतो. या सर्व अवैद्य धंद्यासाठी कुणाचातरी वरदहस्त आहे. या सर्वांत भरीस भर म्हणून गावामध्ये नवीन व्यावसायिकांचे देशी-विदेशीसाठी एक आणि बिअरबारसाठी पाच अर्ज आहे आणि याची चिड समाजातील सुज्ञ लोकांना आली. त्यांच्या घरोघरी जाऊन लोकांनी जागृती केली आणि भविष्यातील धोके सर्वांना सांगून त्यांच्यात जागृती निर्माण केली. त्या अनुशंगाने महिला बहुसंख्येने ग्रामसभेस उपस्थित राहिल्या व आपले मत मांडले. दारूबंदीसाठी गावामध्ये एक सामाजिक चळवळ उभी राहिली. गावामध्ये मागील चार ते पाच दिवस फक्त या एकाच विषयावर चर्चा होत होती आणि याचे फलित म्हणून महिला घराबाहेर पडल्या. महिलांनी ग्रामसभेत आपली मते अतिशय परखडपणे मांडली. त्यांच्या भावनेचा तो उद्रेकच होता आणि अपेक्षा होती. गावामध्ये संपूर्ण दारूबंदी घडलीही तसेच महिलांच्या पुढे कुणाचेच काही चालले नाही. नवीन अर्जांना मंजुरी द्यायची नाही व आहे त्या परवान्यांना स्थगिती द्यायची असा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी मनीषा कुंभार, शकुंतला घोडके, उज्ज्वला पाटील यांनी आपली मते मांडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शंकरराव खबाले होते. तत्कालीन ग्रामसेवक एम. ए. पाटील यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले. तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर).बाटली आडवी : महिलांची जोरदार घोषणाबाजीविंग गावात प्रथमच ऐतिहासिकरीत्या महिलांची दारूबंदीबाबत जनजागृती फेरी निघाली. महिलांनी गावात दारूबंदी झालीच पाहिजे, गाव दारूमुक्त झालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. त्यामुळे गावातील आबालवृद्धांना याची तीव्रता लक्षात आली. दरम्यान, स्वनजा पाटील, प्रभावती शिंदे, वैजयंता खबाले यांनी प्रभावी भाषणे केली तर फेरीचे नेतृत्त्व रेश्मा पाटील, शारदा खबाले, कुसुम पाटील यांनी केले.गावची वाटचाल एका सकारात्मक विचाराकडे चालली आहे. आज सर्वसामान्य स्त्रियांनी रस्त्यावर उतरून हे सिद्ध केले आहे. त्यांच्या भावना व विचार यांचा बारकाईने विचार करून त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आहे.- भीमराव खबाले, ग्रामस्थ, विंगदारूमुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात आणि कुटुंबाची विल्हेवाट लागते. गावातील तरुणपिढी सुधारण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी हा धाडशी निर्णय घेतला पाहिजे.- रेश्मा पाटील, ग्रामस्थ, विंग दारूमुळे माझे पती मृत्युमुखी पडले आणि माझ्या संसाराची राखरांगोळी झाली. दारूसारखे विष यापुढे या गावातून हद्दपार केले पाहिजे तरच गावाची प्रगती होईल आणि संसार सुखाचे होतील.- प्रभावती शिंदे, ग्रामस्थ, विंग