शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

बारविरोधात महिलांनी उठविला आवाज!

By admin | Updated: January 1, 2016 00:10 IST

विंगमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार : विशेष ग्रामसभेत महिलांचा एकमताने ठराव; गावातून फेरी

विंग : येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ग्रामसभेत देशी-विदेशी व बिअरबारच्या परवान्यावरून खडाजंगी झाली. तेव्हा ३० डिसेंबरला विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने ३० डिसेंबरला महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत एकमतांनी महिलांनी नवीन परवाने न देण्यावर शिक्कामोर्तब केला तसेच चालू परवाने रद्द करण्यासाठी पुढील प्रक्रिया करण्याचा ठराव मंजूर केला.विंग गावामध्ये सध्या एक परमिटरूम बिअरबार आहे तर गावामध्ये जवळजवळ दहा ते बारा ठिकाणी दारूची अवैद्य विक्री होते. यामध्ये देशी-विदेशी, बिअर या सर्व प्रकारची दारू राजरोसपणे विकली जाते. याचा नाहक त्रास गावकऱ्यांना तर होतोच तसेच शासनाचा देखील तोटा होतो. या सर्व अवैद्य धंद्यासाठी कुणाचातरी वरदहस्त आहे. या सर्वांत भरीस भर म्हणून गावामध्ये नवीन व्यावसायिकांचे देशी-विदेशीसाठी एक आणि बिअरबारसाठी पाच अर्ज आहे आणि याची चिड समाजातील सुज्ञ लोकांना आली. त्यांच्या घरोघरी जाऊन लोकांनी जागृती केली आणि भविष्यातील धोके सर्वांना सांगून त्यांच्यात जागृती निर्माण केली. त्या अनुशंगाने महिला बहुसंख्येने ग्रामसभेस उपस्थित राहिल्या व आपले मत मांडले. दारूबंदीसाठी गावामध्ये एक सामाजिक चळवळ उभी राहिली. गावामध्ये मागील चार ते पाच दिवस फक्त या एकाच विषयावर चर्चा होत होती आणि याचे फलित म्हणून महिला घराबाहेर पडल्या. महिलांनी ग्रामसभेत आपली मते अतिशय परखडपणे मांडली. त्यांच्या भावनेचा तो उद्रेकच होता आणि अपेक्षा होती. गावामध्ये संपूर्ण दारूबंदी घडलीही तसेच महिलांच्या पुढे कुणाचेच काही चालले नाही. नवीन अर्जांना मंजुरी द्यायची नाही व आहे त्या परवान्यांना स्थगिती द्यायची असा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी मनीषा कुंभार, शकुंतला घोडके, उज्ज्वला पाटील यांनी आपली मते मांडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शंकरराव खबाले होते. तत्कालीन ग्रामसेवक एम. ए. पाटील यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले. तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर).बाटली आडवी : महिलांची जोरदार घोषणाबाजीविंग गावात प्रथमच ऐतिहासिकरीत्या महिलांची दारूबंदीबाबत जनजागृती फेरी निघाली. महिलांनी गावात दारूबंदी झालीच पाहिजे, गाव दारूमुक्त झालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. त्यामुळे गावातील आबालवृद्धांना याची तीव्रता लक्षात आली. दरम्यान, स्वनजा पाटील, प्रभावती शिंदे, वैजयंता खबाले यांनी प्रभावी भाषणे केली तर फेरीचे नेतृत्त्व रेश्मा पाटील, शारदा खबाले, कुसुम पाटील यांनी केले.गावची वाटचाल एका सकारात्मक विचाराकडे चालली आहे. आज सर्वसामान्य स्त्रियांनी रस्त्यावर उतरून हे सिद्ध केले आहे. त्यांच्या भावना व विचार यांचा बारकाईने विचार करून त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आहे.- भीमराव खबाले, ग्रामस्थ, विंगदारूमुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात आणि कुटुंबाची विल्हेवाट लागते. गावातील तरुणपिढी सुधारण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी हा धाडशी निर्णय घेतला पाहिजे.- रेश्मा पाटील, ग्रामस्थ, विंग दारूमुळे माझे पती मृत्युमुखी पडले आणि माझ्या संसाराची राखरांगोळी झाली. दारूसारखे विष यापुढे या गावातून हद्दपार केले पाहिजे तरच गावाची प्रगती होईल आणि संसार सुखाचे होतील.- प्रभावती शिंदे, ग्रामस्थ, विंग