शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

घाटातलं एस वळण आता झोकात...

By admin | Updated: July 2, 2015 21:42 IST

महामार्गावर सोयी : ‘खंबाटकी’च्या वळणावर संरक्षक कठडे

दशरथ ननावरे - खंडाळा --पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाट व बोगदा परिसरातील रस्त्याच्या सोयी सुविधांबाबत स्थानिकांनी अनेकदा हायवे प्रशासनाकडे मागणी केली होती. याबाबत उशिरा का होईना प्रशासनाला जाग आल्याचे दिसून येत आहे. घाटाबरोबरच विशेषत: इंग्रजी ‘एस’ आकाराच्या वळणावर संरक्षक कठडे उभारून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखलही घेण्यात आली. खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर तीव्र उतार व अतिशय धोकादायक वळणे आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग या ठिकाणी आपोआपच वाढला जातो. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत: इंग्रजी ‘एस’ आकाराच्या वळणावर जीवघेणे मोठे अपघात घडले होते. याचठिकाणी झालेल्या खासगी बसच्या अपघातात ११ जण ठार तर ३५ जण जखमी झाले होते. तर जीपच्या अपघातात ९ जण ठार झाले होते. मालट्रकच्या अपघातात दोघे तर दुचाकी अपघातात १ जणाला प्राण गमवावे लागले होते.या अपघातानंतर बोगदा परिसरातील रस्त्यातील अशास्त्रीय वळणे, संरक्षक कठड्यांचा अभाव, सूचना फलक याबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाकडे बैठका घेऊन सोयी उपलब्ध करण्याची मागणीही केली होती. परंतु अपघातानंतर तात्पुरत्या स्वरूपात जागे होणारे प्रशासन काही दिवसांतच पुन्हा झोपी जायचे; परंतु महामार्गाचा सहापदरीकरणाचे काम वेगाने सुरू झाल्यानंतर वळणांवरील सुविधांबाबत सुधारणा झाली आहे. या वळणावर रेड सिग्नल लावला आहे. तसेच लोखंडी संरक्षक कठडे उभारण्यात आले आहेत. तसेच डांबरीकरणावर रबर स्ट्रीप लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना पुढील धोक्याची सूचना मिळत आहे. तर रबरी स्ट्रीपमुळे वाहनांचे वेगळी नियंत्रित ठेवण्यास मदत होत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणात घट झाली आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल...बोगदा परिसर, ‘एस’ वळणावरील असुविधा घाटातील अडचणी याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला होता. प्रवाशांच्या, वाहनचालकांच्या अडचणी व सुविधांचा अभाव या सर्वच बाबी ‘लोकमत’ने प्रभावीपणे मांडल्या होत्या. याची दखल घेत हायवे प्रशासनाने योग्य त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. खंडाळा ग्रामस्थांनी प्रवाशांचे होणारे हाल पाहून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अनेकदा मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा आम्ही करत आलो. या ठिकाणच्या त्रुटी लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाने संरक्षक कठडे उभारल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान आहे. उर्वरित घाटातील सुविधाही तातडीने कराव्यात. -अनिरुद्ध गाढवे, सदस्य, पंचायत समिती खंडाळा.‘एस’ वळणावर सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने कोणत्या बाबी कराव्यात, यासाठी हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार रबर स्ट्रीप, सूचनेसाठी सिग्नल लावले होते. आता सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी कठडे उभारल्याने प्रवास सुखर होऊ शकतो. तरीही वाहनचालकांनी वेग मर्यादा पाळली पाहिले. - अशोक शेळके, पोलीस निरीक्षक खंडाळा