शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात लिलावाअभावी गाळे पडून !

By admin | Updated: October 30, 2015 23:22 IST

पालिकेचा कारभार : १९६पैकी ४३ गाळ्यांचे लिलाव; उर्वरित १५३ ची प्रतीक्षा, पाच वर्षांपूर्वी बांधली इमारत

कऱ्हाड : येथील कऱ्हाड पालिकेच्या वतीने भाजी मंडईतील विक्रेत्यांची सोय व्हावी या हेतूने छत्रपती शिवाजी भाजी मंडईची इमारत बांधली. पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये स्वतंत्र १९६ गाळे बांधण्यात आले. त्यापैकी फक्त ४३ गाळ्यांचे लिलाव होऊन ते सुरू झाले. मात्र, अजून १५३ गाळे लिलावाअभावी बंद आहेत. इतर गाळ्यांचे लिलाव हे होणे गरजेचे आहे. मात्र, पालिकेकडून मंडई सुरू करण्यात आल्यापासून आतापर्यंत गाळ्यांचे लिलाव करण्यात आले नाहीत. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान पालिकेला सोसावे लागले आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून कऱ्हाड पालिकेने २०११ मध्ये गुरुवार पेठ येथे शिवाजी भाजी मंडईची इमारत बांधली. १९६ गाळे असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन मजली इमारतीतील आतील आणि बाहेरील बाजूस १९६ गाळे काढण्यात आले. मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल या हेतूने बांधण्यात आलेल्या १९६ गाळ्यांपैकी सुरुवातीला १३१ गाळ्यांचे लिलाव झाले. उर्वरित ६५ गाळ्यांचे लिलाव झाले नाहीत. लिलाव झालेल्या १३१ गाळे धारकांपैकी पाच वर्षात फक्त ४३ गाळेधारकांनी पैसे भरले. लिलावातील बाकी राहिलेले ८८ गाळे व उर्वरित ६५ गाळे अशा १५३ गाळ्यांचे पुर्नलिलाव करण्याचे बाकी आहे. ते लिलाव कधी केले जाणार अशी विचारणा नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. लिलावा अभावी व भाजी मंडई इमारतीसमोरील अतिक्रमणामुळे पालिकेतील गाळे पडून आहेत.पालिकेने गाळेधारकांना लिलावातील रक्कम भरण्याबाबत गेल्या पाच वर्षांत अनेकवेळा नोटिसांद्वारे सूचना केल्या आहेत. २०११ ते २०१५ या पाच वर्षांत गाळेधारकांनी अनामत रक्कम अपेक्षित अशी भरली नाही. तसेच काहींकडून आजतागायत काहीच रक्कम भरली गेली नसल्याचे व्यापाऱ्यांमधून सांगितले जाते. पाच वर्षांत पालिकेतील सर्व गाळ्यांचे लिलाव का होऊ शकले नाही. लिलावाबाबत एकाही नगरसेवकाने सभागृहात प्रश्न का उपस्थित केला नाही. याचे संशोधन करणे गरजेचे आहे.गाळेधारकांना सवलत देण्याच्या दृष्टीने पालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत गाळेधारकांना ३० सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार व्याजासह थकबाकी भरण्याच्या सूचना केल्या होत्या. गाळे वाटपाअभावी पालिकेचे पाच वर्षांत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.याला जबाबदार कोणास धरले पाहिजे. पालिका प्रशासनाला की, लोकप्रतिनिधींना अशी शहरातील नागरिकांकडून विचारणा होत आहे. (प्रतिनिधी)नियोजित जागेवर अजूनही काम अपूर्ण नवीन भाजी मंडई इमारतीच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या जागेवर पालिकेकडून इतरही इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. अशी माहिती एक वर्षापूर्वी पालिकेकडून मंडई परिसरातील व्यापारी व नागरिकांना देण्यात आली होती. मात्र, त्या जागेवर आजही फक्त मुरूम आणि दगड पडलेले आहे. याठिकाणी सध्या किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने उभारलेली आहेत.२०१० ला बांधकाम पूर्ण येथील नवीन भाजी मंडईच्या इमारतीचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण करण्यात आले. आता २०११ पासून ते आतापर्यंत पाच वर्षे मंडई इमारतीमधील गाळे लिलावा अभावी पडूनच राहिले.