शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

कऱ्हाडात लिलावाअभावी गाळे पडून !

By admin | Updated: October 30, 2015 23:22 IST

पालिकेचा कारभार : १९६पैकी ४३ गाळ्यांचे लिलाव; उर्वरित १५३ ची प्रतीक्षा, पाच वर्षांपूर्वी बांधली इमारत

कऱ्हाड : येथील कऱ्हाड पालिकेच्या वतीने भाजी मंडईतील विक्रेत्यांची सोय व्हावी या हेतूने छत्रपती शिवाजी भाजी मंडईची इमारत बांधली. पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये स्वतंत्र १९६ गाळे बांधण्यात आले. त्यापैकी फक्त ४३ गाळ्यांचे लिलाव होऊन ते सुरू झाले. मात्र, अजून १५३ गाळे लिलावाअभावी बंद आहेत. इतर गाळ्यांचे लिलाव हे होणे गरजेचे आहे. मात्र, पालिकेकडून मंडई सुरू करण्यात आल्यापासून आतापर्यंत गाळ्यांचे लिलाव करण्यात आले नाहीत. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान पालिकेला सोसावे लागले आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून कऱ्हाड पालिकेने २०११ मध्ये गुरुवार पेठ येथे शिवाजी भाजी मंडईची इमारत बांधली. १९६ गाळे असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन मजली इमारतीतील आतील आणि बाहेरील बाजूस १९६ गाळे काढण्यात आले. मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल या हेतूने बांधण्यात आलेल्या १९६ गाळ्यांपैकी सुरुवातीला १३१ गाळ्यांचे लिलाव झाले. उर्वरित ६५ गाळ्यांचे लिलाव झाले नाहीत. लिलाव झालेल्या १३१ गाळे धारकांपैकी पाच वर्षात फक्त ४३ गाळेधारकांनी पैसे भरले. लिलावातील बाकी राहिलेले ८८ गाळे व उर्वरित ६५ गाळे अशा १५३ गाळ्यांचे पुर्नलिलाव करण्याचे बाकी आहे. ते लिलाव कधी केले जाणार अशी विचारणा नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. लिलावा अभावी व भाजी मंडई इमारतीसमोरील अतिक्रमणामुळे पालिकेतील गाळे पडून आहेत.पालिकेने गाळेधारकांना लिलावातील रक्कम भरण्याबाबत गेल्या पाच वर्षांत अनेकवेळा नोटिसांद्वारे सूचना केल्या आहेत. २०११ ते २०१५ या पाच वर्षांत गाळेधारकांनी अनामत रक्कम अपेक्षित अशी भरली नाही. तसेच काहींकडून आजतागायत काहीच रक्कम भरली गेली नसल्याचे व्यापाऱ्यांमधून सांगितले जाते. पाच वर्षांत पालिकेतील सर्व गाळ्यांचे लिलाव का होऊ शकले नाही. लिलावाबाबत एकाही नगरसेवकाने सभागृहात प्रश्न का उपस्थित केला नाही. याचे संशोधन करणे गरजेचे आहे.गाळेधारकांना सवलत देण्याच्या दृष्टीने पालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत गाळेधारकांना ३० सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार व्याजासह थकबाकी भरण्याच्या सूचना केल्या होत्या. गाळे वाटपाअभावी पालिकेचे पाच वर्षांत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.याला जबाबदार कोणास धरले पाहिजे. पालिका प्रशासनाला की, लोकप्रतिनिधींना अशी शहरातील नागरिकांकडून विचारणा होत आहे. (प्रतिनिधी)नियोजित जागेवर अजूनही काम अपूर्ण नवीन भाजी मंडई इमारतीच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या जागेवर पालिकेकडून इतरही इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. अशी माहिती एक वर्षापूर्वी पालिकेकडून मंडई परिसरातील व्यापारी व नागरिकांना देण्यात आली होती. मात्र, त्या जागेवर आजही फक्त मुरूम आणि दगड पडलेले आहे. याठिकाणी सध्या किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने उभारलेली आहेत.२०१० ला बांधकाम पूर्ण येथील नवीन भाजी मंडईच्या इमारतीचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण करण्यात आले. आता २०११ पासून ते आतापर्यंत पाच वर्षे मंडई इमारतीमधील गाळे लिलावा अभावी पडूनच राहिले.