शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

विंग गटात ‘कही खुशी, कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:37 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील विंग जिल्हा परिषद गटात सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, तर दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या ...

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील विंग जिल्हा परिषद गटात सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, तर दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाला उंडाळकर गटाची तर काही ठिकाणी अतुल भोसले गटाची साथ मिळाल्याने सत्ता कायम राखण्यात यश आले आहे, तर काही ठिकाणी भोसले गटाने उंडाळकर - चव्हाण गटाविरुद्ध लढत दिली. एकंदरीत विभागात ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र आहे.

कऱ्हाड तालुक्यातील विंग ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल भोसले गट आणि चव्हाण गट एकत्र येत उंडाळकर गटाला लढत दिली होती. या लढतीमध्ये पंधरापैकी दहा जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखण्यात खबाले यांना यश आले आहे.

येरवळे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच सर्वपक्षीय विरुद्ध अपक्षांनी लढत दिल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, अकरापैकी दोन जागांवरच अपक्षांना समाधान मानावे लागले, तर महाविकास आघाडीने नऊ जागा मिळवत सत्ता कायम राखली आहे.

शिंदेवाडी-विंग ग्रामपंचायतीमध्ये पाच जागांसाठी झालेल्या लढतीत पूर्वी चव्हाण गटातून सत्तेत असलेल्या सरपंचांनी अतुल भोसले गटाच्या माध्यमातून चार जागा मिळविल्या, तर चव्हाण गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.

पोतले ग्रामपंचायतीमध्ये चव्हाण गट आणि उंडाळकर गट एकत्र येऊन संमिश्र गटाशी लढत दिली होती. यामध्ये नऊपैकी तीन जागा संमिश्र गटाला मिळाल्या असून सहा जागा उंडाळकर-चव्हाण गटाला मिळाल्या आहेत. सत्ता कायम ठेवण्यात या गटाला यश आले आहे.

घारेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तिन्हीही गट स्वतंत्र लढल्याने कोणालाही बहुमत नाही. नऊ जागांसाठी झालेल्या लढतीत अतुल भोसले गट तीन, उंडाळकर गट दोन तर चव्हाण गटाला चार जागा मिळविण्यात यश आले आहे. चव्हाण गटाची या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता होती. कोळे ग्रामपंचायत निवडणुकीत चव्हाण गट आणि उंडाळकर गट एकत्र येत भोसले गटाला लढत दिली होती. यामध्ये चव्हाण-उंडाळकर गटाने बारा जागांवर विजय मिळविला, तर सत्ताधारी गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.

बामणवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सातपैकी काका गटाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या, तर पाच जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये अतुल भोसले गटाने प्रथमच निवडणुकीत रणशिंग फुंकून दोन उमेदवार उभे केले होते. ते दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले, तर चव्हाण-उंडाळकर गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायतीत उंडाळकर गटाची सत्ता होती. येणके आणि अंबवडे या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.