शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

मतलबी सरकार सत्तेतून जाईल, काँग्रेसला पुन्हा कौल मिळेल - सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 04:20 IST

‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवले आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलो, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे हे मतलबी सरकार सत्तेतून जाईल.

लोकमत न्यूज नेटवर्कक-हाड (जि.सातारा) : ‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवले आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलो, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे हे मतलबी सरकार सत्तेतून जाईल. ज्वालामुखीसारखा उद्रेक होऊन काँग्रेसला पुन्हा कौल मिळेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे व्यक्त केला.कºहाड येथे माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचा राजकीय, सामाजिक वाटचालीचा सुवर्ण महोत्सव व १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा अमृत महोत्सव असा संयुक्त कार्यक्रम झाला. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर अध्यक्षस्थानी होते. शिंदे म्हणाले, देश कुठे चालला आहे, हे कळत नाही. देशात हुकूमशाही वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. मी केंद्रीय गृहमंत्री असतानाही अनेक गोष्टी केल्या; पण त्याचा कधी गाजावाजा केला नाही. खरेतर गृहमंत्री म्हणून काम करीत असताना अनेक गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात. आमच्या काळातही मिलीटरी स्ट्राईक झाले होते. पण त्यास ‘सर्जिकल स्ट्राईक’ असे गोंडस नाव देऊन आम्ही काही तरी वेगळे केले आहे, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.काँग्रेसचा एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल तीनवेळा पराभव झाला आणि आता काँग्रेस संपली अशा वल्गना सुरू झाल्या.मात्र काँग्रेस कधी संपली नाही आणि संपणार नाही. काँग्रेसने पुन्हा उभारी घेतली. देशातील आणि राज्यातील सद्य:स्थिती पाहता जनतेमध्ये प्रचंड संताप आहे, काँगे्रस पुन्हा भरारी घेईल, असे त्यांनी सांगितले.ईव्हीएमच्या गडबडीवर टीकाआम्ही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर प्रेम करणारी माणसे आहोत. पराभूत झालो म्हणून हारणारे नाही. ज्या इंदिरा गांधींचा लोकांनी पराभव केला. त्याच इंदिरा गांधींना लोकांनी प्रचंड मतांनी निवडून दिल्याचा इतिहास आहे. अन् तेही बटण दाबून नव्हे, असे म्हणत शिंदे यांनी ईव्हीएम मशिनच्या गडबडीवर टीका केली.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेMaharashtraमहाराष्ट्रIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस