शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

भटक्या श्वानांचे पालकत्व कोणी स्वीकारेल का !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

सातारा : सातारा पालिकेने शहरातील भटक्या श्वानांचे पालकत्व नाकारल्यानेच आज भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जर दोन-चार ...

सातारा : सातारा पालिकेने शहरातील भटक्या श्वानांचे पालकत्व नाकारल्यानेच आज भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जर दोन-चार वर्षांपूर्वी पालिकेने निर्बीजीकरणाची मोहीम सक्षमपणे राबविली असती तर श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आले असते, असे मत प्राणितज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यासह सातारा शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, आज ती हजारोंच्या घरात पोहोचली आहे. या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. शहरात एकीकडे श्वानांचा उपद्रव सुरू असताना दुसरीकडे चार भटक्या श्वानांचा नुकताच आकस्मिक मृत्यू झाल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा ठरला आहे. वाढती संख्या व उपद्रवामुळेच या श्वानांवर कोणीतरी विषप्रयोग केला असावा, असे सांगितले जात आहे. असे असले तरी पालिकेने भटक्या श्वानांचा विषय आजवर कधीच गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याचे प्राणितज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पालिका प्रशासनाने २०१६ मध्ये श्वानांना पकडण्यासाठी डॉग व्हॅनचा विषय मंजूर केला होता. मात्र, हा विषय आजअखेर केवळ कागदावरच आहे. यानंतर चार वर्षांपूर्वी श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली. एका संस्थेशी करार करून पालिकेने शहरात राबविलेली ही मोहीम अर्ध्यावरच थंडावली. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या अन् त्यांची दहशत कमी होण्याऐवजी ती वाढू लागली आहे.

(चौकट)

चार वर्षांनंतर निर्बीजीकरण मोहीम !

सातारा शहरात श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, नागरिकांमधून भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याची दखल घेत पालिकेने चार वर्षांनंतर भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून, एका खासगी संस्थेमार्फत ही मोहीम राबविली जाणार आहे.

(चौकट)

श्वानांनी जिल्ह्यात इतक्या

जणांना घेतला चावा

२०१७ १६,१३१

२०१८ २१,०६८

२०१९ २६,३९२

२०२० २६,२५७

२०२१ ११६०

(चौकट)

यामुळे पिसाळताहेत श्वान

- संचारबंदीत हॉटेल, हातगाडे, दुकाने बंद होती.

- त्यामुळे श्वानांना सहज मिळणारे अन्न बंद झाले.

- लोकांनी त्यांना खाऊ-पिऊ घालणेही बंद केले.

- मिळेल त्या अन्नासाठी श्वानांमध्ये कळवंडं सुरू झाली.

- त्यामुळे श्वान आक्रमक झाले व पिसाळण्याचे प्रमाण वाढले.

- वाहनधारक व पादचाऱ्यांच्या अंगावर ते धावून जाऊ लागले.

(कोट)

वर्षभरात श्वानाची एक मादी दहा पिलांना जन्म देते. यातील सात-आठ पिल्ली आजाराने व अपघातात मृत्युमुखी पडतात. श्वानांची संख्या रोखण्यासाठी पालिकेने उशिरा का होईना निर्बीजीकरण मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम केवळ कागदावर न राहता ती प्रभावीपणे राबवायला हवी.

- सायली त्रिंबके, साया ॲनिमल केअर सातारा