शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

दारूदुकाने उघडता तर मंदिरे का नाही ? : देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 11:15 IST

राज्यात दारूची दुकाने सुरू केली. मॉल उघडे केले; मात्र राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. देशातील सगळ्या राज्यांनी ती उघडी केली आहेत, अशा परिस्थितीत मंदिरे उघडण्यासंदर्भातील आग्रह योग्य असून, सरकारने तत्काळ ती उघडी करण्यास परवानगी द्यायला पाहिजे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ठळक मुद्देदारूदुकाने उघडता तर मंदिरे का नाही ? : देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवालशिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेस आमदाराचाच विरोध

सातारा : राज्यात दारूची दुकाने सुरू केली. मॉल उघडे केले; मात्र राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. देशातील सगळ्या राज्यांनी ती उघडी केली आहेत, अशा परिस्थितीत मंदिरे उघडण्यासंदर्भातील आग्रह योग्य असून, सरकारने तत्काळ ती उघडी करण्यास परवानगी द्यायला पाहिजे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत चर्चा करून माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील जनता जागृत आहे. मंदिरे उघडल्यानंतर तिथे गर्दी होणार नाही. देशापेक्षा महाराष्ट्र राज्य वेगळं नाही, हे सगळ्याच धर्मीयांचं म्हणणं आहे. जनतेची भावना लक्षात घेऊन सरकारने तत्काळ मंदिरे उघडी करावीत.काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्नाटकातील मनगुट्टी गावात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी फडणविसांनी आग्रह धरण्याची मागणी केली होती, त्याबाबत छेडले असता फडणवीस म्हणाले, मुश्रीफांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांच्याने जे होणार नाही, ते आम्ही करून दाखवू हे त्यांना माहीत आहे.

मनगट्टी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेसच्या आमदारांनी विरोध केला. हे आमदार कर्नाटकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. विरोधी पक्षाच्या नेत्याला सांगण्याऐवजी मुश्रीफ आपल्या सहकारी पक्षाला का सांगत नाहीत. मी तर नक्कीच सांगेन आणि महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी जिथे गरज असेल तिथे आंदोलन करेन. मात्र, या प्रकरणात कोणीही विनाकारण राजकारण करू नये.अलमट्टीची उंची ही पूर्वीच्या राज्यकर्त्यांची चूकअलमट्टीची उंची महाराष्ट्राला मान्य नाही. तरी देखील या धरणाची उंची आता वाढू शकत नाही. मात्र, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी या धरणाच्या उंचीबाबत आक्षेप घ्यायला पाहिजे होता, तो घेतला नाही, ती त्यांची चूक होती. आता काहीही होऊ शकत नाही, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस