शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

दारूदुकाने उघडता तर मंदिरे का नाही ? : देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 11:15 IST

राज्यात दारूची दुकाने सुरू केली. मॉल उघडे केले; मात्र राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. देशातील सगळ्या राज्यांनी ती उघडी केली आहेत, अशा परिस्थितीत मंदिरे उघडण्यासंदर्भातील आग्रह योग्य असून, सरकारने तत्काळ ती उघडी करण्यास परवानगी द्यायला पाहिजे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ठळक मुद्देदारूदुकाने उघडता तर मंदिरे का नाही ? : देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवालशिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेस आमदाराचाच विरोध

सातारा : राज्यात दारूची दुकाने सुरू केली. मॉल उघडे केले; मात्र राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. देशातील सगळ्या राज्यांनी ती उघडी केली आहेत, अशा परिस्थितीत मंदिरे उघडण्यासंदर्भातील आग्रह योग्य असून, सरकारने तत्काळ ती उघडी करण्यास परवानगी द्यायला पाहिजे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत चर्चा करून माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील जनता जागृत आहे. मंदिरे उघडल्यानंतर तिथे गर्दी होणार नाही. देशापेक्षा महाराष्ट्र राज्य वेगळं नाही, हे सगळ्याच धर्मीयांचं म्हणणं आहे. जनतेची भावना लक्षात घेऊन सरकारने तत्काळ मंदिरे उघडी करावीत.काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्नाटकातील मनगुट्टी गावात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी फडणविसांनी आग्रह धरण्याची मागणी केली होती, त्याबाबत छेडले असता फडणवीस म्हणाले, मुश्रीफांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांच्याने जे होणार नाही, ते आम्ही करून दाखवू हे त्यांना माहीत आहे.

मनगट्टी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेसच्या आमदारांनी विरोध केला. हे आमदार कर्नाटकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. विरोधी पक्षाच्या नेत्याला सांगण्याऐवजी मुश्रीफ आपल्या सहकारी पक्षाला का सांगत नाहीत. मी तर नक्कीच सांगेन आणि महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी जिथे गरज असेल तिथे आंदोलन करेन. मात्र, या प्रकरणात कोणीही विनाकारण राजकारण करू नये.अलमट्टीची उंची ही पूर्वीच्या राज्यकर्त्यांची चूकअलमट्टीची उंची महाराष्ट्राला मान्य नाही. तरी देखील या धरणाची उंची आता वाढू शकत नाही. मात्र, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी या धरणाच्या उंचीबाबत आक्षेप घ्यायला पाहिजे होता, तो घेतला नाही, ती त्यांची चूक होती. आता काहीही होऊ शकत नाही, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस