शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गोडोलीतील रस्त्यासाठी वेगवेगळी नियमावली का?, नागरिकांचा सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 19:22 IST

एकाला एक आणि दुसऱ्याला एक असा नियम न लावता रस्त्याकडील अतिक्रमणे हटवून संपूर्ण रस्ता १२ मीटर रुंदीचा व्हावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

सातारा : गाेडोलीतील साईबाबा मंदिर ते कल्याणी शाळा या मार्गावर पालिकेच्या वतीने डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून काही धेंडांचे अतिक्रमण न हटविताच हे काम केले जात असल्याचा आरोप गोडोलीतील नागरिकांनी केला आहे. एकाला एक आणि दुसऱ्याला एक असा नियम न लावता रस्त्याकडील अतिक्रमणे हटवून संपूर्ण रस्ता १२ मीटर रुंदीचा व्हावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.याबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बांधकाम विभागाच्या नोंदीनुसार गोडोलीत १२ मीटर रुंदीचा रस्ता केला जात आहे. या रस्त्याआड येणारी अतिक्रमणे हटविली जात आहेत. काही नागरिकांनी रस्ता रुंद व्हावा यासाठी स्वत:हून पुढाकार घेत जागा मोकळी करून दिली आहे. असे असताना एका फॅब्रिकेशन व्यवसायासमोरील रस्त्याची रुंदी १०.९० मीटर इतकीच भरत आहे. ही बाब तांत्रिकदृष्ट्या न पटणारी आहे. याबाबत तक्रारी करूनही याचा काहीच उपयोग झालेला नाही. संबंधित अतिक्रमणावर कारवाई न करता येथे गटार व डांबरीकरणाचे काम केल्यास ते बंद पाडले जाईल. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला प्रशासनच जबाबदार असेल. रस्त्याचे काम हे नियमाप्रमाणेच व्हायला हवे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

संपूर्ण रस्ता जर १२ मीटर रुंदीचा होत असेल तर एकाच ठिकाणी त्याची रुंदी कमी का? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पालिकेने डांबरीकरणाचे काम जरूर करावे, मात्र, भविष्याचा विचार करून अतिक्रमणे हटवून रस्ता रुंद करावा. - ॲड. वैभव मोरे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस

टॅग्स :Satara areaसातारा परिसर