शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण ?

By admin | Updated: October 21, 2014 00:20 IST

जिल्ह्याचे लक्ष : शंभूराज, तावडे, बापट यांच्या नावांची चर्चा

सातारा : महाराष्ट्रात भाजपचे नवीन सरकार स्थापन होण्याची फक्त औपचारिकताच बाकी आहे. मात्र, सरकार स्थापनेनंतर थोड्याच दिवसांत पालकमंत्रीही नियुक्त केले जाणार आहेत. परिणामी सातारचे पालकमंत्री कोण, याची चर्चा आतापासूनच जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. जर भाजप आणि शिवसेनेची युती झाली, तर पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळालेल्या माहितीनुसार सातारच्या पालकमंत्रिपदाची माळ बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद तावडे यांच्या गळ्यात /पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील ‘कसबा पेठ’ विधानसभा मतदारसंघाचे आमदार गिरीश बापट यांचेही नाव पुढे आले होते. मात्र, त्यांनी पुण्याचे पालकमंत्री होण्यात रस दाखविला आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार भाजपचेच असणार आहे. भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना अजूनही बहुमतासाठी काही जागा आवश्यक आहेत. भाजप जागांची जुळणी करत आहे. त्यात यश येईल, असे वरिष्ठ नेत्यांना वाटते. मात्र, राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याची स्पष्ट ग्वाही दिली आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपचीही एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपची पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधानपरिषदेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याकडे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कालावधीत त्यांनी अनेकदा सातारा जिल्ह्णात सभा, दौरे आणि बैठका केल्या आहेत. परिणामी त्यांना सातारा जिल्ह्णाची संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि राजकीय नाडी चांगलीच अवगत झाली आहे. जिल्ह्णात त्या तुलनेत भाजप प्रभावी नाही. त्यामुळे भाजप वाढवायची असेल आणि राष्ट्रवादीला रोखायचे असेल, तर सातारचा पालकमंत्री आक्रमक असायला हवा, अशी मागणी भाजपमध्ये जोर धरत असून, त्यादृष्टीने विनोद तावडे यांनाच पालकमंत्री करावे, अशी मागणी भाजपमधून पुढे आली आहे.भाजपला विनोद तावडेच का हवेत..?भाजपला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत चांगला शिरकाव करता आला. मात्र, सातारची पाटी त्यांच्यासाठी कोरीच राहिली आहे. काही केल्या भाजपला येथे पाय रोवता आलेले नाहीत. त्यातच सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. बहुतांशी सत्तास्थाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. परिणामी सातारचा पालकमंत्री राष्ट्रवादीला सळो की पळो करून सोडणारा हवा, असे स्थानिक भाजप नेत्यांना वाटते. त्यातच, जिल्ह्णात त्या तुलनेत भाजप प्रभावी नाही. त्यामुळे भाजप वाढवायची असेल आणि राष्ट्रवादीला रोखायचे असेल, तर सातारचे पालकमंत्री म्हणून विनोद तावडे यांच्याच नावाचा विचार करावा, अशी मागणी भाजपमधून पुढे आली आहे.