शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण ?

By admin | Updated: October 21, 2014 00:20 IST

जिल्ह्याचे लक्ष : शंभूराज, तावडे, बापट यांच्या नावांची चर्चा

सातारा : महाराष्ट्रात भाजपचे नवीन सरकार स्थापन होण्याची फक्त औपचारिकताच बाकी आहे. मात्र, सरकार स्थापनेनंतर थोड्याच दिवसांत पालकमंत्रीही नियुक्त केले जाणार आहेत. परिणामी सातारचे पालकमंत्री कोण, याची चर्चा आतापासूनच जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. जर भाजप आणि शिवसेनेची युती झाली, तर पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळालेल्या माहितीनुसार सातारच्या पालकमंत्रिपदाची माळ बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद तावडे यांच्या गळ्यात /पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील ‘कसबा पेठ’ विधानसभा मतदारसंघाचे आमदार गिरीश बापट यांचेही नाव पुढे आले होते. मात्र, त्यांनी पुण्याचे पालकमंत्री होण्यात रस दाखविला आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार भाजपचेच असणार आहे. भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना अजूनही बहुमतासाठी काही जागा आवश्यक आहेत. भाजप जागांची जुळणी करत आहे. त्यात यश येईल, असे वरिष्ठ नेत्यांना वाटते. मात्र, राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याची स्पष्ट ग्वाही दिली आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपचीही एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपची पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधानपरिषदेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याकडे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कालावधीत त्यांनी अनेकदा सातारा जिल्ह्णात सभा, दौरे आणि बैठका केल्या आहेत. परिणामी त्यांना सातारा जिल्ह्णाची संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि राजकीय नाडी चांगलीच अवगत झाली आहे. जिल्ह्णात त्या तुलनेत भाजप प्रभावी नाही. त्यामुळे भाजप वाढवायची असेल आणि राष्ट्रवादीला रोखायचे असेल, तर सातारचा पालकमंत्री आक्रमक असायला हवा, अशी मागणी भाजपमध्ये जोर धरत असून, त्यादृष्टीने विनोद तावडे यांनाच पालकमंत्री करावे, अशी मागणी भाजपमधून पुढे आली आहे.भाजपला विनोद तावडेच का हवेत..?भाजपला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत चांगला शिरकाव करता आला. मात्र, सातारची पाटी त्यांच्यासाठी कोरीच राहिली आहे. काही केल्या भाजपला येथे पाय रोवता आलेले नाहीत. त्यातच सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. बहुतांशी सत्तास्थाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. परिणामी सातारचा पालकमंत्री राष्ट्रवादीला सळो की पळो करून सोडणारा हवा, असे स्थानिक भाजप नेत्यांना वाटते. त्यातच, जिल्ह्णात त्या तुलनेत भाजप प्रभावी नाही. त्यामुळे भाजप वाढवायची असेल आणि राष्ट्रवादीला रोखायचे असेल, तर सातारचे पालकमंत्री म्हणून विनोद तावडे यांच्याच नावाचा विचार करावा, अशी मागणी भाजपमधून पुढे आली आहे.