शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आगीचा बंब नाहीच तर पाठवू कुठून..?

By admin | Updated: January 13, 2016 22:12 IST

वाईकरांची सुरक्षा रामभरोसे : अग्निशमन दलाची नवी गाडी यायला लागणार दोन महिन्यांचा कालावधी

पांडुरंग भिलारे ल्ल वाई वाईत नागरीकरण, औद्योगीकरण आणि शहराचा पसारा झपाट्याने वाढत असताना शहरातील नागरिकांची आगीपासून सुरक्षा करण्याची यंत्रणा मात्र उपलब्ध नाही. मंगळवारी रामडोह आळीत आग लागल्यावर पालिकेस फोन केला असता ‘बंब नाहीच तर पाठवू कुठून,’ असे उत्तर ऐकावे लागले. वाढते नागरीकरण पाहता अत्याधुनिक, सुसज्ज अग्निशमन दलाची वाई नगरपालिकेला तातडीने गरज असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. वाई शहरात अनेक वाडे, ऐतिहासिक इमारती आहेत़ शहराजवळच औद्योगिक वसाहत आहे़ तसेच वाई हे ऐतिहासिक शहर असून, प्रसिध्द पर्यटनस्थळ असल्याने राज्यासह देशभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे़ त्याचबरोबर वाई शहर व परिसर चित्रीकरणासाठी प्रसिध्द असून अनेक हिंदी, मराठी चित्रपटांचे चित्रीकरण परिसरात सतत सुरू असते. वाईपासून जवळच मांढरदेव देवस्थान आहे़ तेथेही भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. शहरात अगीच्या अनेक घटना वारंवार घडत असतात़ शहरातील रस्ते व गल्ल्या अरुंद असल्याने आग विझविताना अडचणी येत आहेत. पालिकेकडे एक बंब होता; पण हा जुना बंब १ लाख ३० हजारांत विकण्यात आला; यामुळे सध्या वाई शहर बंबाविनाच आहे़ नवीन बंब खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कर आकारण्यात येऊ नये, अशी मागणी विरोधकांनी पालिका सभेत केली होती. त्याचबरोबर वाई शहरात आग लागून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला होता. नवीन बंब खरेदीसाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे़; त्यामुळे आग लागल्यास नियंत्रण कसे मिळविणार, असा प्रश्न उपस्थित झाला असून, लिलावत विकलेला बंब पालिकेने माघारी आणावा किंवा तूर्त भाडेतत्त्वावर घ्यावा; अन्यथा कोणताही अनर्थ घडल्यास आम्ही नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरू, असे सचिन फरांदे यांनी म्हटले होते़ आग विझविण्याची यंत्रणा सध्या उपलब्ध नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़ बाहेरून बंब मागविण्याची नामुष्की पालिकेकडे स्वत:चे अग्निशमन दल नसल्याने आग लागल्यावर मोठी दुर्घटना घडल्यास प्रचंड हानी होऊ शकते. शहरामध्ये कोणत्याही भागात अचानक आग लागल्यास बाहेरून बंब मागवायला लागणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे़ सध्या तरी पालिकेचा बंब उपलब्ध नसल्याने शहराची सुरक्षा रामभरोसे आहे़ पालिका वाहन घसारानिधीतून अग्निशमन बंब खरेदी करणार आहे़ त्याची पक्रिया सुरू आहे़ या पक्रियेला दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे़ सध्या गरज पडल्यास खासगी टँंकर उपलब्ध केला जातो़ तसेच प्रसंगी पाचगणी पालिकेच्या बंबाचीही मदत घेतली जाते़ - आशा राऊत, मुख्याधिकारी, वाई नगरपालिका पालिकेने नवीन बंब खरेदी करण्यापूर्वी जुना विकण्याची गरज नव्हती़ पालिका घरपट्टीत दोन टक्के अग्नीकर लावते. त्याचा लाखो रुपयांचा महसूल दरवर्षी जमा होतो़ मंगळवारी लागलेल्या आगीच्या नुकसानीची भरपाई पालिका निधीतून करण्यात यावी अशी मागणी आम्ही करणार आहोत़ नवीन बंब येईपर्यंत होणाऱ्या प्रत्येक दुर्घटनेची नुकसान भरपाई पालिकेने द्याावी़ - सचिन फरांदे, नगरसेवक सुसज्य अग्निशमन दल ही शहराची मूलभूत गरज आहे़ वाई हे महत्त्वाचे व गुंतागुतींचे शहर आहे़ आग लागल्यावर पहिला एक तास महत्त्वाचा असतो़ पालिकेने या समस्येवर त्वरित तोडगा काढून नवीन बंब खरेदी करावा. - डॉ़ प्रकाश पोरे, नागरिक, वाई