शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा खासदारांची मर्दुमकी कुठे गेली होती?

By admin | Updated: March 15, 2017 22:51 IST

शिवेंद्रसिंहराजे : अंगलट आले की मुद्दा सोडून गुद्याची भाषा

सातारा : ‘अजिंक्य उद्योग समूहाबाबत खोटेनाटे आरोप करायचे आणि मूळ मुद्द्याला बगल द्यायची, ही खासदारांची जुनी सवय आहे. अधिवेशनाला गैरहजर राहणारे खासदार म्हणून उदयनराजेंना माध्यमांनीच गौरवले आहे. असे असताना सातबारा कोरा करण्याच्या मुद्द्याला अधिवेशनाचे कारण पुढे करून खासदार बगल देत आहेत. अंगलट येऊ लागले की नेहमीप्रमाणे मुद्दे सोडून गुद्याची भाषा खासदार साहेब करत आहेत. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेसमोर खासदारांच्या समोर मी एकटा उभा होतो. पेपरबाजीतून वेळ आणि ठिकाण विचारणाऱ्या खासदारांची मर्दुमकी त्यावेळी कुठे गेली होती? आखिर, उदयनराजें को इतना गुस्सा क्यों आता है,’ असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘पेपरबाजी, पत्रकबाजीची हौस तुम्हालाच आहे. मताधिक्य, मताधिक्य म्हणून स्वत: जिल्ह्याचे नेते असा गोड गैरसमज बाळगणाऱ्या उदयनराजेंना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पराभव चाखावा लागला. खासदारकीच्या मताधिक्याचा एवढा अभिमान होता तर, जिल्ह्यात सोडाच सातारा तालुक्यातही सातारा विकास आघाडीला उमेदवार का मिळाले नाहीत? सातारा आणि जावळीतील जनतेने माझ्यावर आणि राष्ट्रवादी पक्षावर विश्वास दाखवून तुमचे मनसुबे धुळीस मिळवले. त्यामुळेच तुमची तळपायाची आग मस्तकात जात आहे. जनताच माझा पक्ष अशी घोकमपट्टी करणाऱ्या खासदारांचे जनतेबद्दलचे बेडगी प्रेम उघड झाल्याने बेताल वक्तव्ये सुरू आहेत. तुम्ही बोलला की मी तुम्ही केलेल्या आरोपांबद्दलची वस्तुस्थिती परखडपणे जनतेसमोर मांडणारच. यापुढे कोणत्याही बाबतीत तुम्हाला सुटी मिळणार नाही. पराभव पचवता येत नाही म्हणून भडक वक्तव्ये करायची, हे कदापि चालू देणार नाही. ‘आपण अधिवेशनाला हजर असता का नाही हे माध्यमांनी वारंवार सिद्ध केले आहे. आता माझ्या सांगण्यावरून तर माध्यमांमध्ये बातम्या छापत नाहीत. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी अधिवेशनाचे कारण कशाला पुढे करता? एक घाव दोन तुकडे नाही, एक घाव चार तुकडे करा; पण ते जरा लवकर करा आणि शेतकऱ्यांना कायमचा दिलासा द्या.पोकळ बडबड करण्यात वेळ कशाला वाया घालवता,’ अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेंच्या शेतकऱ्यांबद्दलच्या बेगडी प्रेमाचा समाचार घेतला. ‘मनोमिलन आहे का तुटले याबाबत जो माणूस ज्येष्ठांसमोर तोंडावर सांगू शकत नाही, पाच मिनिटांत परत येतो, असे सांगून बैठकीतून पळ काढतो, यालाच मर्दुमकी म्हणणार का? काही दिवसांपूर्वीच सातारा नगरपालिका कार्यालयासमोर खासदारांच्या समोर मी एकटा उभा होतो. वेळ, ठिकाण सांगा अशी तोंडाची हवा करणाऱ्या खासदारांची मर्दुमकी त्यावेळी कोठे दडून बसली होती? असा सवालही शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)...त्यामुळेच तुमचा राजकीय पुनर्जन्म झालाखासदारकीच्या आधी तुमचे अस्तित्व काय होते, हे सर्वश्रूत आहे. भाजपाच्या तिकिटावर आमदार झाला आणि तुमच्या कर्तृत्वामुळेच केवळ एक-दोन वर्षापुरते पदावर राहिलात. त्यानंतर पराभवच तुमच्या पाचवीला पुजला होता. पराभवापाठोपाठ पराभव पदरी पडल्याने तुम्ही अस्तित्वहीन झाला होता. मात्र, घराण्यातील ज्येष्ठांनी मनोमिलन घडवून आणले, त्यामुळे तुमचा राजकीय पुनर्जन्म झाला, ही वस्तुस्थिती नाकारणे चुकीचे आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून खासदारकी, जिल्हा बँकेचे संचालकपद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीमध्ये तुम्हाला स्थान दिले. हे फक्त मी तुमच्या बरोबर होतो म्हणून मिळाले. त्यामुळे जास्त फुशारक्या मारू नका.खासदारकी तालुक्यापुरतीच मर्यादित‘खासदारकीच्या मताधिक्यावरून आमदारकीचे आखाडे बांधणाऱ्या उदयनराजेंना एवढी घमेंड होती तर, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राजधानी जिल्हा विकास आघाडीची सत्ता का आणता आली नाही? त्यामुळे आमच्या आमदारकीची चिंता सोडा. तुमचे मताधिक्य आणि खासदारकी सातारा तालुक्यापुरतीच मर्यादित राहिली आणि तुमची कुवत काय हे जनतेला कळून चुकले. त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीतही तुमचे अस्तित्व काय हे तुम्हाला दिसेल,’ असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला. वेळ न दवडता फायलींचे गाठोडे उघड करा...‘तुमचं पक्षातील स्थान, वलय याबद्दल मला कोणताही प्रश्न नाही आणि कोडही पडत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्ष आणि पक्षश्रेष्ठींनी तुमचे स्थान काय हे दाखवून दिले आहेच. यापूर्वीही उदयनराजेंनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून फायली उघड करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तेव्हाही मी ज्या काही फायली असतील त्या योग्य ठिकाणी उघड करा, योग्य ती कार्यवाही माझ्यावर होईल, असे सांगितले होते. तुम्हाला कोणी अडवले आहे? अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. त्यामुळे खासदारांनी वेळ न दवडता फायलींचे जे काही गाठोडे असेल ते उघड करावे,’ असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.