शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

...तेव्हा खासदारांची मर्दुमकी कुठे गेली होती?

By admin | Updated: March 15, 2017 22:51 IST

शिवेंद्रसिंहराजे : अंगलट आले की मुद्दा सोडून गुद्याची भाषा

सातारा : ‘अजिंक्य उद्योग समूहाबाबत खोटेनाटे आरोप करायचे आणि मूळ मुद्द्याला बगल द्यायची, ही खासदारांची जुनी सवय आहे. अधिवेशनाला गैरहजर राहणारे खासदार म्हणून उदयनराजेंना माध्यमांनीच गौरवले आहे. असे असताना सातबारा कोरा करण्याच्या मुद्द्याला अधिवेशनाचे कारण पुढे करून खासदार बगल देत आहेत. अंगलट येऊ लागले की नेहमीप्रमाणे मुद्दे सोडून गुद्याची भाषा खासदार साहेब करत आहेत. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेसमोर खासदारांच्या समोर मी एकटा उभा होतो. पेपरबाजीतून वेळ आणि ठिकाण विचारणाऱ्या खासदारांची मर्दुमकी त्यावेळी कुठे गेली होती? आखिर, उदयनराजें को इतना गुस्सा क्यों आता है,’ असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘पेपरबाजी, पत्रकबाजीची हौस तुम्हालाच आहे. मताधिक्य, मताधिक्य म्हणून स्वत: जिल्ह्याचे नेते असा गोड गैरसमज बाळगणाऱ्या उदयनराजेंना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पराभव चाखावा लागला. खासदारकीच्या मताधिक्याचा एवढा अभिमान होता तर, जिल्ह्यात सोडाच सातारा तालुक्यातही सातारा विकास आघाडीला उमेदवार का मिळाले नाहीत? सातारा आणि जावळीतील जनतेने माझ्यावर आणि राष्ट्रवादी पक्षावर विश्वास दाखवून तुमचे मनसुबे धुळीस मिळवले. त्यामुळेच तुमची तळपायाची आग मस्तकात जात आहे. जनताच माझा पक्ष अशी घोकमपट्टी करणाऱ्या खासदारांचे जनतेबद्दलचे बेडगी प्रेम उघड झाल्याने बेताल वक्तव्ये सुरू आहेत. तुम्ही बोलला की मी तुम्ही केलेल्या आरोपांबद्दलची वस्तुस्थिती परखडपणे जनतेसमोर मांडणारच. यापुढे कोणत्याही बाबतीत तुम्हाला सुटी मिळणार नाही. पराभव पचवता येत नाही म्हणून भडक वक्तव्ये करायची, हे कदापि चालू देणार नाही. ‘आपण अधिवेशनाला हजर असता का नाही हे माध्यमांनी वारंवार सिद्ध केले आहे. आता माझ्या सांगण्यावरून तर माध्यमांमध्ये बातम्या छापत नाहीत. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी अधिवेशनाचे कारण कशाला पुढे करता? एक घाव दोन तुकडे नाही, एक घाव चार तुकडे करा; पण ते जरा लवकर करा आणि शेतकऱ्यांना कायमचा दिलासा द्या.पोकळ बडबड करण्यात वेळ कशाला वाया घालवता,’ अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेंच्या शेतकऱ्यांबद्दलच्या बेगडी प्रेमाचा समाचार घेतला. ‘मनोमिलन आहे का तुटले याबाबत जो माणूस ज्येष्ठांसमोर तोंडावर सांगू शकत नाही, पाच मिनिटांत परत येतो, असे सांगून बैठकीतून पळ काढतो, यालाच मर्दुमकी म्हणणार का? काही दिवसांपूर्वीच सातारा नगरपालिका कार्यालयासमोर खासदारांच्या समोर मी एकटा उभा होतो. वेळ, ठिकाण सांगा अशी तोंडाची हवा करणाऱ्या खासदारांची मर्दुमकी त्यावेळी कोठे दडून बसली होती? असा सवालही शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)...त्यामुळेच तुमचा राजकीय पुनर्जन्म झालाखासदारकीच्या आधी तुमचे अस्तित्व काय होते, हे सर्वश्रूत आहे. भाजपाच्या तिकिटावर आमदार झाला आणि तुमच्या कर्तृत्वामुळेच केवळ एक-दोन वर्षापुरते पदावर राहिलात. त्यानंतर पराभवच तुमच्या पाचवीला पुजला होता. पराभवापाठोपाठ पराभव पदरी पडल्याने तुम्ही अस्तित्वहीन झाला होता. मात्र, घराण्यातील ज्येष्ठांनी मनोमिलन घडवून आणले, त्यामुळे तुमचा राजकीय पुनर्जन्म झाला, ही वस्तुस्थिती नाकारणे चुकीचे आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून खासदारकी, जिल्हा बँकेचे संचालकपद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीमध्ये तुम्हाला स्थान दिले. हे फक्त मी तुमच्या बरोबर होतो म्हणून मिळाले. त्यामुळे जास्त फुशारक्या मारू नका.खासदारकी तालुक्यापुरतीच मर्यादित‘खासदारकीच्या मताधिक्यावरून आमदारकीचे आखाडे बांधणाऱ्या उदयनराजेंना एवढी घमेंड होती तर, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राजधानी जिल्हा विकास आघाडीची सत्ता का आणता आली नाही? त्यामुळे आमच्या आमदारकीची चिंता सोडा. तुमचे मताधिक्य आणि खासदारकी सातारा तालुक्यापुरतीच मर्यादित राहिली आणि तुमची कुवत काय हे जनतेला कळून चुकले. त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीतही तुमचे अस्तित्व काय हे तुम्हाला दिसेल,’ असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला. वेळ न दवडता फायलींचे गाठोडे उघड करा...‘तुमचं पक्षातील स्थान, वलय याबद्दल मला कोणताही प्रश्न नाही आणि कोडही पडत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्ष आणि पक्षश्रेष्ठींनी तुमचे स्थान काय हे दाखवून दिले आहेच. यापूर्वीही उदयनराजेंनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून फायली उघड करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तेव्हाही मी ज्या काही फायली असतील त्या योग्य ठिकाणी उघड करा, योग्य ती कार्यवाही माझ्यावर होईल, असे सांगितले होते. तुम्हाला कोणी अडवले आहे? अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. त्यामुळे खासदारांनी वेळ न दवडता फायलींचे जे काही गाठोडे असेल ते उघड करावे,’ असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.