शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: भूस्खलनामुळे उशाशी मरण घेतलेल्या हुंबरळीचे पुनर्वसन कधी ? 

By नितीन काळेल | Updated: August 14, 2024 18:33 IST

ग्रामस्थ आक्रमक: शासनदरबारी विनंती करुनही दुर्लक्ष; आरपारच्या लढाईचा निर्धार 

सातारा : भूस्खलनमुळे गेले तीन वर्षे उशाला मरण घेऊन राहणाऱ्या हुंबरळी ग्रामस्थांनी कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी अनेकवेळा शासन दरबारी अर्ज, विनंत्या केल्या. पण, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे प्रशासन आमच्या मरणाची वाट पाहतेय का ? असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी केला. परिणमाी आता ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला असून आरपारच्या लढाईचाही निर्धार केला आहे.२०२१ मधील जुलै महिन्यात जिल्ह्यातील पश्चिम भागात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी २१ जुलै रोजी पाटण तालुक्यात भूस्खलनच्या घटना घडलेल्या. या भूस्खलनमध्ये कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी येथे भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. या नंतर या भूस्खलनग्रस्त ३ गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत तत्कालीन पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार या तिन्ही गावांचे कायमस्वरूपी १०० टक्के पुनर्वसन करण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावानुसार मिरगाव आणि ढोकावळे या गावातील सर्व बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र, हुंबरळी गावात भूस्खलन झाले आहे. तरीही हुंबरळीच्या नावाखाली तेथीलच एक वाडीला पुनर्वसनामध्ये सहभागी करून घेण्यात आले. मात्र, २०२१ ला ज्या बाधित कुटुंबाचे नुकसान झाले त्यांना पुनर्वसनाच्या यादीत घेतले नाही. ज्यांचे एका पै चेही नुकसान झाले नाही अशा कुटुंबांना पुनर्वसनाचा लाभ देण्याचा प्रकार झाला आहे, असे आता ग्रामस्थ सांगत आहेत.याबाबत बाधित झालेल्या हुंबरळी येथील कुटुंबांनी न्याय मागणीसाठी तीनवर्षे प्रशासनाचे उंबरोही झिजवले. मात्र, प्रशासनाला आमच्या न्याय मागणीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, अशी खंतही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे हुंबरळी ग्रामस्थांनी आता आरपारच्या लढाईचा निर्धार केला आहे. यासाठी स्वातंत्र्यदिनापासून उपोषण सुरू करण्यात येणार आहे.

झारीतील शुक्राचार्य कोण ?२०२१ मध्ये हुंबरळीचे भूस्खलनमध्ये नुकसान होऊनही गावाला कायमस्वरूपी पुनर्वसनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यामागील झारीतील शुक्राचार्य कोण आहे, असा सवालही ग्रामस्थ विचारात आहेत. तसेच तीन वर्षे मरण उशाला घेऊन २३४ कुटुंबे राहत आहेत. त्यामुळे पुन्हा भूस्खलन होऊन ग्रामस्थांच्या मरणाची वाट शासन बघत आहे का ? असा प्रश्नही विचारला जात आहे. तर याबाबत आम्हाला मरायचे नाही. आमच्या भावी पिढीसाठी जगायचे आहे, म्हणूनच स्वातंत्र्यदिनी लोकशाही मार्गाने गावाच्या स्वांतत्र्यासाठी सर्व ग्रामस्थ लढाईसाठी तयार आहेत, अशा आशयाचे निवेदनही ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन