शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा शेखर गोरे परराज्यात: सुरेखाताई पखाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:27 IST

दहिवडी : ‘वरकुटे-मलवडी येथील सौरऊर्जा कंपनीविरोधात शेतकºयाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शेखरगोरे लढत होते.

ठळक मुद्दे कारवाईच्या विरोधात दहिवडीत आज राष्टÑवादी कार्यकर्त्यांचा मेळावा२५ आॅक्टोबरला कोलकत्ता ते मुंबई असा विमान प्रवास करत होते.

दहिवडी : ‘वरकुटे-मलवडी येथील सौरऊर्जा कंपनीविरोधात शेतकºयाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शेखरगोरे लढत होते. याचाच राग मनात धरून राजकीय षडयंत्र रचत शेखर गोरे राज्यातही नसताना त्यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला. याविरोधात जनता आक्रमक झाली,’ अशी माहिती त्यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले यांनी दिली.दहिवडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे, नगराध्यक्ष तुषार विरकर उपस्थित होते.

पखाले म्हणाल्या, ‘वरकुटे-मलवडी येथील शेतकरी बापूराव हणमंत जगदाळे यांची जमीन कंपनीने घेतलेल्या जमिनीलगत होती. त्यांच्या मिळकतीत संबंधित कंपन्यांनी बेकायदेशीर व औद्योगिक अकृषिक कामे सुरू केली होती. जमिनीची वाटणी झालेली नसल्याने स्वतंत्र वहिवाटी नव्हत्या. तरीही कंपन्यांनी कामे सुरूच केली होती. याविरोधात संबंधित शेतकºयाने प्रशासनाकडे १२ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन कंपनीचे काम चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावे, अशी मागणी केली होती. मात्र प्रशासनाने त्यांची दखल घेतली नव्हती. त्यामुळे त्या शेतकºयाने शेखरभाऊ गोरे यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेखर गोरेंनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे कंपनीविरोधात कारवाईची मागणी केली. निवेदनाची प्रशासनाने तत्काळ दखल घेत २२ सप्टेंबर रोजी बेकायदा उत्खनन करून कंपनीच्या परिसरात उभारलेली वाहने, बेकायदा उत्खनन, बांधकाम तसेच गौण खनिजसाठा केल्याबाबतचा पंचनामा केला होता. प्रशासनाने अनधिकृत गौनखनिज उत्खननप्रकरणी संबंधित कंपन्यांना नोटीस पाठविली होती. याचा राग मनात धरून कंपनी व्यवस्थापनाने षडयंत्र रचत शेखरभाऊ गोरे यांच्यावर खंडणी व इतर गुन्हे दाखल केले.’ पाहता शेखर गोरे हे २१ आॅक्टोबर रोजी हैद्राबाद ते कोलकत्ता तर वरकुटे-मलवडी कंपनीत प्रकार घडला त्यादिवशी २५ आॅक्टोबरला कोलकत्ता ते मुंबई असा विमान प्रवास करत होते.

विमान तिकीट, तेथील सीसीटीव्ही फुटेजही पाहिले तर सत्यता बाहेर पडणार आहे. तरीही त्यांचे नाव याप्रकरणात गोवण्यात आले. कायदेशीर कागदपत्रांती पूर्तता करताना शेखर गोरे यांनी आपण परराज्यात असल्याचे सबळ पुरावे सादर केले आहेत. तरीही प्रशासनाने राजकीय दबावापोटी त्यांच्या नावावर गुन्हे दाखल करत मोक्क्याची चुकीची कारवाई केली आहे,’ असा आरोपही पखाले यांनी केला. 

कंपनीने माझ्या मिळकतीत काम सुरू केल्याची तक्रार मी प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने दखल न घेतल्याने मी शेखर गोरे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते. याचाच राग मनात धरत खोटी कारवाई केली आहे.- बापूराव हणमंत जगदाळे, वरकुटे-मलवडीशेखर गोरे हे स्वत:च्या कुटुंबापेक्षा जनतेसाठी जास्त वेळ देतात. त्यांनी जनतेसाठी खूप कामे केली आहेत. आता भाऊंच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची वेळी आली आहे. चुकीच्या कारवाईमुळे कार्यकर्त्यांवर आघात झाला आहे. या परिस्थितीचा धैर्याने सामना करू या. यातून ते निश्चितच बाहेर पडणार आहेत.- सोनलताई गोरे