शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा शेखर गोरे परराज्यात: सुरेखाताई पखाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:27 IST

दहिवडी : ‘वरकुटे-मलवडी येथील सौरऊर्जा कंपनीविरोधात शेतकºयाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शेखरगोरे लढत होते.

ठळक मुद्दे कारवाईच्या विरोधात दहिवडीत आज राष्टÑवादी कार्यकर्त्यांचा मेळावा२५ आॅक्टोबरला कोलकत्ता ते मुंबई असा विमान प्रवास करत होते.

दहिवडी : ‘वरकुटे-मलवडी येथील सौरऊर्जा कंपनीविरोधात शेतकºयाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शेखरगोरे लढत होते. याचाच राग मनात धरून राजकीय षडयंत्र रचत शेखर गोरे राज्यातही नसताना त्यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला. याविरोधात जनता आक्रमक झाली,’ अशी माहिती त्यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले यांनी दिली.दहिवडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे, नगराध्यक्ष तुषार विरकर उपस्थित होते.

पखाले म्हणाल्या, ‘वरकुटे-मलवडी येथील शेतकरी बापूराव हणमंत जगदाळे यांची जमीन कंपनीने घेतलेल्या जमिनीलगत होती. त्यांच्या मिळकतीत संबंधित कंपन्यांनी बेकायदेशीर व औद्योगिक अकृषिक कामे सुरू केली होती. जमिनीची वाटणी झालेली नसल्याने स्वतंत्र वहिवाटी नव्हत्या. तरीही कंपन्यांनी कामे सुरूच केली होती. याविरोधात संबंधित शेतकºयाने प्रशासनाकडे १२ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन कंपनीचे काम चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावे, अशी मागणी केली होती. मात्र प्रशासनाने त्यांची दखल घेतली नव्हती. त्यामुळे त्या शेतकºयाने शेखरभाऊ गोरे यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेखर गोरेंनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे कंपनीविरोधात कारवाईची मागणी केली. निवेदनाची प्रशासनाने तत्काळ दखल घेत २२ सप्टेंबर रोजी बेकायदा उत्खनन करून कंपनीच्या परिसरात उभारलेली वाहने, बेकायदा उत्खनन, बांधकाम तसेच गौण खनिजसाठा केल्याबाबतचा पंचनामा केला होता. प्रशासनाने अनधिकृत गौनखनिज उत्खननप्रकरणी संबंधित कंपन्यांना नोटीस पाठविली होती. याचा राग मनात धरून कंपनी व्यवस्थापनाने षडयंत्र रचत शेखरभाऊ गोरे यांच्यावर खंडणी व इतर गुन्हे दाखल केले.’ पाहता शेखर गोरे हे २१ आॅक्टोबर रोजी हैद्राबाद ते कोलकत्ता तर वरकुटे-मलवडी कंपनीत प्रकार घडला त्यादिवशी २५ आॅक्टोबरला कोलकत्ता ते मुंबई असा विमान प्रवास करत होते.

विमान तिकीट, तेथील सीसीटीव्ही फुटेजही पाहिले तर सत्यता बाहेर पडणार आहे. तरीही त्यांचे नाव याप्रकरणात गोवण्यात आले. कायदेशीर कागदपत्रांती पूर्तता करताना शेखर गोरे यांनी आपण परराज्यात असल्याचे सबळ पुरावे सादर केले आहेत. तरीही प्रशासनाने राजकीय दबावापोटी त्यांच्या नावावर गुन्हे दाखल करत मोक्क्याची चुकीची कारवाई केली आहे,’ असा आरोपही पखाले यांनी केला. 

कंपनीने माझ्या मिळकतीत काम सुरू केल्याची तक्रार मी प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने दखल न घेतल्याने मी शेखर गोरे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते. याचाच राग मनात धरत खोटी कारवाई केली आहे.- बापूराव हणमंत जगदाळे, वरकुटे-मलवडीशेखर गोरे हे स्वत:च्या कुटुंबापेक्षा जनतेसाठी जास्त वेळ देतात. त्यांनी जनतेसाठी खूप कामे केली आहेत. आता भाऊंच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची वेळी आली आहे. चुकीच्या कारवाईमुळे कार्यकर्त्यांवर आघात झाला आहे. या परिस्थितीचा धैर्याने सामना करू या. यातून ते निश्चितच बाहेर पडणार आहेत.- सोनलताई गोरे