शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चाक खड्ड्यात; दणका मणक्यात!

By admin | Updated: July 13, 2016 00:45 IST

सातारा मध्यवर्ती बसस्थानक : खड्ड्यातील पाण्यात एसटी पाहतेय स्वत:चे प्रतिबिंब

जावेद खान --सातारासातारा : ‘चला... सातारा आलंय, कोण उतरणार आहे का?’ असे सांगण्याची वेळ एसटी वाहकांवर येत होती. आता मात्र काळ बदलला आहे. बाहेरगावाहून एसटी बसस्थानकात आल्यावर त्यांना साताऱ्यात आल्याचे सांगण्याची गरजच भासत नाही. भल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये चाक गेल्यावर मणक्यात दणका बसतो अन् सातारा आल्याची चाहूल लागते.जिल्ह्यात बारा दिवसांपासून पावसाची संततधार वाढायला लागली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठत आहे. याचा फटका रस्त्यांना बसला असून, ठिकठिकाणी खड्डे पडायला लागले आहे. याचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसायला लागला आहे.पुणे-कोल्हापूर मार्गावर सातारा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज शेकडो एसटी बसेसची वर्दळ असते. या बसस्थानकात मोठा ताण असल्याने याच्या डागडुजीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.प्रवाशांना डोकेदुखीप्रवासी पहाटे साखर झोपेत असताना इनगेटमध्ये गाडीने प्रवास केल्यानंतर मोठा हादरा बसतो. यामुळे मणक्याला दणका बसल्याने अनेकांना पाठदुखीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. चालक-वाहकांचेही आरोग्य धोक्यात येत आहे.माणच्या राजकारणाला मानापमानाचा रंग!राष्ट्रवादीतील बेबनाव : सुभाष नरळे अध्यक्षपदी विराजमान होताच शिवाजीराव शिंदेंच्या अविश्वास ठरावाची खेळीसातारा : राष्ट्रवादीच्या संपूर्ण देशातील एकमेव असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यात पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या ५४ वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदाचा बहुमान सुभाष नरळे यांच्या रूपाने माण तालुक्याला देऊन राष्ट्रवादीने बेरजेचे राजकारण केल्याचे वातावरण तयार झाले असतानाच कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर अविश्वास ठरावाचा ‘वार’ करण्यात आला आहे. हा वार जिव्हारी लागल्याने शिवाजीराव शिंदे संतापाने पेटले आहेत. त्यांनी पक्षाच्या या धोरणाला कडाडून विरोधही केला आहे. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे विश्वासू माणिकराव सोनवलकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कुणाची वर्णी लागणार? याची जोरदार चर्चा होती. माण-खटाव तालुक्यांतील राष्ट्रवादीला आलेली राजकीय अवकळा दूर करण्यासाठी रामराजे माण तालुक्याला राष्ट्रवादीतर्फे अध्यक्षपदाची संधी देणार, असे स्पष्ट होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्याला अध्यक्षपद देऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. साहजिकच इतर तालुक्यांतील इच्छुक उमेदवारांची नावे बाजूला पडून माण तालुक्यातीलच एका जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्षपदावर संधी मिळणार हे स्पष्ट झाले होते. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानामध्ये सोमवारी सकाळी रामराजे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष निवडीची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष कुणाला करायचे, याची चर्चा झाली. रामराजेंनी नरळे यांचे नाव जाहीर केले. लोणंदचे आनंदराव शेळके-पाटील यांचे नाव मागे पडले. अध्यक्षपदासाठी नरळे बिनविरोध निवडले गेले. मात्र, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता या निवडीची सभा झाली, तेव्हा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात एक कागद फिरत होता. प्रथमदर्शनी अध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादीने बजावलेल्या व्हीपवर सह्या घेतल्या जात आहेत, हे चित्र दिसले तरी त्यामागे बरेचसे राजकारण दडले होते. या कागदावर सह्या करत असताना अनेक सदस्यांनी त्यावर शंका उपस्थित केली; परंतु व्हीप असल्याचे वातावरण तयार झाल्याने अनेक सदस्यांनी त्यावर सह्या केल्या. अध्यक्ष निवडीनंतर सर्वांच्या वतीने सुभाष नरळे यांचा सत्कारही करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात कृषी सभापती शिवाजीराव शिंदे हेही सहभागी झाले होते. याच वातावरणात शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव करण्याचे काम सुरू होते. याची सूतराम कल्पना ना शिंदेंना होती... ना या ठरावावर सह्या करणाऱ्या बहुतांश सदस्यांना! सदस्यांना अंधारात ठेवून राष्ट्रवादीने कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या काय?, असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेला हा चोरी-छुपकेचा मामला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय रंग दाखवेल, हे येत्या काळातच समोर येऊ शकणार आहे.कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांना राष्ट्रवादीतर्फे राजीनामा मागितला होता, कोऱ्या कागदावर सही घेऊन चुकीच्या पद्धतीने राजीनामा घेण्यात आल्याची तक्रार शिंदे यांनी केली होती. या चुकीच्या पद्धतीविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्याने ते पदावर राहिले. आता पुन्हा गुण्यागोविंदाने शिंदे यांचा ‘प्रपंच’ सुरू असतानाच त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा डाव टाकण्यात आला आहे. (प्रतिनिधी)