शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

नववी ते बारावीच्या मुलांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विनापरीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे राज्य सरकारने नुकतेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विनापरीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही शालेय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना विनापरीक्षा वरील वर्गात पाठविण्याचे जाहीर केले आहे. मात्र नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शासनाची सापत्नीक भूमिका का, असा सवाल पालक-विद्यार्थीवर्गातून उमटत आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक घोषणा ठरली, तर नववी ते बारावी विद्यार्थ्यांबाबत घोर निराशाच पदरी पडली असेच म्हणावे लागेल.

यावर्षी पहिली ते आठवीच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू न करता आल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गात प्रारंभीपासूनच शैक्षणिक चिंतेचे वातावरण होते. मात्र, कमी कालावधीकरिता प्रत्यक्ष वर्ग अध्यापन शक्य झाले होते. परंतु कोरोना महामारीचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याकारणाने अल्पावधीतच वर्ग अध्यापन बंद करून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले. याचा शैक्षणिक फटका गुणवत्ता यादीत क्रमवारीत असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चित बसत आहे. पहिली ते आठवी विद्यार्थ्यांबाबतीत राज्य शासन शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय म्हणजे नववी ते बारावी मुला-मुलींच्या बाबतीत सापत्नीक शैक्षणिक वागणूकच ठरत आहे.

राज्य शासनाने कोविड-१९मुळे उद‌्भवलेली परिस्थिती पाहता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेसंदर्भातील मनातील चलबिचल थांबविण्यासाठी राज्य शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकवर्गातून जोर धरू लागली आहे.

कोट येणार आहे.