शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

नववी ते बारावीच्या मुलांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विनापरीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे राज्य सरकारने नुकतेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विनापरीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही शालेय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना विनापरीक्षा वरील वर्गात पाठविण्याचे जाहीर केले आहे. मात्र नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शासनाची सापत्नीक भूमिका का, असा सवाल पालक-विद्यार्थीवर्गातून उमटत आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक घोषणा ठरली, तर नववी ते बारावी विद्यार्थ्यांबाबत घोर निराशाच पदरी पडली असेच म्हणावे लागेल.

यावर्षी पहिली ते आठवीच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू न करता आल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गात प्रारंभीपासूनच शैक्षणिक चिंतेचे वातावरण होते. मात्र, कमी कालावधीकरिता प्रत्यक्ष वर्ग अध्यापन शक्य झाले होते. परंतु कोरोना महामारीचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याकारणाने अल्पावधीतच वर्ग अध्यापन बंद करून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले. याचा शैक्षणिक फटका गुणवत्ता यादीत क्रमवारीत असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चित बसत आहे. पहिली ते आठवी विद्यार्थ्यांबाबतीत राज्य शासन शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय म्हणजे नववी ते बारावी मुला-मुलींच्या बाबतीत सापत्नीक शैक्षणिक वागणूकच ठरत आहे.

राज्य शासनाने कोविड-१९मुळे उद‌्भवलेली परिस्थिती पाहता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेसंदर्भातील मनातील चलबिचल थांबविण्यासाठी राज्य शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकवर्गातून जोर धरू लागली आहे.

कोट येणार आहे.