शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

पश्चिमेचा चारा पूर्वेला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST

धो-धो पाऊस पडत असलेल्या पश्चिमेकडील शेतकऱ्यांना चाऱ्याची कधी कमतरता भासली नाही. या भागातील जनावरांना चारा मुबलक मिळत होता. त्यामुळे ...

धो-धो पाऊस पडत असलेल्या पश्चिमेकडील शेतकऱ्यांना चाऱ्याची कधी कमतरता भासली नाही. या भागातील जनावरांना चारा मुबलक मिळत होता. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच गुराखी पावसाळ्यात चांगले गवत उगवावे, यासाठी डोंगर पेटवून टाकत होते. त्याचवेळी पाचवीलाच दुष्काळ पूजलेल्या माण खटावमधील बळीराजा मात्र पशुधन वाचविण्यासाठी धडपड करत असायचा. हे चित्र कुठे तरी थांबले पाहिजे, या विचाराने ‘लोकमत’ने २०१३ या वर्षाच्या उगवत्या सूर्याच्या साक्षीने एक अनोखी चळवळ उभारली. पश्चिमेकडील डोंगरावरील चारा जाळून टाकला म्हणून काहीच हाती मिळत नाही, तो आपण कापून आपल्या जिल्ह्यातील एका भागातील दुष्काळी शेतकऱ्यांना दिला तर मुक्या जनावरांचे पोट तरी भरेल. याबाबत जनजागृती केली. सुरुवातीला यासाठी काही प्रायोजक मिळाले. हा विचार पटला आणि काहींनी स्वतःचा ट्रक दिला. काही उद्योजकांनी त्यासाठी इंधन उपलब्ध करून दिले तर अनेकांनी हे दोन्ही आमच्याकडे नाही म्हणून गवत कापण्यासाठी त्यांचा वेळ आणि श्रम खर्ची केला.

पाहता पाहता ही चळवळ लोकचळवळ बनू पाहत होती. यामध्ये जिल्ह्यातील अनेक सामाजिक, राजकीय संघटना, गणेशोत्सव मंडळे सहभागी होत होती. यासाठी आम्ही काय करू शकतो याबाबत विचारणा केली जात होती. दरम्यान, माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचा वाढदिवस आणि त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस होता. दोन्ही नेत्यांनी वाढदिवसावर होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चात कपात करून त्यांनी या भागातून चारा पूर्वेला पाठविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या सर्व मोहिमेत तब्बल पाचशेहून अधिक ट्रक चारा हा पूर्वेला गेला होता. पुढे याची दखल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घ्यावी लागली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चळवळीत गवत कापण्याचे काम करणाऱ्यांसाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मानधन कसे देता येईल याबाबत सूचना केल्या होत्या.

चौकट...

विझले वणव्याचे बोळे... हाती आले विळे

‘तुम्ही जे जाळता गवत, ते बनू शकते दुष्काळी भागातील जनावरांसाठी खाद्य’, हे पटवून दिले. परंपरेपेक्षा माणुसकी मोठी यावर गावागावांत एकमत होऊ लागले. मग विझले गेले विस्तवाचे बोळे आणि हाती आले गवत कापण्याचे विळे! ग्रामस्थांनी श्रमदानातून कापणी सुरू केली. सुरुवातीला काही छावण्यांमध्ये हा चारा मोफत वाटला गेला तर काही गावांत थेट घरपोच दिला गेला.

चौकट

माणने अनुभवले तीन भयानक दुष्काळ

माण तालुक्यात १९७२ ला पहिला मोठा दुष्काळ पडला. तेव्हा लोकांना खायला अन्न, जनावराला चारा व हाताला काम नव्हते. २००२-२००३ च्या दुष्काळात शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या केल्या. पहिल्यांदाच खासगी टँकरने पाणी पुरवठा केला. तर २०१२ चा दुष्काळ थोडा वेगळा ठरला. धान्याची टंचाई नव्हती. पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र, जनावरांना चारा नव्हता. त्यामुळे पुन्हा जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या. चारा छावण्या सुरु करताना निकष बदलले. ५०० जनावरांची अट घालण्यात आली.

- जगदीश कोष्टी

फोटो

प्रुफ/२७संडे/२७चारा०१,०२