शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

पश्चिमेचा चारा पूर्वेला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST

धो-धो पाऊस पडत असलेल्या पश्चिमेकडील शेतकऱ्यांना चाऱ्याची कधी कमतरता भासली नाही. या भागातील जनावरांना चारा मुबलक मिळत होता. त्यामुळे ...

धो-धो पाऊस पडत असलेल्या पश्चिमेकडील शेतकऱ्यांना चाऱ्याची कधी कमतरता भासली नाही. या भागातील जनावरांना चारा मुबलक मिळत होता. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच गुराखी पावसाळ्यात चांगले गवत उगवावे, यासाठी डोंगर पेटवून टाकत होते. त्याचवेळी पाचवीलाच दुष्काळ पूजलेल्या माण खटावमधील बळीराजा मात्र पशुधन वाचविण्यासाठी धडपड करत असायचा. हे चित्र कुठे तरी थांबले पाहिजे, या विचाराने ‘लोकमत’ने २०१३ या वर्षाच्या उगवत्या सूर्याच्या साक्षीने एक अनोखी चळवळ उभारली. पश्चिमेकडील डोंगरावरील चारा जाळून टाकला म्हणून काहीच हाती मिळत नाही, तो आपण कापून आपल्या जिल्ह्यातील एका भागातील दुष्काळी शेतकऱ्यांना दिला तर मुक्या जनावरांचे पोट तरी भरेल. याबाबत जनजागृती केली. सुरुवातीला यासाठी काही प्रायोजक मिळाले. हा विचार पटला आणि काहींनी स्वतःचा ट्रक दिला. काही उद्योजकांनी त्यासाठी इंधन उपलब्ध करून दिले तर अनेकांनी हे दोन्ही आमच्याकडे नाही म्हणून गवत कापण्यासाठी त्यांचा वेळ आणि श्रम खर्ची केला.

पाहता पाहता ही चळवळ लोकचळवळ बनू पाहत होती. यामध्ये जिल्ह्यातील अनेक सामाजिक, राजकीय संघटना, गणेशोत्सव मंडळे सहभागी होत होती. यासाठी आम्ही काय करू शकतो याबाबत विचारणा केली जात होती. दरम्यान, माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचा वाढदिवस आणि त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस होता. दोन्ही नेत्यांनी वाढदिवसावर होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चात कपात करून त्यांनी या भागातून चारा पूर्वेला पाठविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या सर्व मोहिमेत तब्बल पाचशेहून अधिक ट्रक चारा हा पूर्वेला गेला होता. पुढे याची दखल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घ्यावी लागली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चळवळीत गवत कापण्याचे काम करणाऱ्यांसाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मानधन कसे देता येईल याबाबत सूचना केल्या होत्या.

चौकट...

विझले वणव्याचे बोळे... हाती आले विळे

‘तुम्ही जे जाळता गवत, ते बनू शकते दुष्काळी भागातील जनावरांसाठी खाद्य’, हे पटवून दिले. परंपरेपेक्षा माणुसकी मोठी यावर गावागावांत एकमत होऊ लागले. मग विझले गेले विस्तवाचे बोळे आणि हाती आले गवत कापण्याचे विळे! ग्रामस्थांनी श्रमदानातून कापणी सुरू केली. सुरुवातीला काही छावण्यांमध्ये हा चारा मोफत वाटला गेला तर काही गावांत थेट घरपोच दिला गेला.

चौकट

माणने अनुभवले तीन भयानक दुष्काळ

माण तालुक्यात १९७२ ला पहिला मोठा दुष्काळ पडला. तेव्हा लोकांना खायला अन्न, जनावराला चारा व हाताला काम नव्हते. २००२-२००३ च्या दुष्काळात शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या केल्या. पहिल्यांदाच खासगी टँकरने पाणी पुरवठा केला. तर २०१२ चा दुष्काळ थोडा वेगळा ठरला. धान्याची टंचाई नव्हती. पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र, जनावरांना चारा नव्हता. त्यामुळे पुन्हा जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या. चारा छावण्या सुरु करताना निकष बदलले. ५०० जनावरांची अट घालण्यात आली.

- जगदीश कोष्टी

फोटो

प्रुफ/२७संडे/२७चारा०१,०२