शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिमेचा चारा पूर्वेला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST

धो-धो पाऊस पडत असलेल्या पश्चिमेकडील शेतकऱ्यांना चाऱ्याची कधी कमतरता भासली नाही. या भागातील जनावरांना चारा मुबलक मिळत होता. त्यामुळे ...

धो-धो पाऊस पडत असलेल्या पश्चिमेकडील शेतकऱ्यांना चाऱ्याची कधी कमतरता भासली नाही. या भागातील जनावरांना चारा मुबलक मिळत होता. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच गुराखी पावसाळ्यात चांगले गवत उगवावे, यासाठी डोंगर पेटवून टाकत होते. त्याचवेळी पाचवीलाच दुष्काळ पूजलेल्या माण खटावमधील बळीराजा मात्र पशुधन वाचविण्यासाठी धडपड करत असायचा. हे चित्र कुठे तरी थांबले पाहिजे, या विचाराने ‘लोकमत’ने २०१३ या वर्षाच्या उगवत्या सूर्याच्या साक्षीने एक अनोखी चळवळ उभारली. पश्चिमेकडील डोंगरावरील चारा जाळून टाकला म्हणून काहीच हाती मिळत नाही, तो आपण कापून आपल्या जिल्ह्यातील एका भागातील दुष्काळी शेतकऱ्यांना दिला तर मुक्या जनावरांचे पोट तरी भरेल. याबाबत जनजागृती केली. सुरुवातीला यासाठी काही प्रायोजक मिळाले. हा विचार पटला आणि काहींनी स्वतःचा ट्रक दिला. काही उद्योजकांनी त्यासाठी इंधन उपलब्ध करून दिले तर अनेकांनी हे दोन्ही आमच्याकडे नाही म्हणून गवत कापण्यासाठी त्यांचा वेळ आणि श्रम खर्ची केला.

पाहता पाहता ही चळवळ लोकचळवळ बनू पाहत होती. यामध्ये जिल्ह्यातील अनेक सामाजिक, राजकीय संघटना, गणेशोत्सव मंडळे सहभागी होत होती. यासाठी आम्ही काय करू शकतो याबाबत विचारणा केली जात होती. दरम्यान, माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचा वाढदिवस आणि त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस होता. दोन्ही नेत्यांनी वाढदिवसावर होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चात कपात करून त्यांनी या भागातून चारा पूर्वेला पाठविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या सर्व मोहिमेत तब्बल पाचशेहून अधिक ट्रक चारा हा पूर्वेला गेला होता. पुढे याची दखल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घ्यावी लागली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चळवळीत गवत कापण्याचे काम करणाऱ्यांसाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मानधन कसे देता येईल याबाबत सूचना केल्या होत्या.

चौकट...

विझले वणव्याचे बोळे... हाती आले विळे

‘तुम्ही जे जाळता गवत, ते बनू शकते दुष्काळी भागातील जनावरांसाठी खाद्य’, हे पटवून दिले. परंपरेपेक्षा माणुसकी मोठी यावर गावागावांत एकमत होऊ लागले. मग विझले गेले विस्तवाचे बोळे आणि हाती आले गवत कापण्याचे विळे! ग्रामस्थांनी श्रमदानातून कापणी सुरू केली. सुरुवातीला काही छावण्यांमध्ये हा चारा मोफत वाटला गेला तर काही गावांत थेट घरपोच दिला गेला.

चौकट

माणने अनुभवले तीन भयानक दुष्काळ

माण तालुक्यात १९७२ ला पहिला मोठा दुष्काळ पडला. तेव्हा लोकांना खायला अन्न, जनावराला चारा व हाताला काम नव्हते. २००२-२००३ च्या दुष्काळात शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या केल्या. पहिल्यांदाच खासगी टँकरने पाणी पुरवठा केला. तर २०१२ चा दुष्काळ थोडा वेगळा ठरला. धान्याची टंचाई नव्हती. पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र, जनावरांना चारा नव्हता. त्यामुळे पुन्हा जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या. चारा छावण्या सुरु करताना निकष बदलले. ५०० जनावरांची अट घालण्यात आली.

- जगदीश कोष्टी

फोटो

प्रुफ/२७संडे/२७चारा०१,०२