शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

शेतात टाकलेल्या मळीने विहिरीचे पाणी दूषित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:36 IST

वेळे : पांडे-खानापूर हद्दीतील शेतात दहा-बारा टँकर मळीयुक्त रसायन टाकल्याने येथील शेतजमीन व हवामान प्रदूषित झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली ...

वेळे : पांडे-खानापूर हद्दीतील शेतात दहा-बारा टँकर मळीयुक्त रसायन टाकल्याने येथील शेतजमीन व हवामान प्रदूषित झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विहिरीतील पिण्याचे पाणी दूषित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत भुईंज पोलीस ठाणे व सातारा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल झाली आहे.

भुईंज पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, वाई तालुक्याच्या पूर्व भागातील पांडे आणि खानापूर हद्दीलगत असणाऱ्या दिलीप नथुराम चव्हाण यांच्या मालकीची जमीन व पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या विहिरीच्या पश्‍चिमेस संतोष घाटे यांची शेतजमीन असून त्यात त्यांनी दहा ते बारा मळीचे टँकर गुरुवार, दि. ११ रोजी टाकले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून माशा घोंगावत आहेत. मळीचे हे रसायन दुर्गंधीयुक्त असल्याने येथील रहिवाशांना श्‍वास घेताना त्रास होऊ लागला आहे. या ठिकाणी रासायनिक मळी टाकताना अटकाव केला असता, ‘जमीन माझ्या मालकीची आहे व मी माझ्या जमिनीत काहीही करू शकतो,’ असे धमकीवजा उत्तर त्यांनी दिल्याने तक्रारदार दिलीप चव्हाण (रा. विठ्ठलवाडी, कवठे, ता. वाई) हे अचंबित झाले.

आपसातील वाद टाळण्यासाठी त्यांनी भुईंज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तसेच सातारा येथील प्रदूषण नियंत्रण महामंडळालाही अर्जाद्वारे कळविले होते. त्याची गंभीर दखल घेऊन प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दि. १३ रोजी पांडे-खानापूर हद्दीत असलेल्या तक्रारदार यांच्या शेतावर येऊन पाहणी केली. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.