शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जिल्ह्यातील रुग्णवाढ पाच टक्क्यांच्या खाली आणायचीय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

सातारा : ‘जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. पाच दिवसांचा अंदाज घेऊन शुक्रवारी नवीन ...

सातारा : ‘जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. पाच दिवसांचा अंदाज घेऊन शुक्रवारी नवीन निर्णय घेतला जातो. आपत्ती निवारण समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात येणार आहे, या बैठकीत जिल्ह्यातील नवीन निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाणार आहे, जिल्ह्यातील रुग्णवाढ पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी जिल्हावासीयांची साथ आवश्यक आहे,’ असे भावनिक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेली आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यामध्ये कोविडची परिस्थिती दोन आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णवाढीचा दर १५ टक्के झाला होता. १८ जूनपासून २५ जूनपर्यंत जिल्ह्यात तिसरा स्तर होता. हा स्तर १५ दिवस सुरू ठेवण्यात आला होता. मात्र, याचा गैरफायदा लोकांनी घेतला. बाजारात मोठी गर्दी केली. त्यामुळे २ ते ७ जुलै अखेर कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणावर झाली. रुग्णवाढीचा दर १४ टक्क्यांच्यावर गेला. त्यामुळे मागील पंधरवड्यात चौथ्या टप्प्यातील निर्बंध संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत.

मात्र, सोमवार, दि. १२ पासून जिल्ह्यात रुग्णवाढ कमी झालेली दिसते. आरटीपीसीआरची रुग्णवाढ कमी आहे. मात्र, आजूबाजूच्या जिल्ह्यांची परिस्थिती आपण लक्षात घेतली तर या जिल्ह्यांमध्ये चौथ्या टप्प्यातील निर्बंध उठवल्यानंतर लोकांकडून काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे सांगली जिल्हा तिसऱ्या टप्प्यातून चौथ्या टप्प्यामधील निर्बंध लागू करण्यात आले. लोक काळजी घेत नसल्याने कडक निर्बंध लागू करावे लागले आहेत.

लॉकडाऊनमुळे पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसायावर अवलंबून लोक असतील, त्यांच्यासाठी लॉकडाऊन म्हणजे अन्यायकारक वाटते. मात्र दुकाने उघडल्यानंतर ग्राहक, दुकानदार, हॉटेल मालक जबाबदारी पाळत नाहीत. निर्बंध कमी केले की रुग्णसंख्यादेखील वाढते. ४ जूनच्या आदेशाप्रमाणे निर्बंध आहेत. लोकांवर मोठी जबाबदारी आहे. ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ ही योजना राज्य शासनाने राबवली आहे. प्रत्येकाने स्वत: जबाबदारी उचलली तर काही प्रमाणात नियम शिथिल करता येतील. शुक्रवारी बैठक घेतल्यानंतर निर्बंध उठविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. निर्बंध कमी केले तरी लोकांची जबाबदारी वाढते आहे. सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णवाढ पाच टक्क्यांच्या खाली कसे आणता येईल, हे करावे लागेल.

तो व्हिडिओ गेल्या वर्षीचा..

१४ जुलै २०२० ची जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची चित्रफीत समाज माध्यमांमध्ये सध्या फिरत आहे. या चित्रफितीनुसार काही लोक चुकीच्या पद्धतीने संदेश पसरवत आहेत. मात्र, तत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ते आव्हान केले होते, आता परिस्थिती वेगळी आहे. राज्य शासनाने ४ जून रोजी काढलेल्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार वाढीची किंवा कमी होण्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हास्तरीय बैठक घेऊन निर्बंध लागू करण्याबाबतचे निर्णय घेण्यात यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल, त्यामध्ये पुढील निर्णय होणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रशासनातर्फे १२ ते १३ हजार तपासण्या करण्यात येत आहेत.

-----------------

जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांचा आयकार्ड फोटो वापरावा