शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

जिल्ह्यातील रुग्णवाढ पाच टक्क्यांच्या खाली आणायचीय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

सातारा : ‘जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. पाच दिवसांचा अंदाज घेऊन शुक्रवारी नवीन ...

सातारा : ‘जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. पाच दिवसांचा अंदाज घेऊन शुक्रवारी नवीन निर्णय घेतला जातो. आपत्ती निवारण समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात येणार आहे, या बैठकीत जिल्ह्यातील नवीन निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाणार आहे, जिल्ह्यातील रुग्णवाढ पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी जिल्हावासीयांची साथ आवश्यक आहे,’ असे भावनिक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेली आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यामध्ये कोविडची परिस्थिती दोन आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णवाढीचा दर १५ टक्के झाला होता. १८ जूनपासून २५ जूनपर्यंत जिल्ह्यात तिसरा स्तर होता. हा स्तर १५ दिवस सुरू ठेवण्यात आला होता. मात्र, याचा गैरफायदा लोकांनी घेतला. बाजारात मोठी गर्दी केली. त्यामुळे २ ते ७ जुलै अखेर कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणावर झाली. रुग्णवाढीचा दर १४ टक्क्यांच्यावर गेला. त्यामुळे मागील पंधरवड्यात चौथ्या टप्प्यातील निर्बंध संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत.

मात्र, सोमवार, दि. १२ पासून जिल्ह्यात रुग्णवाढ कमी झालेली दिसते. आरटीपीसीआरची रुग्णवाढ कमी आहे. मात्र, आजूबाजूच्या जिल्ह्यांची परिस्थिती आपण लक्षात घेतली तर या जिल्ह्यांमध्ये चौथ्या टप्प्यातील निर्बंध उठवल्यानंतर लोकांकडून काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे सांगली जिल्हा तिसऱ्या टप्प्यातून चौथ्या टप्प्यामधील निर्बंध लागू करण्यात आले. लोक काळजी घेत नसल्याने कडक निर्बंध लागू करावे लागले आहेत.

लॉकडाऊनमुळे पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसायावर अवलंबून लोक असतील, त्यांच्यासाठी लॉकडाऊन म्हणजे अन्यायकारक वाटते. मात्र दुकाने उघडल्यानंतर ग्राहक, दुकानदार, हॉटेल मालक जबाबदारी पाळत नाहीत. निर्बंध कमी केले की रुग्णसंख्यादेखील वाढते. ४ जूनच्या आदेशाप्रमाणे निर्बंध आहेत. लोकांवर मोठी जबाबदारी आहे. ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ ही योजना राज्य शासनाने राबवली आहे. प्रत्येकाने स्वत: जबाबदारी उचलली तर काही प्रमाणात नियम शिथिल करता येतील. शुक्रवारी बैठक घेतल्यानंतर निर्बंध उठविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. निर्बंध कमी केले तरी लोकांची जबाबदारी वाढते आहे. सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णवाढ पाच टक्क्यांच्या खाली कसे आणता येईल, हे करावे लागेल.

तो व्हिडिओ गेल्या वर्षीचा..

१४ जुलै २०२० ची जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची चित्रफीत समाज माध्यमांमध्ये सध्या फिरत आहे. या चित्रफितीनुसार काही लोक चुकीच्या पद्धतीने संदेश पसरवत आहेत. मात्र, तत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ते आव्हान केले होते, आता परिस्थिती वेगळी आहे. राज्य शासनाने ४ जून रोजी काढलेल्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार वाढीची किंवा कमी होण्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हास्तरीय बैठक घेऊन निर्बंध लागू करण्याबाबतचे निर्णय घेण्यात यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल, त्यामध्ये पुढील निर्णय होणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रशासनातर्फे १२ ते १३ हजार तपासण्या करण्यात येत आहेत.

-----------------

जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांचा आयकार्ड फोटो वापरावा