शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
7
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
8
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
9
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
10
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
11
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
12
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
13
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
14
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
15
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
16
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
17
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
18
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सांभाळतो मोर्चा; तुम्ही सांभाळा गाव!

By admin | Updated: September 26, 2016 23:40 IST

रिकाम्या गावांमध्ये दिवसा गस्त : अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायत, पोलिस पाटील, पोलिस मित्रांचा घेणार मदत

वाठार स्टेशन : भावी पिढीच्या हितासाठी कित्येक पिढ्यांनंतर मराठा बांधव एकवटत आहे. सातारा महामोर्चाच्या बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडली आहे. गावचे गाव सहभागी होणार असल्याने त्या दिवशी गावांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘आम्ही मोर्चा सांभाळतो.. तुम्ही गाव सांभाळा,’ असे आवाहन पोलिस ग्रामस्थांना करत आहेत. त्यादृष्टीने गावात पोलिस पाटील तसेच पोलिस मित्रांचा वापर केला जाणार आहे.मराठ्यांची राजधानी म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. त्यामुळे साताऱ्यातील मोर्चाही ‘न भूतो, न भविष्यती’ असा महामोर्चा निघायला हवा. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चास मिळालेला प्रतिसाद पाहता साताऱ्यातील महामोर्चा इतिहास घडवेल, याची खात्री व्यक्त केली जात आहे. महामोर्चाच्या अनुषंगाने तालुका, गाव, वाड्या-वस्त्यांवर नियोजन बैठका होत आहेत. महामोर्चात गावचे गाव सहभागी होणार असल्याने त्या दिवशी गावे रिकामी होणार आहेत. यामुळे गावांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा राहणार आहे. महामोर्चासाठी गावातील सर्वच तरुण, ग्रामस्थ साताऱ्याकडे जातील, त्यावेळी गावात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आता या गावात दिवसा गस्त घालावी लागणार आहे. यासाठी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस मित्र, पोलिस पाटील यांच्याकडे आता ही जबाबदारी देण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी लवकरच पोलिस ठाण्यात बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत पोलिसांकडून या लोकांना या दिवशी च्या नियोजनच्या सूचना दिल्या जाणार आहेत.सातारा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकजण कामाला लागला आहे. गाव बैठकाबरोबरच वहातूक व्यवस्था, वाहतूक मार्ग, प्रवासाची वेळ, नाष्टा याबाबतचेही नियोजन सर्वच ठिकाणी सुरू आहे. पोलिस मात्र लोकांच्या सुरक्षेसाठीच्या नियोजनात व्यस्त आहेत. त्यामुळे या काळात सुरक्षेचा भार पोलिस पाटील, पोलिस मित्रांवर येणार आहे. (वार्ताहर)साताऱ्यातील सोमवार, दि. ३ रोजी महामोर्चा निघणार आहे. यादिवशी मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलिस जाणार आहेत. गावचे गाव ओस पडणार असल्याने पोलिसाशिवाय गावाच्या संरक्षणाची जबाबदारी ग्रामस्थांची राहणार आहे. यावेळी गावातील पोलिस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस मित्र यांच्या सहकार्याने गावची सुरक्षा यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच वाठार पोलिस ठाण्यात या सर्वांची बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीत गावाच्या सुरक्षेवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच जबाबदारी सोपवणार आहोत. महामोर्चात जे लोक सहभागी होणार आहेत, यामध्ये शक्यतो लहान मुलांचा व ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊ नये. - शहाजी निकम,सहायक पोलिस निरीक्षक, वाठार पोलिस स्टेशनआठ-दहा किलोमीटर लागणार चालावेमहामोर्चात सहभागी होणाऱ्यामध्ये प्रत्येकाला किमाण आठ ते दहा किलोमीटर चालत जाऊन शहरात जावे लागणार आहे. गर्दीतून चालावे लागणार असल्याने या दरम्यान कोणालाही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. महामोर्चातील गर्दी पाहता महामोर्चात लहान मुलं, वयोवृद्धांचा समावेश नसावा, अशा सूचनाही पोलिस यंत्रणेकडून गावोगावच्या बैठकांमध्ये केल्या जात आहेत. पोलिस ठाणेही होणार रिकामेमराठा महामोर्चा ‘रेकॉर्ड ब्रेक’ करण्यासाठी तरुणाई धडपडत असताना या महामोर्चाची सर्वात मोठी जबाबदारी पोलिसांवर राहणार आहे. महामोर्चासाठीच्या अनेक मार्गांबाबत लोकांना माहिती देण्याबरोबरच कोंडी होऊ नये, याची जबाबदारी पोलिसांची राहणार आहे. अशावेळी ग्रामीण भागातील पोलिस ठाणे पोलिसाविना रिकामी पडणार आहेत. याचा गैरफायदा कोणी घेऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.