शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सांभाळतो मोर्चा; तुम्ही सांभाळा गाव!

By admin | Updated: September 26, 2016 23:40 IST

रिकाम्या गावांमध्ये दिवसा गस्त : अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायत, पोलिस पाटील, पोलिस मित्रांचा घेणार मदत

वाठार स्टेशन : भावी पिढीच्या हितासाठी कित्येक पिढ्यांनंतर मराठा बांधव एकवटत आहे. सातारा महामोर्चाच्या बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडली आहे. गावचे गाव सहभागी होणार असल्याने त्या दिवशी गावांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘आम्ही मोर्चा सांभाळतो.. तुम्ही गाव सांभाळा,’ असे आवाहन पोलिस ग्रामस्थांना करत आहेत. त्यादृष्टीने गावात पोलिस पाटील तसेच पोलिस मित्रांचा वापर केला जाणार आहे.मराठ्यांची राजधानी म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. त्यामुळे साताऱ्यातील मोर्चाही ‘न भूतो, न भविष्यती’ असा महामोर्चा निघायला हवा. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चास मिळालेला प्रतिसाद पाहता साताऱ्यातील महामोर्चा इतिहास घडवेल, याची खात्री व्यक्त केली जात आहे. महामोर्चाच्या अनुषंगाने तालुका, गाव, वाड्या-वस्त्यांवर नियोजन बैठका होत आहेत. महामोर्चात गावचे गाव सहभागी होणार असल्याने त्या दिवशी गावे रिकामी होणार आहेत. यामुळे गावांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा राहणार आहे. महामोर्चासाठी गावातील सर्वच तरुण, ग्रामस्थ साताऱ्याकडे जातील, त्यावेळी गावात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आता या गावात दिवसा गस्त घालावी लागणार आहे. यासाठी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस मित्र, पोलिस पाटील यांच्याकडे आता ही जबाबदारी देण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी लवकरच पोलिस ठाण्यात बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत पोलिसांकडून या लोकांना या दिवशी च्या नियोजनच्या सूचना दिल्या जाणार आहेत.सातारा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकजण कामाला लागला आहे. गाव बैठकाबरोबरच वहातूक व्यवस्था, वाहतूक मार्ग, प्रवासाची वेळ, नाष्टा याबाबतचेही नियोजन सर्वच ठिकाणी सुरू आहे. पोलिस मात्र लोकांच्या सुरक्षेसाठीच्या नियोजनात व्यस्त आहेत. त्यामुळे या काळात सुरक्षेचा भार पोलिस पाटील, पोलिस मित्रांवर येणार आहे. (वार्ताहर)साताऱ्यातील सोमवार, दि. ३ रोजी महामोर्चा निघणार आहे. यादिवशी मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलिस जाणार आहेत. गावचे गाव ओस पडणार असल्याने पोलिसाशिवाय गावाच्या संरक्षणाची जबाबदारी ग्रामस्थांची राहणार आहे. यावेळी गावातील पोलिस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस मित्र यांच्या सहकार्याने गावची सुरक्षा यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच वाठार पोलिस ठाण्यात या सर्वांची बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीत गावाच्या सुरक्षेवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच जबाबदारी सोपवणार आहोत. महामोर्चात जे लोक सहभागी होणार आहेत, यामध्ये शक्यतो लहान मुलांचा व ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊ नये. - शहाजी निकम,सहायक पोलिस निरीक्षक, वाठार पोलिस स्टेशनआठ-दहा किलोमीटर लागणार चालावेमहामोर्चात सहभागी होणाऱ्यामध्ये प्रत्येकाला किमाण आठ ते दहा किलोमीटर चालत जाऊन शहरात जावे लागणार आहे. गर्दीतून चालावे लागणार असल्याने या दरम्यान कोणालाही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. महामोर्चातील गर्दी पाहता महामोर्चात लहान मुलं, वयोवृद्धांचा समावेश नसावा, अशा सूचनाही पोलिस यंत्रणेकडून गावोगावच्या बैठकांमध्ये केल्या जात आहेत. पोलिस ठाणेही होणार रिकामेमराठा महामोर्चा ‘रेकॉर्ड ब्रेक’ करण्यासाठी तरुणाई धडपडत असताना या महामोर्चाची सर्वात मोठी जबाबदारी पोलिसांवर राहणार आहे. महामोर्चासाठीच्या अनेक मार्गांबाबत लोकांना माहिती देण्याबरोबरच कोंडी होऊ नये, याची जबाबदारी पोलिसांची राहणार आहे. अशावेळी ग्रामीण भागातील पोलिस ठाणे पोलिसाविना रिकामी पडणार आहेत. याचा गैरफायदा कोणी घेऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.