शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

आम्ही सांभाळतो मोर्चा; तुम्ही सांभाळा गाव!

By admin | Updated: September 26, 2016 23:40 IST

रिकाम्या गावांमध्ये दिवसा गस्त : अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायत, पोलिस पाटील, पोलिस मित्रांचा घेणार मदत

वाठार स्टेशन : भावी पिढीच्या हितासाठी कित्येक पिढ्यांनंतर मराठा बांधव एकवटत आहे. सातारा महामोर्चाच्या बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडली आहे. गावचे गाव सहभागी होणार असल्याने त्या दिवशी गावांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘आम्ही मोर्चा सांभाळतो.. तुम्ही गाव सांभाळा,’ असे आवाहन पोलिस ग्रामस्थांना करत आहेत. त्यादृष्टीने गावात पोलिस पाटील तसेच पोलिस मित्रांचा वापर केला जाणार आहे.मराठ्यांची राजधानी म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. त्यामुळे साताऱ्यातील मोर्चाही ‘न भूतो, न भविष्यती’ असा महामोर्चा निघायला हवा. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चास मिळालेला प्रतिसाद पाहता साताऱ्यातील महामोर्चा इतिहास घडवेल, याची खात्री व्यक्त केली जात आहे. महामोर्चाच्या अनुषंगाने तालुका, गाव, वाड्या-वस्त्यांवर नियोजन बैठका होत आहेत. महामोर्चात गावचे गाव सहभागी होणार असल्याने त्या दिवशी गावे रिकामी होणार आहेत. यामुळे गावांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा राहणार आहे. महामोर्चासाठी गावातील सर्वच तरुण, ग्रामस्थ साताऱ्याकडे जातील, त्यावेळी गावात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आता या गावात दिवसा गस्त घालावी लागणार आहे. यासाठी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस मित्र, पोलिस पाटील यांच्याकडे आता ही जबाबदारी देण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी लवकरच पोलिस ठाण्यात बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत पोलिसांकडून या लोकांना या दिवशी च्या नियोजनच्या सूचना दिल्या जाणार आहेत.सातारा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकजण कामाला लागला आहे. गाव बैठकाबरोबरच वहातूक व्यवस्था, वाहतूक मार्ग, प्रवासाची वेळ, नाष्टा याबाबतचेही नियोजन सर्वच ठिकाणी सुरू आहे. पोलिस मात्र लोकांच्या सुरक्षेसाठीच्या नियोजनात व्यस्त आहेत. त्यामुळे या काळात सुरक्षेचा भार पोलिस पाटील, पोलिस मित्रांवर येणार आहे. (वार्ताहर)साताऱ्यातील सोमवार, दि. ३ रोजी महामोर्चा निघणार आहे. यादिवशी मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलिस जाणार आहेत. गावचे गाव ओस पडणार असल्याने पोलिसाशिवाय गावाच्या संरक्षणाची जबाबदारी ग्रामस्थांची राहणार आहे. यावेळी गावातील पोलिस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस मित्र यांच्या सहकार्याने गावची सुरक्षा यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच वाठार पोलिस ठाण्यात या सर्वांची बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीत गावाच्या सुरक्षेवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच जबाबदारी सोपवणार आहोत. महामोर्चात जे लोक सहभागी होणार आहेत, यामध्ये शक्यतो लहान मुलांचा व ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊ नये. - शहाजी निकम,सहायक पोलिस निरीक्षक, वाठार पोलिस स्टेशनआठ-दहा किलोमीटर लागणार चालावेमहामोर्चात सहभागी होणाऱ्यामध्ये प्रत्येकाला किमाण आठ ते दहा किलोमीटर चालत जाऊन शहरात जावे लागणार आहे. गर्दीतून चालावे लागणार असल्याने या दरम्यान कोणालाही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. महामोर्चातील गर्दी पाहता महामोर्चात लहान मुलं, वयोवृद्धांचा समावेश नसावा, अशा सूचनाही पोलिस यंत्रणेकडून गावोगावच्या बैठकांमध्ये केल्या जात आहेत. पोलिस ठाणेही होणार रिकामेमराठा महामोर्चा ‘रेकॉर्ड ब्रेक’ करण्यासाठी तरुणाई धडपडत असताना या महामोर्चाची सर्वात मोठी जबाबदारी पोलिसांवर राहणार आहे. महामोर्चासाठीच्या अनेक मार्गांबाबत लोकांना माहिती देण्याबरोबरच कोंडी होऊ नये, याची जबाबदारी पोलिसांची राहणार आहे. अशावेळी ग्रामीण भागातील पोलिस ठाणे पोलिसाविना रिकामी पडणार आहेत. याचा गैरफायदा कोणी घेऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.