शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देऊरची झेडपी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: March 9, 2017 14:07 IST

मुख्याध्यापकपद गेले; आता शाळेच्या इमारतीचीही होतेय दुरवस्था

देऊरची झेडपी शाळा बंद पडण्याच्या मार्गावरमुख्याध्यापकपद गेले; आता शाळेच्या इमारतीचीही होतेय दुरवस्थाआॅनलाईन लोकमतवाठार स्टेशन (सातारा) : शैक्षणिक पंढरी म्हणून राज्यात नावलौकिक असलेल्या कोरेगाव तालुक्यातील देऊर गावची १८७२ मध्ये स्थापन झालेली जिल्हा परिषद मराठी शाळा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजपर्यंत अनेक गुणवंत घडवण्याची किमया केलेल्या या शाळेची आता मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पटसंख्या घटल्याने या शाळेचे मुख्याध्यापकपद अगोदरच गेले आहे, तर आता असलेल्या शाळेचे एका बाजूने बांधकाम ढासळल्याने ही शाळाच आता शिल्लक राहील का नाही, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. ह्यआमदार आदर्शह्ण गावातील या प्राथमिक शाळेची जर ही अवस्था असेल तर गाव कधी आदर्श होणार, हाच खरा प्रश्न आहे.१८७२ मध्ये स्थापन झालेल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यावेळी जवळपास ११ वर्ग खोल्यांतून शिक्षण दिले जात होते. मात्र, मागील चार-पाच वर्षांत मुलांची संख्या घटल्याने आता मुख्याध्यापकाविना केवळ चार शिक्षक या ठिकाणी अध्यापनाचे काम करीत आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे १५० मुलांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकपद रद्द असल्याने या शाळेचे हे पद रद्द झाले आहे. यातच या शाळेची बुद्धिमता चांगली असली तरी या शाळेस ह्यआयएसओह्ण मानांकन मिळण्यासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधांचा अभाव असल्याने ही शाळा अद्याप ह्यकह्ण दर्जामध्ये गणली जाते.या शाळेतील मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, शौचालय, पाणी या सर्वच गोष्टींचा अभाव आहे. तर तुलनेने याच गावात या शाळेशिवाय मुधाई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची शाळा. व्यवसाय अभ्यासक्रम असणारी शाळा, शेतीशाळा, पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे महाविद्यालय असे सर्वसमावेशक शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. तर जवळपास सात अंगणवाड्या ही कार्यरत आहेत. या असलेल्या विविध शाळांमुळेच या गावचे नाव शिक्षण क्षेत्रात अग्रणी आहे. असे असले तरी गावची शान असलेली जिल्हा परिषद शाळा बंद पडली तर सर्वाधिक मोठे नुकसान या गावचे होणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी ही शाळा वाचवण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे.नवीन बांधकाम ढासळू लागले...साधारण २००३ ते २००४ मध्ये या ठिकाणी नव्याने बांधलेल्या या शाळेचे बांधकाम आता ढासळू लागल्याने ही शाळा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणची भिंत कोसळल्यानंतर गेली वर्षभर पाठपुरावा करूनही अद्याप या समस्येकडे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने आता ही शाळा वाचवणे गरजेचे झाले आहे.