शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

देऊरची झेडपी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: March 9, 2017 14:07 IST

मुख्याध्यापकपद गेले; आता शाळेच्या इमारतीचीही होतेय दुरवस्था

देऊरची झेडपी शाळा बंद पडण्याच्या मार्गावरमुख्याध्यापकपद गेले; आता शाळेच्या इमारतीचीही होतेय दुरवस्थाआॅनलाईन लोकमतवाठार स्टेशन (सातारा) : शैक्षणिक पंढरी म्हणून राज्यात नावलौकिक असलेल्या कोरेगाव तालुक्यातील देऊर गावची १८७२ मध्ये स्थापन झालेली जिल्हा परिषद मराठी शाळा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजपर्यंत अनेक गुणवंत घडवण्याची किमया केलेल्या या शाळेची आता मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पटसंख्या घटल्याने या शाळेचे मुख्याध्यापकपद अगोदरच गेले आहे, तर आता असलेल्या शाळेचे एका बाजूने बांधकाम ढासळल्याने ही शाळाच आता शिल्लक राहील का नाही, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. ह्यआमदार आदर्शह्ण गावातील या प्राथमिक शाळेची जर ही अवस्था असेल तर गाव कधी आदर्श होणार, हाच खरा प्रश्न आहे.१८७२ मध्ये स्थापन झालेल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यावेळी जवळपास ११ वर्ग खोल्यांतून शिक्षण दिले जात होते. मात्र, मागील चार-पाच वर्षांत मुलांची संख्या घटल्याने आता मुख्याध्यापकाविना केवळ चार शिक्षक या ठिकाणी अध्यापनाचे काम करीत आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे १५० मुलांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकपद रद्द असल्याने या शाळेचे हे पद रद्द झाले आहे. यातच या शाळेची बुद्धिमता चांगली असली तरी या शाळेस ह्यआयएसओह्ण मानांकन मिळण्यासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधांचा अभाव असल्याने ही शाळा अद्याप ह्यकह्ण दर्जामध्ये गणली जाते.या शाळेतील मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, शौचालय, पाणी या सर्वच गोष्टींचा अभाव आहे. तर तुलनेने याच गावात या शाळेशिवाय मुधाई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची शाळा. व्यवसाय अभ्यासक्रम असणारी शाळा, शेतीशाळा, पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे महाविद्यालय असे सर्वसमावेशक शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. तर जवळपास सात अंगणवाड्या ही कार्यरत आहेत. या असलेल्या विविध शाळांमुळेच या गावचे नाव शिक्षण क्षेत्रात अग्रणी आहे. असे असले तरी गावची शान असलेली जिल्हा परिषद शाळा बंद पडली तर सर्वाधिक मोठे नुकसान या गावचे होणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी ही शाळा वाचवण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे.नवीन बांधकाम ढासळू लागले...साधारण २००३ ते २००४ मध्ये या ठिकाणी नव्याने बांधलेल्या या शाळेचे बांधकाम आता ढासळू लागल्याने ही शाळा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणची भिंत कोसळल्यानंतर गेली वर्षभर पाठपुरावा करूनही अद्याप या समस्येकडे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने आता ही शाळा वाचवणे गरजेचे झाले आहे.