शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

देऊरची झेडपी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: March 9, 2017 14:07 IST

मुख्याध्यापकपद गेले; आता शाळेच्या इमारतीचीही होतेय दुरवस्था

देऊरची झेडपी शाळा बंद पडण्याच्या मार्गावरमुख्याध्यापकपद गेले; आता शाळेच्या इमारतीचीही होतेय दुरवस्थाआॅनलाईन लोकमतवाठार स्टेशन (सातारा) : शैक्षणिक पंढरी म्हणून राज्यात नावलौकिक असलेल्या कोरेगाव तालुक्यातील देऊर गावची १८७२ मध्ये स्थापन झालेली जिल्हा परिषद मराठी शाळा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजपर्यंत अनेक गुणवंत घडवण्याची किमया केलेल्या या शाळेची आता मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पटसंख्या घटल्याने या शाळेचे मुख्याध्यापकपद अगोदरच गेले आहे, तर आता असलेल्या शाळेचे एका बाजूने बांधकाम ढासळल्याने ही शाळाच आता शिल्लक राहील का नाही, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. ह्यआमदार आदर्शह्ण गावातील या प्राथमिक शाळेची जर ही अवस्था असेल तर गाव कधी आदर्श होणार, हाच खरा प्रश्न आहे.१८७२ मध्ये स्थापन झालेल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यावेळी जवळपास ११ वर्ग खोल्यांतून शिक्षण दिले जात होते. मात्र, मागील चार-पाच वर्षांत मुलांची संख्या घटल्याने आता मुख्याध्यापकाविना केवळ चार शिक्षक या ठिकाणी अध्यापनाचे काम करीत आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे १५० मुलांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकपद रद्द असल्याने या शाळेचे हे पद रद्द झाले आहे. यातच या शाळेची बुद्धिमता चांगली असली तरी या शाळेस ह्यआयएसओह्ण मानांकन मिळण्यासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधांचा अभाव असल्याने ही शाळा अद्याप ह्यकह्ण दर्जामध्ये गणली जाते.या शाळेतील मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, शौचालय, पाणी या सर्वच गोष्टींचा अभाव आहे. तर तुलनेने याच गावात या शाळेशिवाय मुधाई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची शाळा. व्यवसाय अभ्यासक्रम असणारी शाळा, शेतीशाळा, पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे महाविद्यालय असे सर्वसमावेशक शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. तर जवळपास सात अंगणवाड्या ही कार्यरत आहेत. या असलेल्या विविध शाळांमुळेच या गावचे नाव शिक्षण क्षेत्रात अग्रणी आहे. असे असले तरी गावची शान असलेली जिल्हा परिषद शाळा बंद पडली तर सर्वाधिक मोठे नुकसान या गावचे होणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी ही शाळा वाचवण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे.नवीन बांधकाम ढासळू लागले...साधारण २००३ ते २००४ मध्ये या ठिकाणी नव्याने बांधलेल्या या शाळेचे बांधकाम आता ढासळू लागल्याने ही शाळा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणची भिंत कोसळल्यानंतर गेली वर्षभर पाठपुरावा करूनही अद्याप या समस्येकडे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने आता ही शाळा वाचवणे गरजेचे झाले आहे.