शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

देऊरची झेडपी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: March 9, 2017 14:07 IST

मुख्याध्यापकपद गेले; आता शाळेच्या इमारतीचीही होतेय दुरवस्था

देऊरची झेडपी शाळा बंद पडण्याच्या मार्गावरमुख्याध्यापकपद गेले; आता शाळेच्या इमारतीचीही होतेय दुरवस्थाआॅनलाईन लोकमतवाठार स्टेशन (सातारा) : शैक्षणिक पंढरी म्हणून राज्यात नावलौकिक असलेल्या कोरेगाव तालुक्यातील देऊर गावची १८७२ मध्ये स्थापन झालेली जिल्हा परिषद मराठी शाळा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजपर्यंत अनेक गुणवंत घडवण्याची किमया केलेल्या या शाळेची आता मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पटसंख्या घटल्याने या शाळेचे मुख्याध्यापकपद अगोदरच गेले आहे, तर आता असलेल्या शाळेचे एका बाजूने बांधकाम ढासळल्याने ही शाळाच आता शिल्लक राहील का नाही, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. ह्यआमदार आदर्शह्ण गावातील या प्राथमिक शाळेची जर ही अवस्था असेल तर गाव कधी आदर्श होणार, हाच खरा प्रश्न आहे.१८७२ मध्ये स्थापन झालेल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यावेळी जवळपास ११ वर्ग खोल्यांतून शिक्षण दिले जात होते. मात्र, मागील चार-पाच वर्षांत मुलांची संख्या घटल्याने आता मुख्याध्यापकाविना केवळ चार शिक्षक या ठिकाणी अध्यापनाचे काम करीत आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे १५० मुलांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकपद रद्द असल्याने या शाळेचे हे पद रद्द झाले आहे. यातच या शाळेची बुद्धिमता चांगली असली तरी या शाळेस ह्यआयएसओह्ण मानांकन मिळण्यासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधांचा अभाव असल्याने ही शाळा अद्याप ह्यकह्ण दर्जामध्ये गणली जाते.या शाळेतील मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, शौचालय, पाणी या सर्वच गोष्टींचा अभाव आहे. तर तुलनेने याच गावात या शाळेशिवाय मुधाई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची शाळा. व्यवसाय अभ्यासक्रम असणारी शाळा, शेतीशाळा, पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे महाविद्यालय असे सर्वसमावेशक शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. तर जवळपास सात अंगणवाड्या ही कार्यरत आहेत. या असलेल्या विविध शाळांमुळेच या गावचे नाव शिक्षण क्षेत्रात अग्रणी आहे. असे असले तरी गावची शान असलेली जिल्हा परिषद शाळा बंद पडली तर सर्वाधिक मोठे नुकसान या गावचे होणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी ही शाळा वाचवण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे.नवीन बांधकाम ढासळू लागले...साधारण २००३ ते २००४ मध्ये या ठिकाणी नव्याने बांधलेल्या या शाळेचे बांधकाम आता ढासळू लागल्याने ही शाळा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणची भिंत कोसळल्यानंतर गेली वर्षभर पाठपुरावा करूनही अद्याप या समस्येकडे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने आता ही शाळा वाचवणे गरजेचे झाले आहे.