शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्याचे गणित फसले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:12 IST

गत पावसाळ्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा होऊनही सध्याच्या घडीला सर्व धरणे रिती झाली आहे. कोयना, उरमोडी, धोम, कण्हेर या मोठ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा राहिला असून, पाणी वाटपाचे गणित कुठेतरी फसल्याचे चित्र पाहायला

ठळक मुद्दे अत्यल्प साठा : पाऊस लांबल्यास भयानक परिस्थितीची भीती

सागर गुजर ।सातारा : गत पावसाळ्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा होऊनही सध्याच्या घडीला सर्व धरणे रिती झाली आहे. कोयना, उरमोडी, धोम, कण्हेर या मोठ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा राहिला असून, पाणी वाटपाचे गणित कुठेतरी फसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, धोम-बलकवडी, उरमोडी, तारळी या धरणांमध्ये गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाणीसाठा झाला होता. आता मात्र धरणे आटण्याच्या मार्गावर आहेत. येरळवाडी, नेर, आंधळी, राणंद या तलावांत पिण्यासाठी पाणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला असला तरी काही लोक मोटारी लावून हे पाणीही चोरत असल्याने लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भयानक रूप धारण करून उभा राहिला आहे.

लोकसभा निवडणुकीचा मोठा बाऊ केल्याने दुष्काळी उपाययोजना करताना ढिलाई झाल्याचे समोर आले आहे. माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा या सदैव दुष्काळाशी सामना करणाऱ्या तालुक्यांबरोबरच पाटण, वाई, कºहाड या तालुक्यांनाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.

कोयना धरणातून कर्नाटक, सांगलीसाठी पाणी सोडण्यात आले असल्याने कृष्णा-कोयनेत पाणी आहे. या नद्यांभोवतीच्या पाणी योजना सध्या तरी अडचणीत आलेल्या नाहीत. मात्र, कोयना धरणात अवघे १६.५१ इतके कमी पाणी शिल्लक राहिले असल्याने भविष्यात या मोठ्या नद्यांकाठची गावेही पाण्याच्या शोधात फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उरमोडी धरणातील पाणी कण्हेर कालव्यातून माण, खटाव तालुक्यांना पिण्यासाठी सोडण्यात आले. तिथल्या लोकांनाही ते पुरेसे मिळत नसल्याचे चित्र आहे. कालव्यांमध्ये तसेच तलावांमध्ये अवैधरीत्या मोटारी बसवून ते पाणी काहीजण उपसून पळवून नेत असले तरी प्रशासनाचा त्यावर अंमल नाही. महसूल, जलसंपदा आणि पोलीस या शासकीय यंत्रणा एकमेकांकडे हात दाखवत असल्याने पाणी चोरणाऱ्यांवर कोणतीच कारवाई झालेली नाही.

धोम बलकवडीचे पाणी फलटणकडे नेले असले तरी वाई, खंडाळा तालुक्यांत मात्र दुष्काळाच्या झळा पाहायला मिळत आहेत. नियोजनाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे पाणीदार जिल्ह्यात टंचाईच्या झळा पसरू लागल्या आहेत. एकमेकांकडे बोटे दाखवून हा प्रश्न मिटणार नाही. पाऊस पडला नाही तर अत्यंत वाईट परिस्थितीला दुष्काळग्रस्तांसारखेच पाण्याच्या छायेतील लोकांना सामोरे जावे लागणार आहे.पालकमंत्र्यांचे आमदारांकडे बोटधरणांतील पाणी कालव्यांत सोडत असताना गणित फसल्याचे पुढे येत आहे. हे पाणी नियोजनबद्धरीत्या वापरले असते तर पावसाळ्यापर्यंत ते कसेही पुरले असते. मात्र, ते कुठल्याही वेळी सोडले गेले, साहजिकच धरणांतही कमी पाणीसाठा राहिला आहे. पालकमंत्र्यांना याबाबत विचारले असता ते आमदारांकडे बोट दाखवत आहेत. कालवा समितीमधील निर्णयानुसारच पाण्याची आवर्तने सोडली गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नद्या आटल्याउरमोडी, तारळी, कुडाळी, मांड या नद्यांचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. साहजिकच या नद्यांच्या काठावर असणाºया गावांत पाण्याचा ठणठणाट जाणवू लागला आहे.धरणे अन् शिल्लक पाणीसाठा (टीएमसीमध्ये)धोम २.२६कण्हेर २.२९कोयना १६.५१धोम बलकवडी ०.३१च्उरमोडी १.३१च्तारळी १.९४९च्येरळवाडी ०च्नेर ०.०४१

 

 

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण