शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सातारा जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्याचे गणित फसले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:12 IST

गत पावसाळ्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा होऊनही सध्याच्या घडीला सर्व धरणे रिती झाली आहे. कोयना, उरमोडी, धोम, कण्हेर या मोठ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा राहिला असून, पाणी वाटपाचे गणित कुठेतरी फसल्याचे चित्र पाहायला

ठळक मुद्दे अत्यल्प साठा : पाऊस लांबल्यास भयानक परिस्थितीची भीती

सागर गुजर ।सातारा : गत पावसाळ्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा होऊनही सध्याच्या घडीला सर्व धरणे रिती झाली आहे. कोयना, उरमोडी, धोम, कण्हेर या मोठ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा राहिला असून, पाणी वाटपाचे गणित कुठेतरी फसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, धोम-बलकवडी, उरमोडी, तारळी या धरणांमध्ये गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाणीसाठा झाला होता. आता मात्र धरणे आटण्याच्या मार्गावर आहेत. येरळवाडी, नेर, आंधळी, राणंद या तलावांत पिण्यासाठी पाणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला असला तरी काही लोक मोटारी लावून हे पाणीही चोरत असल्याने लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भयानक रूप धारण करून उभा राहिला आहे.

लोकसभा निवडणुकीचा मोठा बाऊ केल्याने दुष्काळी उपाययोजना करताना ढिलाई झाल्याचे समोर आले आहे. माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा या सदैव दुष्काळाशी सामना करणाऱ्या तालुक्यांबरोबरच पाटण, वाई, कºहाड या तालुक्यांनाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.

कोयना धरणातून कर्नाटक, सांगलीसाठी पाणी सोडण्यात आले असल्याने कृष्णा-कोयनेत पाणी आहे. या नद्यांभोवतीच्या पाणी योजना सध्या तरी अडचणीत आलेल्या नाहीत. मात्र, कोयना धरणात अवघे १६.५१ इतके कमी पाणी शिल्लक राहिले असल्याने भविष्यात या मोठ्या नद्यांकाठची गावेही पाण्याच्या शोधात फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उरमोडी धरणातील पाणी कण्हेर कालव्यातून माण, खटाव तालुक्यांना पिण्यासाठी सोडण्यात आले. तिथल्या लोकांनाही ते पुरेसे मिळत नसल्याचे चित्र आहे. कालव्यांमध्ये तसेच तलावांमध्ये अवैधरीत्या मोटारी बसवून ते पाणी काहीजण उपसून पळवून नेत असले तरी प्रशासनाचा त्यावर अंमल नाही. महसूल, जलसंपदा आणि पोलीस या शासकीय यंत्रणा एकमेकांकडे हात दाखवत असल्याने पाणी चोरणाऱ्यांवर कोणतीच कारवाई झालेली नाही.

धोम बलकवडीचे पाणी फलटणकडे नेले असले तरी वाई, खंडाळा तालुक्यांत मात्र दुष्काळाच्या झळा पाहायला मिळत आहेत. नियोजनाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे पाणीदार जिल्ह्यात टंचाईच्या झळा पसरू लागल्या आहेत. एकमेकांकडे बोटे दाखवून हा प्रश्न मिटणार नाही. पाऊस पडला नाही तर अत्यंत वाईट परिस्थितीला दुष्काळग्रस्तांसारखेच पाण्याच्या छायेतील लोकांना सामोरे जावे लागणार आहे.पालकमंत्र्यांचे आमदारांकडे बोटधरणांतील पाणी कालव्यांत सोडत असताना गणित फसल्याचे पुढे येत आहे. हे पाणी नियोजनबद्धरीत्या वापरले असते तर पावसाळ्यापर्यंत ते कसेही पुरले असते. मात्र, ते कुठल्याही वेळी सोडले गेले, साहजिकच धरणांतही कमी पाणीसाठा राहिला आहे. पालकमंत्र्यांना याबाबत विचारले असता ते आमदारांकडे बोट दाखवत आहेत. कालवा समितीमधील निर्णयानुसारच पाण्याची आवर्तने सोडली गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नद्या आटल्याउरमोडी, तारळी, कुडाळी, मांड या नद्यांचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. साहजिकच या नद्यांच्या काठावर असणाºया गावांत पाण्याचा ठणठणाट जाणवू लागला आहे.धरणे अन् शिल्लक पाणीसाठा (टीएमसीमध्ये)धोम २.२६कण्हेर २.२९कोयना १६.५१धोम बलकवडी ०.३१च्उरमोडी १.३१च्तारळी १.९४९च्येरळवाडी ०च्नेर ०.०४१

 

 

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण