शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

कोयनेतील पाणीसाठ्याचे काउंटडाऊन सुरू

By admin | Updated: April 23, 2017 22:41 IST

४० दिवस ३१ टीएमसी : चिंता आणखीनच गडद होणार; धरणातील पाण्याचे नियोजन होणार का?

पाटण : देशातील वीजनिर्मितीच्या प्रमुख स्त्रोतापैकी एक असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याचे सध्या झपाट्याने काउंटडाऊन सुरू असून, सध्या धरणात ३१.९२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कडक उन्हाळ्यात वीजनिर्मिती आणि पूर्वेकडील सांगलीपर्यंतच्या गावांना सिंचनासाठी होणाऱ्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी कर्नाटकला दिले. त्यामुळे जूनचा पाऊस पडेपर्यंत कोयना धरणातील पाणी पुरणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमतेचा कोयना जलाशय आहे. यावर्षी पावसाळ्यात जवळपास पूर्ण भरलेला. त्यामुळे वर्षभराची गरज भागणार, अशी खात्री होती. तरीसुद्धा एप्रिल, मे आणि जून अखेरचे दिवस कोयना धरणातील पाण्यावर भागणार का?, अशी चिंता आताच लागून आहे. १ जूनपासून आतापर्यंत कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी ६० टीएमसी आणि सिंचनासाठी २१ टीएमसी पाणीसाठा खर्च झाला आहे. ६ टीएमसी पाणीसाठा उन्हामुळे बाष्पीभवन होऊन वाया गेला आहे. त्यातच कोयना धरणातील पाणी कर्नाटक राज्याला देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर २ टीएमसी पाणी कोयना धरणातून देण्यात आले म्हणूनच येत्या ४० दिवसांसाठी ३१ टीएमसी पाणी कसे पुरणार त्याचे नियोजन होणार आहे का? आणि कोयना धरणातील पाणी कर्नाटक किंवा इतर राज्यांना सोडण्याची मागणी पुन्हा झाली तर पाणी साठ्याची चिंता आणखीनच गडद होणार, हे मात्र निश्चित. (प्रतिनिधी)आमदारांचा विरोध डावलला...कोयना धरणातून कर्नाटकला पाणी देऊ नये, असा ठराव जिल्ह्यातील सर्व आमदारांनी करूनही पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कोयनेतील पाणी न देण्याची विनंती केली केली आहे.