शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कोयनेतील पाणीसाठ्याचे काउंटडाऊन सुरू

By admin | Updated: April 23, 2017 22:41 IST

४० दिवस ३१ टीएमसी : चिंता आणखीनच गडद होणार; धरणातील पाण्याचे नियोजन होणार का?

पाटण : देशातील वीजनिर्मितीच्या प्रमुख स्त्रोतापैकी एक असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याचे सध्या झपाट्याने काउंटडाऊन सुरू असून, सध्या धरणात ३१.९२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कडक उन्हाळ्यात वीजनिर्मिती आणि पूर्वेकडील सांगलीपर्यंतच्या गावांना सिंचनासाठी होणाऱ्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी कर्नाटकला दिले. त्यामुळे जूनचा पाऊस पडेपर्यंत कोयना धरणातील पाणी पुरणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमतेचा कोयना जलाशय आहे. यावर्षी पावसाळ्यात जवळपास पूर्ण भरलेला. त्यामुळे वर्षभराची गरज भागणार, अशी खात्री होती. तरीसुद्धा एप्रिल, मे आणि जून अखेरचे दिवस कोयना धरणातील पाण्यावर भागणार का?, अशी चिंता आताच लागून आहे. १ जूनपासून आतापर्यंत कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी ६० टीएमसी आणि सिंचनासाठी २१ टीएमसी पाणीसाठा खर्च झाला आहे. ६ टीएमसी पाणीसाठा उन्हामुळे बाष्पीभवन होऊन वाया गेला आहे. त्यातच कोयना धरणातील पाणी कर्नाटक राज्याला देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर २ टीएमसी पाणी कोयना धरणातून देण्यात आले म्हणूनच येत्या ४० दिवसांसाठी ३१ टीएमसी पाणी कसे पुरणार त्याचे नियोजन होणार आहे का? आणि कोयना धरणातील पाणी कर्नाटक किंवा इतर राज्यांना सोडण्याची मागणी पुन्हा झाली तर पाणी साठ्याची चिंता आणखीनच गडद होणार, हे मात्र निश्चित. (प्रतिनिधी)आमदारांचा विरोध डावलला...कोयना धरणातून कर्नाटकला पाणी देऊ नये, असा ठराव जिल्ह्यातील सर्व आमदारांनी करूनही पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कोयनेतील पाणी न देण्याची विनंती केली केली आहे.