शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

गायकवाडीमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST

मसूर : कऱ्हाड तालुक्याच्या उत्तरेतील शेवटचे टोक असलेल्या मसूरच्या पूर्वभागातील गायकवाडवाडी (ता. कऱ्हाड) गावास एप्रिल-मे महिन्यांत सातत्याने ...

मसूर : कऱ्हाड तालुक्याच्या उत्तरेतील शेवटचे टोक असलेल्या मसूरच्या पूर्वभागातील गायकवाडवाडी (ता. कऱ्हाड) गावास एप्रिल-मे महिन्यांत सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी कऱ्हाडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना भेटून गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज असल्याचे सांगितले.

दरम्यान, गायकवाडवाडी येथे असलेल्या पाझर गाळ साचला आहे. तो गाळ उचलल्यास तलावाची खोली वाढेल व त्यामध्ये कायमस्वरूपी पाणीसाठा राहून पाणीटंचाई भासणार नाही. गायकवाडवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले. ते म्हणाले, ‘१९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळापासून या पाझर तलावात गाळ साचला आहे. येथील गाळ उचलायला सुरुवात केल्यास अखंड महिनाभर चालेल एवढा गाळ या पाझर तलावात असून, तो उचलल्यास तलावाची उंची वाढून पुरेसा पाणीसाठाही उपलब्ध होईल. याबरोबरच तलावाच्या पीचिंगची व दुरुस्तीची कामे झाल्यास भविष्यात पाणीटंचाई भासणारच नाही, असेही ग्रामस्थांनी सांगितले. सध्या एप्रिल महिन्यातच गावामध्ये एक दिवसाआड नळाला पाणी द्यावा लागत आहे. येत्या आठ दिवसांच्या आत शासनाने टँकर सुरू करावा, अशी मागणी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे केली आहे, तरच गावाला पाणी मिळू शकेल अन्यथा पाण्यासाठी भटकंती करून शिवारातून पाणी आणावे लागेल, अशी या गावची स्थिती झाली आहे.

(कोट)

एप्रिल महिन्यातच गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने शासनाने येथील पाहणी करून त्वरित टँकर सुरू करावा व येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा.

- प्रवीण पवार,

उपसरपंच, ग्रामपंचायत, गायकवाडवाडी

१९मसूर

गायकवाडवाडी येथील आटलेला पाझर तलाव.