शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

गायकवाडीमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST

मसूर : कऱ्हाड तालुक्याच्या उत्तरेतील शेवटचे टोक असलेल्या मसूरच्या पूर्वभागातील गायकवाडवाडी (ता. कऱ्हाड) गावास एप्रिल-मे महिन्यांत सातत्याने ...

मसूर : कऱ्हाड तालुक्याच्या उत्तरेतील शेवटचे टोक असलेल्या मसूरच्या पूर्वभागातील गायकवाडवाडी (ता. कऱ्हाड) गावास एप्रिल-मे महिन्यांत सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी कऱ्हाडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना भेटून गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज असल्याचे सांगितले.

दरम्यान, गायकवाडवाडी येथे असलेल्या पाझर गाळ साचला आहे. तो गाळ उचलल्यास तलावाची खोली वाढेल व त्यामध्ये कायमस्वरूपी पाणीसाठा राहून पाणीटंचाई भासणार नाही. गायकवाडवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले. ते म्हणाले, ‘१९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळापासून या पाझर तलावात गाळ साचला आहे. येथील गाळ उचलायला सुरुवात केल्यास अखंड महिनाभर चालेल एवढा गाळ या पाझर तलावात असून, तो उचलल्यास तलावाची उंची वाढून पुरेसा पाणीसाठाही उपलब्ध होईल. याबरोबरच तलावाच्या पीचिंगची व दुरुस्तीची कामे झाल्यास भविष्यात पाणीटंचाई भासणारच नाही, असेही ग्रामस्थांनी सांगितले. सध्या एप्रिल महिन्यातच गावामध्ये एक दिवसाआड नळाला पाणी द्यावा लागत आहे. येत्या आठ दिवसांच्या आत शासनाने टँकर सुरू करावा, अशी मागणी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे केली आहे, तरच गावाला पाणी मिळू शकेल अन्यथा पाण्यासाठी भटकंती करून शिवारातून पाणी आणावे लागेल, अशी या गावची स्थिती झाली आहे.

(कोट)

एप्रिल महिन्यातच गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने शासनाने येथील पाहणी करून त्वरित टँकर सुरू करावा व येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा.

- प्रवीण पवार,

उपसरपंच, ग्रामपंचायत, गायकवाडवाडी

१९मसूर

गायकवाडवाडी येथील आटलेला पाझर तलाव.