शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

पाणी नदीला; पण कोरड पिकाला

By admin | Updated: November 13, 2015 23:44 IST

काढणे परिसरातील स्थिती : कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी हतबल

कुसूर : पाटण तालुक्यातील काढणे परिसरात शेतीपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. परिणामी शेतीपंप सुरू होत नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी वीज कंपनीकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत असून, पाणी असूनही विजेअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची चिन्हे आहेत.काढणे येथील वांग नदीवरील पुलाशेजारी तळमावले वीज उपकेंद्राअंतर्गत वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर आहे. येथून २५ ते ३० शेतकऱ्यांच्या शेती पंपांना वीजपुरवठा करण्यात आला आहे. मात्र गत महिन्यापासून पंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने पंप सुरू होत नाहीत. एखादा पंप सुरू झालाच तर काही वेळात प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊन बंद पडत आहेत. अशातच वीजपुरवठा कमी जास्त झाल्याने पंपात बिघाड निर्माण होत आहे. वांग नदीवर काढणे येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असल्याने बंधाऱ्यातील उपलब्ध पाणीसाठ्यावर रब्बी हंगामातील शाळू, गहू, हरभरा, करडई आदी पिकांसह बागायती पिके मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. रब्बी हंगाम पूर्व गहू, हरभरा, शाळू पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत.मात्र जमिनीमध्ये पुरेशी ओल नसल्याने या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. सध्या नदीपात्रात पाणीसाठा समाधानकारक असतानाही विजेअभावी या पिकांना शेतकऱ्यांना वेळेत पाणी देता येत नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. वीजवितरणने या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (वार्ताहर)