शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पाणीसाठ्यात जमिनी बुडाल्या...

By admin | Updated: November 13, 2015 23:44 IST

मोरणा-गुरेघर प्रकल्प : आंबेघर तर्फ मरळीच्या ग्रामस्थांची ओरड; १४ रोजी आमदार अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी

पाटण : सुमारे दीड टीएमसी पाणीसाठा क्षमतेचा मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्प सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याने तुडुंब भरला आहे. मात्र, कृष्णा खोरेचे अधिकारी व कालव्यांचे ठेकेदार यांच्या ढिसाळ कारभारांमुळे या धरणातील पाणी, कालव्याची कामे अर्धवट राहिल्यामुळे शेतीला अद्याप मिळालेले नाही. दुसरीकडे धरण पूर्णक्षमतेने भरल्यामुळे पाणलोट क्षेत्राच्या आसपास असलेल्या शेतजमिनीमध्ये पाणी शिरले आहे. याबाबत आंबेघर तर्फ मरळीचे ग्रामस्थ ओडत करत असून, धरणातील पाणीसाठ्याचे कसलेही नियोजन केले नसल्यामुळे प्रकल्प असून खोळंबा नसून घोटाळा, अशी अवस्था झाली आहे.या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच खास करून धरणातील पाणीसाठा येत्या जूनपर्यंत कसा वापरावयाचा याचे नियोजन करण्यासाठी आमदार शंभूराज देसाई यांनी १४ नोव्हेंबर रोजी कृष्णा खोरे महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मोरणा-गुरेघर धरणाची पाहणी करण्याचे ठरविले आहे. त्यानंतर पाटण शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहेत. मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्पाची पार्श्वभूमी पाहायचे झाल्यास उजवा आणि डावा कालवा काढून ३० किलोमीटर पर्यंतच्या गावांना व शेतीला पाणी देण्याची योजना आहे. कालव्यांची कामे आघाडी शासनाच्या काळात सुरू झाली. मात्र, ठेकेदारांनी कामात मोठा कालवा करून आर्थिक गडबड केली.दुसरीकडे शासनस्तरावर घोटाळा बाहेर आला, त्यामुळे कालवे बंद पडले. अर्धवट कामे राहिल्यामुळे कऱ्हाड आणि पाटण तालुक्यातील सुमारे ५० गावांना पाणी तर मिळाले नाहीच; मात्र कालव्यांसाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला दिला नाही. आणि खोदकाम केल्याने शेती पडीक झाली. ठेकेदार गायब झाले. (वार्ताहर)मासेमारी व गैरप्रकारांना वावमोरणा-गुरेघर प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, हा प्रकल्प अद्याप शासनाने ताब्यात घेतलेला नाही. त्यामुळे ठेकेदाराला आपली तोडी यंत्रणा प्रकल्पावरच ठेवावी लागली आहे. अशा स्थितीमुळे अवैध मासेमारी व गैरप्रकारांना वाव मिळत आहे. मोरणा-गुरेघर प्रकल्पातील वाढीव पाणीसाठ्यामुळे पाण्याखाली गेलेल्या शेतजमिनी मोकळ्या करून मिळाव्यात. त्याबदल्यात आम्हाला नुकसानभरपाई म्हणून पैसे नकोत ते आम्ही स्वीकारणार नाही. याबाबत १४ रोजीच्या बैठकीत धरणग्रस्त आक्रमक भूमिका मांडतील.- बशिर खोंदू, अध्यक्ष, मोरणा-गुरेघर धरणग्रस्त कृती समिती