शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पाणीसाठ्यात जमिनी बुडाल्या...

By admin | Updated: November 13, 2015 23:44 IST

मोरणा-गुरेघर प्रकल्प : आंबेघर तर्फ मरळीच्या ग्रामस्थांची ओरड; १४ रोजी आमदार अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी

पाटण : सुमारे दीड टीएमसी पाणीसाठा क्षमतेचा मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्प सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याने तुडुंब भरला आहे. मात्र, कृष्णा खोरेचे अधिकारी व कालव्यांचे ठेकेदार यांच्या ढिसाळ कारभारांमुळे या धरणातील पाणी, कालव्याची कामे अर्धवट राहिल्यामुळे शेतीला अद्याप मिळालेले नाही. दुसरीकडे धरण पूर्णक्षमतेने भरल्यामुळे पाणलोट क्षेत्राच्या आसपास असलेल्या शेतजमिनीमध्ये पाणी शिरले आहे. याबाबत आंबेघर तर्फ मरळीचे ग्रामस्थ ओडत करत असून, धरणातील पाणीसाठ्याचे कसलेही नियोजन केले नसल्यामुळे प्रकल्प असून खोळंबा नसून घोटाळा, अशी अवस्था झाली आहे.या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच खास करून धरणातील पाणीसाठा येत्या जूनपर्यंत कसा वापरावयाचा याचे नियोजन करण्यासाठी आमदार शंभूराज देसाई यांनी १४ नोव्हेंबर रोजी कृष्णा खोरे महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मोरणा-गुरेघर धरणाची पाहणी करण्याचे ठरविले आहे. त्यानंतर पाटण शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहेत. मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्पाची पार्श्वभूमी पाहायचे झाल्यास उजवा आणि डावा कालवा काढून ३० किलोमीटर पर्यंतच्या गावांना व शेतीला पाणी देण्याची योजना आहे. कालव्यांची कामे आघाडी शासनाच्या काळात सुरू झाली. मात्र, ठेकेदारांनी कामात मोठा कालवा करून आर्थिक गडबड केली.दुसरीकडे शासनस्तरावर घोटाळा बाहेर आला, त्यामुळे कालवे बंद पडले. अर्धवट कामे राहिल्यामुळे कऱ्हाड आणि पाटण तालुक्यातील सुमारे ५० गावांना पाणी तर मिळाले नाहीच; मात्र कालव्यांसाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला दिला नाही. आणि खोदकाम केल्याने शेती पडीक झाली. ठेकेदार गायब झाले. (वार्ताहर)मासेमारी व गैरप्रकारांना वावमोरणा-गुरेघर प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, हा प्रकल्प अद्याप शासनाने ताब्यात घेतलेला नाही. त्यामुळे ठेकेदाराला आपली तोडी यंत्रणा प्रकल्पावरच ठेवावी लागली आहे. अशा स्थितीमुळे अवैध मासेमारी व गैरप्रकारांना वाव मिळत आहे. मोरणा-गुरेघर प्रकल्पातील वाढीव पाणीसाठ्यामुळे पाण्याखाली गेलेल्या शेतजमिनी मोकळ्या करून मिळाव्यात. त्याबदल्यात आम्हाला नुकसानभरपाई म्हणून पैसे नकोत ते आम्ही स्वीकारणार नाही. याबाबत १४ रोजीच्या बैठकीत धरणग्रस्त आक्रमक भूमिका मांडतील.- बशिर खोंदू, अध्यक्ष, मोरणा-गुरेघर धरणग्रस्त कृती समिती