शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सिव्हिलमधील कोरोना वॉर्डामध्ये पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना उपचाराचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना उपचाराचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आयसोलेशन कक्षात असलेल्या बाधित रुग्णांना गत चार दिवसांपासून पिण्याचे पाणी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या बाधित रुग्णांना चक्क बिस्लरी विकत आणून पाणी प्यावे लागत आहे. याला सर्वस्वी वॉर्डबॉय जबाबदार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हा रुग्णालय गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ७ आयसोलेशन कक्ष, तसेच ३ आयसीयू कक्ष आहेत. यातील मेट्रो ब्लड बँकेसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षातच चार दिवसांपासून बाधित रुग्णांना पिण्यासाठी पाणी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बाधितांनी या कक्षात असलेल्या नर्स, वॉर्ड बॉय, डॉक्टर यांना वारंवार ही बाब निदर्शनास आणून दिली असतानाही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे.

या कक्षात फक्त पाण्याची मोकळी टाकी आणून ठेवली आहे. चार दिवस पाणी नसल्याने हे रुग्ण आपले नातेवाईक किंवा या कक्षाच्या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना पैसे देऊन चक्क बिस्लरी विकत आण्याला लावून बिस्लरीचे पाणी पित आहेत.

कोट : जिल्हा रुग्णालयात पाण्याची गैरसोय नाही. पाणी सोडणारे वॉर्ड बॉय कमी-जास्त पाणी सोडत असल्याने पाण्याची टंचाई जाणवत आहे. संबंधित वॉर्ड बॉयला सूचना देऊन पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल, याकडे लक्ष देण्यात आले आहे.

याबाबत संबंधित वॉर्डच्या डॉक्टरांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

-डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.