शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी

By admin | Updated: October 2, 2014 00:17 IST

परतीच्या पावसाने हानी : कांदा, बटाटा, सोयाबीन भिजले, घरांवरील पत्रे उडाले, दुकानांमध्ये पाणी शिरले

कऱ्हाड/मलकापूर : कऱ्हाड शहरासह तालुक्याला मंगळवारी परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ वादळी वारे, विजांचा कडकडाट व जोरदार कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ मलकापूरमध्ये काही दुकानगाळ्यात पाणी शिरल्याने विक्रेते व व्यावसायिकांचे साहित्य भिजले तर जोराच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरील छत उडून गेले़कऱ्हाडला मंगळवारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली़ मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला़ काही ठिकाणी गारपीटही झाली़ यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले़ मलकापूर येथील अशोक पाचुंदकर यांच्या मालकीच्या रेवणसिद्ध रोप वाटिकेतील दोन एकराचा झेंडू फुलांचा प्लॉट भुईसपाट झाला़ या प्लॉटमधून पाचुंदकर यांना किमान दहा टन फुलांचे उत्पादन अपेक्षित होते़ मात्र, फुलझाडे मोडून पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले़ याशिवाय रोपवाटीकेतील रोपांचे वाफेही जमीनदोस्त झाले़ रोपवाटीकेचे छत मोडून पडले़ जखिणवाडी, कापिल, गोळेश्वर, चचेगाव परिसरात भाजीपाल्याचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते़ मात्र, मंगळवारी झालेल्या पावसाने दोडका, कारली यासारख्या वेलवर्गीय पिकांची हानी झाली़ मलकापूर येथील मधुकर महादेव शेलार यांच्या दोन एकर शेतजमिनीतील ऊस पीक भुईसपाट झाले आहे़ सध्या शिवारात सोयाबीन काढणीस वेग आला असून मंगळवारच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खोळंबा झाला आहे़ तसेच सोयाबीन भिजल्याने त्यांचे लाखो रूपयांचे नुकसानही झाले आहे़दरम्यान, बुधवारी दुसऱ्या दिवशीही दुपारपासून तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ शहर परिसरात दुपारपासून संततधार पाऊस पडत होता़ त्यामुळे सखल भागात पाणी साचले़ मंगळवारच्या तुलनेत बुधवारी वाऱ्याचा जोर व विजांचा कडकडाट कमी असल्याने नुकसानीची घटना घडली नाही़ बुधवारी सायंकाळी खटाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. औंधसह परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामध्ये बटाट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. (प्रतिनिधी)औंध परिसराला पावसाने झोडपलेऔंधसह परिसराला बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुमारे दीड ते दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले. तर या पावसामुळे कांदा, बटाटा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर जनजीवनही विस्कळीत झाले. परिसरात शेतमशागतीची तसेच पेरणीची कामे सुरू झाली आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पळापळ झाली. गेल्या चार दिवसांपासून उष्मा वाढला होता. मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. बुधवारी सायंकाळी औंधसह जायगाव, भोसरे, वरुड, गोसाव्याची वाडी, पळशी, गोपूज, नांदोशी, खबालवाडी, वडी, कळंबी आदी भागाला पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी गटार तुंबून पाणी रस्त्यावर पसरले़ पावसामुळे महामार्गाच्या पश्चिमेकडील गटार तुंबले़ परिणामी, शिवछावा चौकापासून जवळच असलेल्या हिंदुस्थान मार्बल हाऊस दुकानासमोर तळे साचले़ गटारचे पाणी रस्त्यावर पसरल्याने या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती़नवरात्र मंडळाच्या मंडपाचे नुकसानमलकापूरसह आगाशिवनगर परिसरातील नवरात्र उत्सव मंडळांच्या मंडपाचे मंगळवारच्या पावसाने नुकसान झाले़ अनेक मंडळांच्या मंडपाचे छत फाटले़ तर काही मंडपांचे खांब मोडून पडले़ आगाशिवनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीतील मंडळाचा मंडप अक्षरश: भुईसपाट झाला़ स्वागतकमानीही मोडून पडल्या़