शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील पाणी गेले माणला; पण नाही मिळाले साताऱ्याला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:18 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सिंचनासाठी ९.९६ टीएमसी क्षमतेच्या बांधण्यात आलेल्या उरमोडी धरणात २०१० पासून पूर्णपणे ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सिंचनासाठी ९.९६ टीएमसी क्षमतेच्या बांधण्यात आलेल्या उरमोडी धरणात २०१० पासून पूर्णपणे पाणीसाठा होत असलातरी अद्यापही वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे २७ हजार ७५० पैकी फक्त ८ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रालाच सिंचनाचा फायदा होत आहे. सिंचन व्यवस्थेची कामे वेळेत झाली असती तर आतापर्यंत उर्वरित १८ हजारांवर हेक्टर क्षेत्रही पाण्याखाली आले असते. आता ही सर्व कामे २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.परळीजवळ कृष्णेच्या उरमोडी या उपनदीवर माती धरण बांधण्यात आले आहे. ९.९६ टीएमसी क्षमतेचे हे उरमोडी धरण असून, याला १९९३ मध्ये प्रशासकीय मान्यात मिळाली. त्यानुसार २१२ कोटी ७ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यानंतर प्रथम आणि द्वितीय सुधारित मान्यता मिळत प्रकल्प १४०० कोटींवर गेला. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांसाठी हे धरण तारणहारच ठरणारे आहे. कारण या दोन तालुक्यांतील प्रत्येकी ९ हजार ७२५ हेक्टर तर सातारा तालुक्यातील ८ हजार ३०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी ८.९० टीएमसी पाणी वापर होणार आहे. तर त्यातील २.३८ टीएमसी पाण्याचा वापर सातारा तालुक्यासाठी होईल. तसेच माण आणि खटाव तालुक्याच्या वाट्याला प्रत्येकी ३.२६ टीएमसी पाणी येते. मात्र, सध्या वितरण व्यवस्थेची कामे तिन्ही तालुक्यांत पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे सातारा तालुक्यातील ८ हजार ३०० पैकी १९०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. तर खटावमधील ६ हजार ७८५ आणि सर्वात कमी माण तालुक्यातील १७९ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळण्याची सोय झालीय.कण्हेर जोड कालवा असून, त्याचे काम पूर्ण झाले आहे. ७ ते ८ किलोमीटरमधील अस्तरीकरणाचे काम बाकी आहे. सातारा डावा कालवा ऐकून १५ किलोमीटरचा आहे. त्यातील १० किलोमीटर लांबीमधील माती आणि बांधाकम पूर्ण झालंय. उर्वरित काम बंदिस्त पाईपलाईनचे आहे. उरमोडी उजव्या कालव्याचे १ ते ३५ मधील अंदाजे १० किलोमीटर लांबीतील मुख्य कालव्याची अंशत: कामे पूर्ण झालीत. उर्वरित मुख्य कालवा आणि वितरण व्यवस्थेची कामे बंदिस्त पाईपलाईनद्वारे होणार आहेत. तर खटाव कालवा १ ते ७६ किलोमीटर राहणार आहे. त्यातील माती व बांधकामे पूर्ण झालीत. या कालव्यांतर्गत वितरण प्रणालीची कामे अजूनही प्रगतिपथावर आहेत.माण तालुक्यातच्या कालव्याची १ ते २४ किलोमीटरमधील कामे पूर्ण आहेत. मात्र, २५ ते ३१ किलोमीटरमधील कामे अजूनही प्रगतिपथावर असून, डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच उरमोडी उपसा सिंचन योजनेच्या वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथील १२ पैकी ८ पंपांची उभारणी पूर्ण झालीय. तर टप्पा क्रमांक २ कोंबडवाडीतील सर्व ९ पंपांचीही उभारणी पूर्ण झाली आहे.धरण पूर्ण झाले असलेतरी वितरण व्यवस्थेची कामे आतापर्यंत लटकली आहेत. धरणात पाणी असूनही सिंचनासाठी पूर्णपणे त्याचा वापर होताना दिसून येत नाही. २०२२ पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सिंचनासाठी पूर्ण पाणी वापरासाठी तीन वर्षांचा कालावधी जाणार हे निश्चित आहे.२३ गावे बाधित...उरमोडी धरणामुळे सातारा तालुक्यातील २३ गावे बाधित झाली आहेत. त्यातील ११ गावे पूर्ण तर उर्वरित १२ ही अंशत: बाधित झालीत. धरणामुळे बाधित लोकसंख्या ५ हजार ८७३ झाली असून, एकूण बुडीत क्षेत्र १७० हेक्टर आहे.पाणलोट क्षेत्र ११६ चौरस किलोमीटरउरमोडी नदीवर धरण असून, पाणलोट क्षेत्र ११६.८६ चौरस किलोमीटर आहे. धरणाची लांबी १८०३ तर उंची ५०.१० मीटर आहे. धरणाला चार वक्र दरवाजे असून, ते १२ बाय ८ मीटर आकाराचे आहेत.