शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

धोम धरणाचे पाणीआज पाटात सुटणार

By admin | Updated: November 21, 2015 00:21 IST

पाट फोडणाऱ्यांवर राहणार प्रशासनाचे लक्ष

सातारा : रब्बी हंगामासाठी धोम धरणातून शनिवार, दि. २१ पासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालवे फोडून पाणी पळवले जाऊ शकते, ही शक्यता गृहित धरून आवश्यकता वाटल्यास पोलीस बंदोबस्त मागविण्याचे नियोजन धोम पाटबंधारे विभागाने केले आहे.ऐन रब्बी पिकांच्या बहरात कालव्यातून पाणीच न सोडल्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा पिके करपू लागली आहेत. तर ऊस पिकावरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. तसेच या कालव्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अनेक ठिकाणी मुख्य पाटासह, पोटपाटाची पडझड झाल्यामुळे पाणी वाया जात आहे. तर कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठून मोठी झुडपे वाढली आहेत. धोम धरणाची घटत असलेली पाणीपातळी जिल्ह्यात चिंतेचा विषय ठरली आहे. ३८२.३२ घनमीटर इतकी क्षमता असलेल्या या धरणात सध्या १९२.८६ दशलक्ष घनमीटर इतकी पाणीपातळी आहे. त्यातील १४१.५९ घनमीटर इतके पाणी उपयुक्त आहे. गत पावसाळ्यात धोम परिसरात अत्यल्प पाऊस झाला असल्याने हे धरण भरू शकलेले नाही. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने धोम धरणाची पाणीपातळी घटली. आता रब्बी पिकांना पाणी देण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचा राखीव साठा धरणात ठेवण्याची कसरत धोम पाटबंधारे विभागाला करावी लागत आहे. धोम उजवा व डावा कालव्यातून जावळी, वाई, कोरेगाव या तालुक्यांमध्ये शनिवारपासून पाणी सोडले जाणार आहे. दि. २१ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या ३५ दिवसांच्या कालावधीचे एक आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. धोमवर असलेल्या बलकवडी धरणातून सध्या धोम धरणामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोडल्यामुळे रब्बी हंगामासाठी धोम उजवा व डाव्या कालव्यात पाणी सोडणे शक्य झालेले आहे. धोमचे पाणी सुटणार असल्याने पाण्याची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या पाण्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, त्याचबरोबर कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांच्या पाणी योजनांनाही दिलासा मिळालेला आहे. पाटाच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या विहिरी व बोअरचे पाणीही वाढते, हा अनुभव असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी) प्रशासनाच्या उपाययोजनारब्बी हंगामाला पाणी मिळण्यासाठी ३१ डिसेंबर मुदतनवीन ऊस लागणीसाठी मंजुरी नाहीमंजूर पिकांव्यतिरिक्त पीक केल्यास त्यांचे पंचनामेअनधिकृत पाणी वापर करणाऱ्या शेतकऱ्यांवर सिंचन अधिनियम १९७६ नुसार होणार कारवाईधरणांतील सध्याचा पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर)धोम : १९२.८६ (५०.४४ टक्के)कण्हेर : १९८.३० (६९.३४ टक्के)येरळवाडी : १०.१८ धोम-बलकवडी : ७०.९९ (६०.२८ टक्के)उरमोडी : २४८.१७ (८७.९५ टक्के)तारळी : १२४.५९ (७५.१६ टक्के)