शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

धोम धरणाचे पाणीआज पाटात सुटणार

By admin | Updated: November 21, 2015 00:21 IST

पाट फोडणाऱ्यांवर राहणार प्रशासनाचे लक्ष

सातारा : रब्बी हंगामासाठी धोम धरणातून शनिवार, दि. २१ पासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालवे फोडून पाणी पळवले जाऊ शकते, ही शक्यता गृहित धरून आवश्यकता वाटल्यास पोलीस बंदोबस्त मागविण्याचे नियोजन धोम पाटबंधारे विभागाने केले आहे.ऐन रब्बी पिकांच्या बहरात कालव्यातून पाणीच न सोडल्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा पिके करपू लागली आहेत. तर ऊस पिकावरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. तसेच या कालव्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अनेक ठिकाणी मुख्य पाटासह, पोटपाटाची पडझड झाल्यामुळे पाणी वाया जात आहे. तर कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठून मोठी झुडपे वाढली आहेत. धोम धरणाची घटत असलेली पाणीपातळी जिल्ह्यात चिंतेचा विषय ठरली आहे. ३८२.३२ घनमीटर इतकी क्षमता असलेल्या या धरणात सध्या १९२.८६ दशलक्ष घनमीटर इतकी पाणीपातळी आहे. त्यातील १४१.५९ घनमीटर इतके पाणी उपयुक्त आहे. गत पावसाळ्यात धोम परिसरात अत्यल्प पाऊस झाला असल्याने हे धरण भरू शकलेले नाही. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने धोम धरणाची पाणीपातळी घटली. आता रब्बी पिकांना पाणी देण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचा राखीव साठा धरणात ठेवण्याची कसरत धोम पाटबंधारे विभागाला करावी लागत आहे. धोम उजवा व डावा कालव्यातून जावळी, वाई, कोरेगाव या तालुक्यांमध्ये शनिवारपासून पाणी सोडले जाणार आहे. दि. २१ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या ३५ दिवसांच्या कालावधीचे एक आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. धोमवर असलेल्या बलकवडी धरणातून सध्या धोम धरणामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोडल्यामुळे रब्बी हंगामासाठी धोम उजवा व डाव्या कालव्यात पाणी सोडणे शक्य झालेले आहे. धोमचे पाणी सुटणार असल्याने पाण्याची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या पाण्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, त्याचबरोबर कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांच्या पाणी योजनांनाही दिलासा मिळालेला आहे. पाटाच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या विहिरी व बोअरचे पाणीही वाढते, हा अनुभव असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी) प्रशासनाच्या उपाययोजनारब्बी हंगामाला पाणी मिळण्यासाठी ३१ डिसेंबर मुदतनवीन ऊस लागणीसाठी मंजुरी नाहीमंजूर पिकांव्यतिरिक्त पीक केल्यास त्यांचे पंचनामेअनधिकृत पाणी वापर करणाऱ्या शेतकऱ्यांवर सिंचन अधिनियम १९७६ नुसार होणार कारवाईधरणांतील सध्याचा पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर)धोम : १९२.८६ (५०.४४ टक्के)कण्हेर : १९८.३० (६९.३४ टक्के)येरळवाडी : १०.१८ धोम-बलकवडी : ७०.९९ (६०.२८ टक्के)उरमोडी : २४८.१७ (८७.९५ टक्के)तारळी : १२४.५९ (७५.१६ टक्के)