शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

धोम धरणाचे पाणीआज पाटात सुटणार

By admin | Updated: November 21, 2015 00:21 IST

पाट फोडणाऱ्यांवर राहणार प्रशासनाचे लक्ष

सातारा : रब्बी हंगामासाठी धोम धरणातून शनिवार, दि. २१ पासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालवे फोडून पाणी पळवले जाऊ शकते, ही शक्यता गृहित धरून आवश्यकता वाटल्यास पोलीस बंदोबस्त मागविण्याचे नियोजन धोम पाटबंधारे विभागाने केले आहे.ऐन रब्बी पिकांच्या बहरात कालव्यातून पाणीच न सोडल्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा पिके करपू लागली आहेत. तर ऊस पिकावरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. तसेच या कालव्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अनेक ठिकाणी मुख्य पाटासह, पोटपाटाची पडझड झाल्यामुळे पाणी वाया जात आहे. तर कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठून मोठी झुडपे वाढली आहेत. धोम धरणाची घटत असलेली पाणीपातळी जिल्ह्यात चिंतेचा विषय ठरली आहे. ३८२.३२ घनमीटर इतकी क्षमता असलेल्या या धरणात सध्या १९२.८६ दशलक्ष घनमीटर इतकी पाणीपातळी आहे. त्यातील १४१.५९ घनमीटर इतके पाणी उपयुक्त आहे. गत पावसाळ्यात धोम परिसरात अत्यल्प पाऊस झाला असल्याने हे धरण भरू शकलेले नाही. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने धोम धरणाची पाणीपातळी घटली. आता रब्बी पिकांना पाणी देण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचा राखीव साठा धरणात ठेवण्याची कसरत धोम पाटबंधारे विभागाला करावी लागत आहे. धोम उजवा व डावा कालव्यातून जावळी, वाई, कोरेगाव या तालुक्यांमध्ये शनिवारपासून पाणी सोडले जाणार आहे. दि. २१ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या ३५ दिवसांच्या कालावधीचे एक आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. धोमवर असलेल्या बलकवडी धरणातून सध्या धोम धरणामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोडल्यामुळे रब्बी हंगामासाठी धोम उजवा व डाव्या कालव्यात पाणी सोडणे शक्य झालेले आहे. धोमचे पाणी सुटणार असल्याने पाण्याची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या पाण्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, त्याचबरोबर कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांच्या पाणी योजनांनाही दिलासा मिळालेला आहे. पाटाच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या विहिरी व बोअरचे पाणीही वाढते, हा अनुभव असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी) प्रशासनाच्या उपाययोजनारब्बी हंगामाला पाणी मिळण्यासाठी ३१ डिसेंबर मुदतनवीन ऊस लागणीसाठी मंजुरी नाहीमंजूर पिकांव्यतिरिक्त पीक केल्यास त्यांचे पंचनामेअनधिकृत पाणी वापर करणाऱ्या शेतकऱ्यांवर सिंचन अधिनियम १९७६ नुसार होणार कारवाईधरणांतील सध्याचा पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर)धोम : १९२.८६ (५०.४४ टक्के)कण्हेर : १९८.३० (६९.३४ टक्के)येरळवाडी : १०.१८ धोम-बलकवडी : ७०.९९ (६०.२८ टक्के)उरमोडी : २४८.१७ (८७.९५ टक्के)तारळी : १२४.५९ (७५.१६ टक्के)