शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून जलसंधारण;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:37 IST

ज्या तालुक्यात दोन-चार वर्षांतून दुष्काळ पडायचा. माणसांना आणि जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. टँकरवर अवलंबून रहावे लागे. जिल्ह्यातील ...

ज्या तालुक्यात दोन-चार वर्षांतून दुष्काळ पडायचा. माणसांना आणि जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. टँकरवर अवलंबून रहावे लागे. जिल्ह्यातील अशा माण, खटाव, कोरेगाव तालुक्यातील गावांना पाण्याची श्रीमंती कळली. त्यातूनच जलसंधारण आणि लोकसहभागातून वॉटर कप स्पर्धा घेतली. माळरानावर टिकावाचे घाव घातले अन् कोट्यवधीची कामे केली. त्यानंतर निसर्गानेही साथ दिली. वाहून जाणारे पाणी अडले. त्यामुळे दुष्काळी अनेक गावांतून टँकर हद्दपार झाला. लोकवर्गणीतून झालेला हा कायापालट गावांना पाणीदार करून गेला अन् जलश्रीमंती आली.

जिल्ह्यातील पूर्व भाग दुष्काळी. वार्षिक पर्जन्यमान ३०० ते ४०० मिलिमीटर, तरीही दरवर्षी एवढा पाऊस पडेलच, असे नाही. त्यामुळे डिसेंबर उजाडताच गावागावातून टँकरची मागणी व्हायची. वर्षानुवर्षे हे चित्र चालत आलेले. पण, हे बदलण्याचे लोकांनी ठरवले. त्यासाठी ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ पूरक ठरली तर दुसरीकडे जलसंधारणाचे कामही महत्त्वपूर्ण ठरले.

२०१६पासून सलग चार वर्षे वॉटर कप स्पर्धा माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात सुरू झाली. उन्हाळ्यात ही स्पर्धा सुरू व्हायची अन् उन्हाळ्यातच संपायची. या स्पर्धेसाठी सकाळी-सकाळी गाव माळरानावर जायचे अन् ओसाड माळरानावर टिकावाचे घाव घालायचे. यामध्ये ज्येष्ठ सहभागी होत. तसेच पुरुषांबरोबर महिला आणि तरुणही हिरिरीने सहभागी व्हायचे. मग काय कामाला गती यायची. उन्हाळ्यात घाम गाळत डोंगरात एवढे कामही सुलभ होत असे. त्यातच गावांनी लोकवर्गणी काढली. मुंबई, पुणे तसेच इतर भागातील चाकरमानीही यात सहभागी व्हायचे. कधी यंत्रांनी कामे केली जायची. यातून सीसीटी, डीपसीसीटी, गाबियान बंधारे, नालाबांध दुरुस्ती, तलाव बांधणे, गाळ काढणे अशी कामे झाली. बघता-बघता चार वर्षांत कोट्यवधींचे काम झाले. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांतील जवळपास १९० गावांमध्ये हे काम उभे राहिले.

जलसंधारणाचे काम झाल्यानंतर सलग दोन वर्षे दुष्काळी तालुक्यात निसर्गानेही साथ दिली. उच्चांकी पाऊस झाला. त्यामुळे वाहून जाणारे पाणी अडले. जमिनीत मुरले. मग, काय ग्रामस्थांच्या कष्टाला फळ आले. जी गावे उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करायची. घागरभर पाण्यासाठी टँकरची वाट बघत, तिथे आज मुबलक प्रमाणात पाणी आहे. केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर शेतीसाठीही पाणी उपलब्ध झाले. माळरानावरही कलिंगड, डाळिंब येऊ लागले. त्यातून अर्थकारण सुधारले. ही सर्व किमया पाण्याने केली. यात ग्रामस्थांचे कष्टही महत्त्वपूर्ण ठरले हे ही तितकेच खरे !

चौकट :

अजूनही कोठेही टँकर नाही...

दुष्काळी तालुक्यात पूर्वी झरे, आड, विहिरीतील पाण्यावर लोकांची तहान भागायची. कालांतराने पाणी योजना राबविण्यात आल्या. पण, उन्हाळ्यात बहुतांशी योजना पाणी नसल्याने बंद पडायच्या. मग काय टँकर सुरू व्हायचा. तरीही दोन-दोन दिवस टँकर यायचा नाही. माणसाबरोबरच जनावरांनाही हाल सोसावे लागत असत. पण, जलसंधारण आणि वॉटर कपमुळे ही परिस्थिती सुधारली. आजही दुष्काळी तालुक्यात कोठेही टँकर सुरू नाही. पाण्याची उपलब्धता झाली. गावांनीच आपल्या संकटावर मात केली तसेच जलसमृद्धता आणली. त्यामुळे पाण्याचा प्रश्न खऱ्याअर्थाने निकालात निघाला आहे.

फोटो मेल...

20satara watar photo...

.........................................................................