शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून जलसंधारण;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:37 IST

ज्या तालुक्यात दोन-चार वर्षांतून दुष्काळ पडायचा. माणसांना आणि जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. टँकरवर अवलंबून रहावे लागे. जिल्ह्यातील ...

ज्या तालुक्यात दोन-चार वर्षांतून दुष्काळ पडायचा. माणसांना आणि जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. टँकरवर अवलंबून रहावे लागे. जिल्ह्यातील अशा माण, खटाव, कोरेगाव तालुक्यातील गावांना पाण्याची श्रीमंती कळली. त्यातूनच जलसंधारण आणि लोकसहभागातून वॉटर कप स्पर्धा घेतली. माळरानावर टिकावाचे घाव घातले अन् कोट्यवधीची कामे केली. त्यानंतर निसर्गानेही साथ दिली. वाहून जाणारे पाणी अडले. त्यामुळे दुष्काळी अनेक गावांतून टँकर हद्दपार झाला. लोकवर्गणीतून झालेला हा कायापालट गावांना पाणीदार करून गेला अन् जलश्रीमंती आली.

जिल्ह्यातील पूर्व भाग दुष्काळी. वार्षिक पर्जन्यमान ३०० ते ४०० मिलिमीटर, तरीही दरवर्षी एवढा पाऊस पडेलच, असे नाही. त्यामुळे डिसेंबर उजाडताच गावागावातून टँकरची मागणी व्हायची. वर्षानुवर्षे हे चित्र चालत आलेले. पण, हे बदलण्याचे लोकांनी ठरवले. त्यासाठी ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ पूरक ठरली तर दुसरीकडे जलसंधारणाचे कामही महत्त्वपूर्ण ठरले.

२०१६पासून सलग चार वर्षे वॉटर कप स्पर्धा माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात सुरू झाली. उन्हाळ्यात ही स्पर्धा सुरू व्हायची अन् उन्हाळ्यातच संपायची. या स्पर्धेसाठी सकाळी-सकाळी गाव माळरानावर जायचे अन् ओसाड माळरानावर टिकावाचे घाव घालायचे. यामध्ये ज्येष्ठ सहभागी होत. तसेच पुरुषांबरोबर महिला आणि तरुणही हिरिरीने सहभागी व्हायचे. मग काय कामाला गती यायची. उन्हाळ्यात घाम गाळत डोंगरात एवढे कामही सुलभ होत असे. त्यातच गावांनी लोकवर्गणी काढली. मुंबई, पुणे तसेच इतर भागातील चाकरमानीही यात सहभागी व्हायचे. कधी यंत्रांनी कामे केली जायची. यातून सीसीटी, डीपसीसीटी, गाबियान बंधारे, नालाबांध दुरुस्ती, तलाव बांधणे, गाळ काढणे अशी कामे झाली. बघता-बघता चार वर्षांत कोट्यवधींचे काम झाले. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांतील जवळपास १९० गावांमध्ये हे काम उभे राहिले.

जलसंधारणाचे काम झाल्यानंतर सलग दोन वर्षे दुष्काळी तालुक्यात निसर्गानेही साथ दिली. उच्चांकी पाऊस झाला. त्यामुळे वाहून जाणारे पाणी अडले. जमिनीत मुरले. मग, काय ग्रामस्थांच्या कष्टाला फळ आले. जी गावे उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करायची. घागरभर पाण्यासाठी टँकरची वाट बघत, तिथे आज मुबलक प्रमाणात पाणी आहे. केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर शेतीसाठीही पाणी उपलब्ध झाले. माळरानावरही कलिंगड, डाळिंब येऊ लागले. त्यातून अर्थकारण सुधारले. ही सर्व किमया पाण्याने केली. यात ग्रामस्थांचे कष्टही महत्त्वपूर्ण ठरले हे ही तितकेच खरे !

चौकट :

अजूनही कोठेही टँकर नाही...

दुष्काळी तालुक्यात पूर्वी झरे, आड, विहिरीतील पाण्यावर लोकांची तहान भागायची. कालांतराने पाणी योजना राबविण्यात आल्या. पण, उन्हाळ्यात बहुतांशी योजना पाणी नसल्याने बंद पडायच्या. मग काय टँकर सुरू व्हायचा. तरीही दोन-दोन दिवस टँकर यायचा नाही. माणसाबरोबरच जनावरांनाही हाल सोसावे लागत असत. पण, जलसंधारण आणि वॉटर कपमुळे ही परिस्थिती सुधारली. आजही दुष्काळी तालुक्यात कोठेही टँकर सुरू नाही. पाण्याची उपलब्धता झाली. गावांनीच आपल्या संकटावर मात केली तसेच जलसमृद्धता आणली. त्यामुळे पाण्याचा प्रश्न खऱ्याअर्थाने निकालात निघाला आहे.

फोटो मेल...

20satara watar photo...

.........................................................................