शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
3
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
4
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
5
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
6
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
7
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
8
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
9
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
10
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
11
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
12
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
13
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
14
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
15
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
16
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
17
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
18
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
19
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
20
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो

सेवाभावी संस्थांना जलसंवर्धनाचा ध्यास

By admin | Updated: May 25, 2016 23:25 IST

भूजलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न : पसरणी घाटात श्रमदानातून ठिकठिकाणी बांधले बंधारे - लोकमत जलमित्र अभियान

वाई : सध्या राज्यात पडलेला भीषण दुष्काळ व त्याची वाढत चाललेली भीषणता लक्षात घेऊन ‘लोकमत’ने जलसाक्षरतेबाबत सुरू केलेल्या जलमित्र अभियानास सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जमिनीत पाणी असेल तर ते लोकांना पिता येईल, यासाठी वाईतील काही संस्थांनी पाणी अडवा, पाणी जिरवा, हा उपक्रम हाती घेतला आहे.पाणी संवर्धन करणे ही काळाची गरज व ते प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात वाईतील सेवाभावी संस्थांनी ‘आपले पाणी आपल्या रानी’ या उपक्रमांतर्गत ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे काम हाती घेऊन संपूर्ण घाटात नैसर्गिक जलस्रोत असणाऱ्या ठिकाणी दगडी बंधारे बांधले आहेत. या माध्यमातून पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये पतंजली योग समिती, सुयश प्रतिष्ठान, समूह संस्था, भगवा कट्टा प्रतिष्ठान या संस्थांनी पुढाकार घेतला. त्याला वाईतील इतर संघटना व स्थानिक ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. सेवाभावी संघटनेने जवळपास पंधरा ते वीस बंधारे तयार केले आहेत. त्यामध्ये पावसाळ्यात पाणी साठल्यास दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे.वाई भागात पावसाचे प्रमाण इतर तालुक्याच्या मानाने चांगले असते. परंतु यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याचे दुर्भिक्ष या भागातही जाणवत होते. पसरणी घाटात मार्च, एप्रिलमध्येच पाणीटंचाई जाणविल्याने संपूर्ण घाटात याच संस्थांच्या माध्यमातून पशुपक्ष्यांना पाण्याची भांडी बांधण्यात आली होती. शासनाच्या मदतीशिवाय पाणी टंचाईवर उपाय म्हणून सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. शासनाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविल्यास त्याचा परिणाम लवकर जाणवेल. त्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे.बंधारा बांधण्यासाठी मकरंद शेंडे, रामदास राऊत, विठ्ठल माने, भैय्या सकुंडे, धनंजय मलटणे, प्रकाश वाडकर, म्हलारी पेटकर, सचिन नवघणे, धनंजय घोडके, सुभाष यादव, यशवंत डेरे, दिलीप डोंबवलीकर, दिलीप कदम, मंदार जठार, शांताराम अंबिके, सुनंदा कट्टे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)श्रमदानाचा संकल्प दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली असून याचे निवारण करण्यासाठी शासकीय पातळीवर व्यापक नियोजनाबरोबर लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. म्हणून वाईतील सेवाभावी संस्थांच्या वतीने विविध गावांमध्ये प्रत्येक रविवारी ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदान करण्याचा संकल्प केला आहे.