शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेवाभावी संस्थांना जलसंवर्धनाचा ध्यास

By admin | Updated: May 25, 2016 23:25 IST

भूजलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न : पसरणी घाटात श्रमदानातून ठिकठिकाणी बांधले बंधारे - लोकमत जलमित्र अभियान

वाई : सध्या राज्यात पडलेला भीषण दुष्काळ व त्याची वाढत चाललेली भीषणता लक्षात घेऊन ‘लोकमत’ने जलसाक्षरतेबाबत सुरू केलेल्या जलमित्र अभियानास सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जमिनीत पाणी असेल तर ते लोकांना पिता येईल, यासाठी वाईतील काही संस्थांनी पाणी अडवा, पाणी जिरवा, हा उपक्रम हाती घेतला आहे.पाणी संवर्धन करणे ही काळाची गरज व ते प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात वाईतील सेवाभावी संस्थांनी ‘आपले पाणी आपल्या रानी’ या उपक्रमांतर्गत ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे काम हाती घेऊन संपूर्ण घाटात नैसर्गिक जलस्रोत असणाऱ्या ठिकाणी दगडी बंधारे बांधले आहेत. या माध्यमातून पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये पतंजली योग समिती, सुयश प्रतिष्ठान, समूह संस्था, भगवा कट्टा प्रतिष्ठान या संस्थांनी पुढाकार घेतला. त्याला वाईतील इतर संघटना व स्थानिक ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. सेवाभावी संघटनेने जवळपास पंधरा ते वीस बंधारे तयार केले आहेत. त्यामध्ये पावसाळ्यात पाणी साठल्यास दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे.वाई भागात पावसाचे प्रमाण इतर तालुक्याच्या मानाने चांगले असते. परंतु यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याचे दुर्भिक्ष या भागातही जाणवत होते. पसरणी घाटात मार्च, एप्रिलमध्येच पाणीटंचाई जाणविल्याने संपूर्ण घाटात याच संस्थांच्या माध्यमातून पशुपक्ष्यांना पाण्याची भांडी बांधण्यात आली होती. शासनाच्या मदतीशिवाय पाणी टंचाईवर उपाय म्हणून सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. शासनाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविल्यास त्याचा परिणाम लवकर जाणवेल. त्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे.बंधारा बांधण्यासाठी मकरंद शेंडे, रामदास राऊत, विठ्ठल माने, भैय्या सकुंडे, धनंजय मलटणे, प्रकाश वाडकर, म्हलारी पेटकर, सचिन नवघणे, धनंजय घोडके, सुभाष यादव, यशवंत डेरे, दिलीप डोंबवलीकर, दिलीप कदम, मंदार जठार, शांताराम अंबिके, सुनंदा कट्टे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)श्रमदानाचा संकल्प दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली असून याचे निवारण करण्यासाठी शासकीय पातळीवर व्यापक नियोजनाबरोबर लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. म्हणून वाईतील सेवाभावी संस्थांच्या वतीने विविध गावांमध्ये प्रत्येक रविवारी ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदान करण्याचा संकल्प केला आहे.