शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पाणी आटले अन् जुने धरण दिसले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:26 IST

खंडाळा : सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वीर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे ब्रिटिशांनी बांधलेले जुने धरण दिसू लागले ...

खंडाळा : सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वीर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे ब्रिटिशांनी बांधलेले जुने धरण दिसू लागले आहे. गेले अनेक वर्षे धरणाच्या पाण्यात राहूनही जुने धरण आजही चांगल्या स्थितीत आहे. सात वर्षांनतर पुन्हा वर आलेल्या हे जुने धरण पाहण्यासाठी नागरिक या ठिकणी गर्दी करत आहेत.वीर धरणाची निर्मिती १९२० ते १९२७ मध्ये करण्यात आली होती. याच दरम्यानच्या काळात भाटघर धरण बांधण्यात आले. १९१३ मध्ये भाटघर धरण बांधण्यास सुरुवात करण्यात आली. १९२८ मध्ये हे धरण पूर्ण करण्यात आले. वीर धरणाची क्षमता कमी असल्याने या धरणावर नवीन वीर धरण बांधण्याची संकल्पना पुढे आली. नवीन वीर धरणाचे बांधकाम १९६२ मध्ये सुरू करण्यात आले. १९६४ मध्ये हे धरण पूर्ण झाले. १९६७ मध्ये या धरणातून कालव्याद्वारे पहिले आवर्तन सोडण्यात आले. या धरणाच्या बांधकाम विषयावर परिसरातील अनेक जुन्या, ज्येष्ठ नागरिकांनी मजुरी केली असल्याचे सांगतात.नीरा नदीवर १९९६ मध्ये नीरा-देवघर धरण बांधण्यास सुरुवात करून २००७ मध्ये देवघर धरण पूर्ण करण्यात आले.१९६२ मध्ये या धरणावर नवीन वीर धरण बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. १९६४ मध्ये हे धरण पूर्ण करून १९६७ रोजी धरणातून पहिले आवर्तन कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. यावर्षी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने जुन्या धरणाचे अवशेष पाहायला मिळत आहेत. सुमारे ९२ वर्षांपूर्वीचे हे बांधकाम आजही जसेच्या तसे असल्याने ब्रिटिशकालीन बांधकामाची गुणवत्ता लक्षात येत आहे.ब्रिटिशकालीन अवशेष आजही सुस्थितीतजुने वीर धरण पाहताना पाणी अडविण्यासाठी धरणाचा घालण्यात आलेला बांध, धरणाचे दरवाजे, जुने जॅकवेल, जुने पॉवर हाऊस, धरणाचा डावा व उजवा कालव्याद्वारे करण्यात येणारी पाण्याची वितरण व्यवस्था, धरणावर व कालव्यावर जाण्यासाठीचे साकव पूल, कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा व्यवस्था आदी ब्रिटिशकालीन धरणाचे अवशेष आजही सुस्थितीत आहेत.