शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

दुष्काळी माणची वाटचाल टंचाईमुक्तीकडे...

By admin | Updated: December 28, 2015 00:58 IST

शिवारे झाली जलयुक्त : शासकीय योजनांचा लाभ घेऊन श्रमदानातून होतोय कायापालट--पाणीटंचाई : भाग चार

नवनाथ जगदाळे-दहिवडी  -कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा माण तालुका टंचाईमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. तालुक्याला संजीवनी ठरणाऱ्या उरमोडी, जिहे-कटापूर योजना पूर्णत्वाकडे जात आहेत. उरमोडी योजना नव्वद टक्के पूर्ण आहे तर जिहे-कटापूरसाठीही निधी उपलब्ध झाला असल्याने या योजना पूर्णत्वास जातील अशी अपेक्षा आहे.माण तालुक्यातील मोजकी गावे सोडली तर १०६ पैकी ९० गावांना दुष्काळात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पाणलोटच्या माध्यमातून माणला १३० कोटींचा निधी दिला. एकात्मिक पाणलोट विकासाच्या माध्यमातून १०६ पैकी ५१ गावांची निवड केली, तर उर्वरित ३१ गावे नव्याने समाविष्ट केली. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून व लोकसहभागातून तब्बल ११ कोटी ५० लाखांची कामे झाली. आतापर्यंत लहानमोठे ३०० ते ३२५ बंधारे तयार झाले. पाच ते साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर नाला बांध आणि दोनशे ते अडीचशे हेक्टर क्षेत्रावर खोलीकरण समानचर काढले. २५ ठिकाणी कृषी विभागाच्या आणि लोकसहभागातून ३६ बंधारे आता प्रस्तावित आहेत. नव्यानेच १८ बंधाऱ्यांसाठी ५ कोटी ५३ लाख मंजूर झाले आहेत. ४५ ठिकाणी रुंदीकरण व खोलीकरण, ५४ ठिकाणी तलाव, ओढे या ठिकाणचा गाळ काढण्यामुळे यावर्षाच्या सपूर्ण कामाचा विचार करता तीन हजार ते ३२०० टीसीएम एवढा पाणीसाठा करण्यात यश आले आहे.यावर्षी डाळिंबाव्यतिरिक्त आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. त्यामुळे फळबाग व भाजीपाल्याचे क्षेत्र २५०० हेक्टरवर गेले आहे, तर जवळपास २२०० हेक्टर ठिबक सिंचन करण्यात यश आले आहे. तालुक्यात शेततळीही मोठ्या प्रमाणात असून, शासनाच्या धोरणानुसार मागेल त्याला शेततळे उपलब्ध होणार आहे. पावसाळ्यानंतर माणमध्ये वेगळे चित्र दिसणार असले तरी सध्याची परिस्थिती तेवढीच भयानक आहे. तालुक्यात दरवर्षी सरासरी ४६५ मि. मी. पाऊस पडतो. यंदा २२३ मि. मी.च पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्वच १०६ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आहे. संपूर्ण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागणाऱ्या मार्डी आणि बिदाल येथील शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत.