शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी माणची वाटचाल टंचाईमुक्तीकडे...

By admin | Updated: December 28, 2015 00:58 IST

शिवारे झाली जलयुक्त : शासकीय योजनांचा लाभ घेऊन श्रमदानातून होतोय कायापालट--पाणीटंचाई : भाग चार

नवनाथ जगदाळे-दहिवडी  -कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा माण तालुका टंचाईमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. तालुक्याला संजीवनी ठरणाऱ्या उरमोडी, जिहे-कटापूर योजना पूर्णत्वाकडे जात आहेत. उरमोडी योजना नव्वद टक्के पूर्ण आहे तर जिहे-कटापूरसाठीही निधी उपलब्ध झाला असल्याने या योजना पूर्णत्वास जातील अशी अपेक्षा आहे.माण तालुक्यातील मोजकी गावे सोडली तर १०६ पैकी ९० गावांना दुष्काळात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पाणलोटच्या माध्यमातून माणला १३० कोटींचा निधी दिला. एकात्मिक पाणलोट विकासाच्या माध्यमातून १०६ पैकी ५१ गावांची निवड केली, तर उर्वरित ३१ गावे नव्याने समाविष्ट केली. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून व लोकसहभागातून तब्बल ११ कोटी ५० लाखांची कामे झाली. आतापर्यंत लहानमोठे ३०० ते ३२५ बंधारे तयार झाले. पाच ते साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर नाला बांध आणि दोनशे ते अडीचशे हेक्टर क्षेत्रावर खोलीकरण समानचर काढले. २५ ठिकाणी कृषी विभागाच्या आणि लोकसहभागातून ३६ बंधारे आता प्रस्तावित आहेत. नव्यानेच १८ बंधाऱ्यांसाठी ५ कोटी ५३ लाख मंजूर झाले आहेत. ४५ ठिकाणी रुंदीकरण व खोलीकरण, ५४ ठिकाणी तलाव, ओढे या ठिकाणचा गाळ काढण्यामुळे यावर्षाच्या सपूर्ण कामाचा विचार करता तीन हजार ते ३२०० टीसीएम एवढा पाणीसाठा करण्यात यश आले आहे.यावर्षी डाळिंबाव्यतिरिक्त आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. त्यामुळे फळबाग व भाजीपाल्याचे क्षेत्र २५०० हेक्टरवर गेले आहे, तर जवळपास २२०० हेक्टर ठिबक सिंचन करण्यात यश आले आहे. तालुक्यात शेततळीही मोठ्या प्रमाणात असून, शासनाच्या धोरणानुसार मागेल त्याला शेततळे उपलब्ध होणार आहे. पावसाळ्यानंतर माणमध्ये वेगळे चित्र दिसणार असले तरी सध्याची परिस्थिती तेवढीच भयानक आहे. तालुक्यात दरवर्षी सरासरी ४६५ मि. मी. पाऊस पडतो. यंदा २२३ मि. मी.च पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्वच १०६ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आहे. संपूर्ण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागणाऱ्या मार्डी आणि बिदाल येथील शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत.