शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक जाळीवरून कचरा ओढ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

संरक्षक जाळीवरून कचरा ओढ्यात सातारा : शहरातील नैसर्गिक ओढे व नाल्यांमध्ये कचरा साचू नये यासाठी सातारा पालिकेकडून ओढ्यांच्या दुतर्फा ...

संरक्षक जाळीवरून

कचरा ओढ्यात

सातारा : शहरातील नैसर्गिक ओढे व नाल्यांमध्ये कचरा साचू नये यासाठी सातारा पालिकेकडून ओढ्यांच्या दुतर्फा संरक्षक लोखंडी जाळी बसविण्यात आली आहेत. तरीही अनेक नागरिक तसेच वाहनधारक येता-जाता जाळीवरून कचरा टाकत असतात. घंटागाडी दारात येऊनही नागरिकांची ही वर्तणूक शहर स्वच्छतेला मारक ठरत आहे. ओढ्यात कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

उकाडा वाढल्याने

नागरिक हैराण

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, नागरिकांमधून फळे व शीतपेयांना मागणी वाढू लागली आहे. हवामान विभागाने गुरुवारी साताऱ्याचे कमाल तापमान ३७, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरातही उन्हाचे चटके आता जाणवू लागले आहेत.

भाजीपाल्याची

जादा दराने विक्री

सातारा : संचारबंदीमुळे सर्व अत्यावश्यक सेवा घरपोहोच उपलब्ध करण्याचे आदेश प्रशासनाने किराणा दुकानदार व भाजी विक्रेत्यांना दिले आहेत. भाजी विक्रेत्यांकडून घरपोहोच सेवा पुरविली जात असली तरी अनेक विक्रेते चढ्या भावाने भाजीपाल्याची विक्री करीत आहे. एकीकडे संचार बंदीमुळे रोजगार थांबले असताना दुसरीकडे भाजीपाल्याची अधिक दराने विक्री सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. विक्रेत्यांनी ग्राहकांची ही पिळवणूक थांबवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

सदर बझारमध्ये

सांडपाणी उघड्यावर

सातारा : सर्वाधिक दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या सदर बाजार झोपडपट्टी परिसरात सांडपाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पालिकेकडून येथील गटारे बंदिस्त न केल्याने सांडपाणी उघड्यावरूनच वाहत आहे. याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील गंभीर बनू लागला आहे. पालिकेने सांडपाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

कारवाई करूनही

वाहनधारक निर्धास्त

वाई : जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे नियम कठोर करतानाच अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर न पडण्याचे आवाहन नागरिक तसेच वाहनधारकांना केले आहे. तरीदेखील वाहनधारकांकडून शासन नियमांची सातत्याने पायमल्ली केली जात आहे. अनेक दुचाकी चालक शहरात फेरफटका मारताना दिसून येत आहेत. पालिका व पोलीस प्रशासनाकडून कारवाई करूनही वाहनधारक निर्धास्त आहेत. त्यामुळे पोलीस दलाला निर्धास्त वाहनधारकांवर अंकुश लावण्यासाठी आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.