शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संरक्षक जाळीवरून कचरा ओढ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

संरक्षक जाळीवरून कचरा ओढ्यात सातारा : शहरातील नैसर्गिक ओढे व नाल्यांमध्ये कचरा साचू नये यासाठी सातारा पालिकेकडून ओढ्यांच्या दुतर्फा ...

संरक्षक जाळीवरून

कचरा ओढ्यात

सातारा : शहरातील नैसर्गिक ओढे व नाल्यांमध्ये कचरा साचू नये यासाठी सातारा पालिकेकडून ओढ्यांच्या दुतर्फा संरक्षक लोखंडी जाळी बसविण्यात आली आहेत. तरीही अनेक नागरिक तसेच वाहनधारक येता-जाता जाळीवरून कचरा टाकत असतात. घंटागाडी दारात येऊनही नागरिकांची ही वर्तणूक शहर स्वच्छतेला मारक ठरत आहे. ओढ्यात कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

उकाडा वाढल्याने

नागरिक हैराण

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, नागरिकांमधून फळे व शीतपेयांना मागणी वाढू लागली आहे. हवामान विभागाने गुरुवारी साताऱ्याचे कमाल तापमान ३७, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरातही उन्हाचे चटके आता जाणवू लागले आहेत.

भाजीपाल्याची

जादा दराने विक्री

सातारा : संचारबंदीमुळे सर्व अत्यावश्यक सेवा घरपोहोच उपलब्ध करण्याचे आदेश प्रशासनाने किराणा दुकानदार व भाजी विक्रेत्यांना दिले आहेत. भाजी विक्रेत्यांकडून घरपोहोच सेवा पुरविली जात असली तरी अनेक विक्रेते चढ्या भावाने भाजीपाल्याची विक्री करीत आहे. एकीकडे संचार बंदीमुळे रोजगार थांबले असताना दुसरीकडे भाजीपाल्याची अधिक दराने विक्री सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. विक्रेत्यांनी ग्राहकांची ही पिळवणूक थांबवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

सदर बझारमध्ये

सांडपाणी उघड्यावर

सातारा : सर्वाधिक दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या सदर बाजार झोपडपट्टी परिसरात सांडपाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पालिकेकडून येथील गटारे बंदिस्त न केल्याने सांडपाणी उघड्यावरूनच वाहत आहे. याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील गंभीर बनू लागला आहे. पालिकेने सांडपाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

कारवाई करूनही

वाहनधारक निर्धास्त

वाई : जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे नियम कठोर करतानाच अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर न पडण्याचे आवाहन नागरिक तसेच वाहनधारकांना केले आहे. तरीदेखील वाहनधारकांकडून शासन नियमांची सातत्याने पायमल्ली केली जात आहे. अनेक दुचाकी चालक शहरात फेरफटका मारताना दिसून येत आहेत. पालिका व पोलीस प्रशासनाकडून कारवाई करूनही वाहनधारक निर्धास्त आहेत. त्यामुळे पोलीस दलाला निर्धास्त वाहनधारकांवर अंकुश लावण्यासाठी आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.