शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

संरक्षक जाळीवरून कचरा ओढ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

संरक्षक जाळीवरून कचरा ओढ्यात सातारा : शहरातील नैसर्गिक ओढे व नाल्यांमध्ये कचरा साचू नये यासाठी सातारा पालिकेकडून ओढ्यांच्या दुतर्फा ...

संरक्षक जाळीवरून

कचरा ओढ्यात

सातारा : शहरातील नैसर्गिक ओढे व नाल्यांमध्ये कचरा साचू नये यासाठी सातारा पालिकेकडून ओढ्यांच्या दुतर्फा संरक्षक लोखंडी जाळी बसविण्यात आली आहेत. तरीही अनेक नागरिक तसेच वाहनधारक येता-जाता जाळीवरून कचरा टाकत असतात. घंटागाडी दारात येऊनही नागरिकांची ही वर्तणूक शहर स्वच्छतेला मारक ठरत आहे. ओढ्यात कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

उकाडा वाढल्याने

नागरिक हैराण

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, नागरिकांमधून फळे व शीतपेयांना मागणी वाढू लागली आहे. हवामान विभागाने गुरुवारी साताऱ्याचे कमाल तापमान ३७, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरातही उन्हाचे चटके आता जाणवू लागले आहेत.

भाजीपाल्याची

जादा दराने विक्री

सातारा : संचारबंदीमुळे सर्व अत्यावश्यक सेवा घरपोहोच उपलब्ध करण्याचे आदेश प्रशासनाने किराणा दुकानदार व भाजी विक्रेत्यांना दिले आहेत. भाजी विक्रेत्यांकडून घरपोहोच सेवा पुरविली जात असली तरी अनेक विक्रेते चढ्या भावाने भाजीपाल्याची विक्री करीत आहे. एकीकडे संचार बंदीमुळे रोजगार थांबले असताना दुसरीकडे भाजीपाल्याची अधिक दराने विक्री सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. विक्रेत्यांनी ग्राहकांची ही पिळवणूक थांबवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

सदर बझारमध्ये

सांडपाणी उघड्यावर

सातारा : सर्वाधिक दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या सदर बाजार झोपडपट्टी परिसरात सांडपाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पालिकेकडून येथील गटारे बंदिस्त न केल्याने सांडपाणी उघड्यावरूनच वाहत आहे. याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील गंभीर बनू लागला आहे. पालिकेने सांडपाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

कारवाई करूनही

वाहनधारक निर्धास्त

वाई : जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे नियम कठोर करतानाच अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर न पडण्याचे आवाहन नागरिक तसेच वाहनधारकांना केले आहे. तरीदेखील वाहनधारकांकडून शासन नियमांची सातत्याने पायमल्ली केली जात आहे. अनेक दुचाकी चालक शहरात फेरफटका मारताना दिसून येत आहेत. पालिका व पोलीस प्रशासनाकडून कारवाई करूनही वाहनधारक निर्धास्त आहेत. त्यामुळे पोलीस दलाला निर्धास्त वाहनधारकांवर अंकुश लावण्यासाठी आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.