शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कोरेगाव तालुक्यातील रेवडी-परतवडीला जोडणार वसना पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 13:18 IST

कोरेगाव तालुक्यातील परतवडी व भक्तवडी या दोन गावांना जोडणाऱ्या वसना नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा पूल ठिकठिकाणी खचला असून पुलावरील डांबरही निघाले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

ठळक मुद्देवसना नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था, अस्तित्व धोक्यात सिमेंट पाईपला तडे; रस्त्यातही खड्डे वाहनधारक करतात जीव मुठीत घेऊन प्रवास

वाठार स्टेशन , दि. २१ : कोरेगाव तालुक्यातील परतवडी व भक्तवडी या दोन गावांना जोडणाऱ्या वसना नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा पूल ठिकठिकाणी खचला असून पुलावरील डांबरही निघाले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

रेवडी गावामधून परतवडी व भक्तवडी या दोन गावांमध्ये जाण्यासाठी १९८० साली वसना नदीवर पूल उभारण्यात आला. सिमेंटच्या पाईपचा वापर करुन साधारण २०० ते २५० फूट लांबीचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आला.

हा पूल गेल्या दोन वर्षांपासून खचू लागला आहे. तसेच अवजड वहानांमुळे अनेक ठिकाणी सिमेंटच्या पाईपला तडे गेले असून पुलावरील संपूर्ण डांबरी भाग निघुन गेला आहे. मोठ-मोठे खड्डे पडल्याने या पुलावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

उंची कमी असल्याने हा पुल कोणत्याही क्षणी पाण्यात जाऊ शकतो. पुलाची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन बांधकाम विभागाने तत्काळ या पुलाची दुरस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ तसेच वाहनधारकांमधून होत आहे.

रेवडी गावातून परतवडी-भक्तवडी या गावांना जोडणारा वसना नदीवरील पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुलाची तातडीने दुरूस्ती न केल्यास दोन गावांचा संपर्क तुटणार आहे- नरसिंग दिसले,ग्रामस्थ परतवडी

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाriverनदी