शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपताच वांग-मराठवाडीत ठणठणाट!

By admin | Updated: September 10, 2016 00:39 IST

दरवाजे उघडे ठेवल्याचा परिणाम : धरणात अत्यल्प पाणीसाठा; उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची भीती

सणबूर : पाटण तालुक्यातील वांग-मराठवाडी धरणाचे गेट खुले ठेवल्याने धरणातील पाणी थेट नदी पात्रामध्ये निघून गेले असून, धरणातील पाणी पातळीने तळ गाठला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने परतीच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे चित्र असून, लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून चिंतेचे वातावरण आहे. वांग-मराठवाडी धरण प्रकल्पाची अवस्था ‘आंदळ दळतंय आणी कुत्रं पिठ खातंय,’ अशीच दिसत आहे. १८ वर्षांपासून या धरणाचा वनवास अजूनही संपलेला नाही. कधी निधीचा तुटवडा कधी धरणग्रस्तांची आंदोलने यामध्ये धरणाचे काम आजही अपूर्णच आहे. चार-चार वर्षांपासून धरण व्यवस्थापनाने थोडा फार पाणी साठा करण्यास सुरुवात केल्याने याचा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना झाला आहे. गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा संपूर्ण राज्याला सोसाव्या लागल्या होत्या. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील अनेक गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अशावेळी धरणातून वाहणाऱ्या वांग नदी काठच्या गावांना धरणाच्या पाण्याचा मोठा फायदा झाला होता. चालूवर्षी पाऊस समाधानकारक पडला असला तरी गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, दुसरीकडे विभागातील वांग-मराठवाडी धरण पावसाळ्यातच कोरडे पडत चालले आहे. धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला असून, धरणातील पाण्याची नासाडी सुरू आहे. कृष्णा खोरे विभाग गांधारीची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी दुष्काळाचा सामना करत असताना रेल्वेने व टँकरने पाणीपुरवठा करून दुष्काळग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये पाण्यावर व चारा छावण्यांवर खर्च करत होते. दुसरीकडे शासन पाणी अडवण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रम राबवत आहे. मात्र वांग-मराठवाडी धरणाच्या पाण्याची अक्षरश: नासाडी सुरू आहे. याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. सध्या वांग-मराठवाडी जलाशयाने तळ गाठला असून, धरणात अती अल्प पाणीसाठा दिसून येत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर विभागातील जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. (प्रतिनिधी)‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ला अक्षता....शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार सुरू असून, शासनाने या सर्व बाबींचा विचार करायला हवा. वांग-मराठवाडी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन व्हायला हवे. अन्यथा ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा लाभ क्षेत्रातील जनतेला सोसाव्या लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. पावसाळा संपताच धरणातील पाण्याने तळ गाठला असून ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.वांग-मराठवाडी धरणातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असून, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. हे त्वरित थांबले पाहिजे नाहीतर गतवर्षीपेक्षा मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. - हिंदुराव पाटील, प्रांतिक प्रतिनिधी काँग्रेसदुष्काळी गावांना टँकरने व रेल्वेने पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र, येथे धरणातील पाण्याची नियोजनाअभावी नासाडी सुरू असून, संबंधित विभागने याचा गांभीर्याने विचार करावा.- जगन्नाथ विभुते, धरणग्रस्त प्रतिनिधी