शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पावसाळा संपताच वांग-मराठवाडीत ठणठणाट!

By admin | Updated: September 10, 2016 00:39 IST

दरवाजे उघडे ठेवल्याचा परिणाम : धरणात अत्यल्प पाणीसाठा; उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची भीती

सणबूर : पाटण तालुक्यातील वांग-मराठवाडी धरणाचे गेट खुले ठेवल्याने धरणातील पाणी थेट नदी पात्रामध्ये निघून गेले असून, धरणातील पाणी पातळीने तळ गाठला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने परतीच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे चित्र असून, लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून चिंतेचे वातावरण आहे. वांग-मराठवाडी धरण प्रकल्पाची अवस्था ‘आंदळ दळतंय आणी कुत्रं पिठ खातंय,’ अशीच दिसत आहे. १८ वर्षांपासून या धरणाचा वनवास अजूनही संपलेला नाही. कधी निधीचा तुटवडा कधी धरणग्रस्तांची आंदोलने यामध्ये धरणाचे काम आजही अपूर्णच आहे. चार-चार वर्षांपासून धरण व्यवस्थापनाने थोडा फार पाणी साठा करण्यास सुरुवात केल्याने याचा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना झाला आहे. गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा संपूर्ण राज्याला सोसाव्या लागल्या होत्या. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील अनेक गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अशावेळी धरणातून वाहणाऱ्या वांग नदी काठच्या गावांना धरणाच्या पाण्याचा मोठा फायदा झाला होता. चालूवर्षी पाऊस समाधानकारक पडला असला तरी गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, दुसरीकडे विभागातील वांग-मराठवाडी धरण पावसाळ्यातच कोरडे पडत चालले आहे. धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला असून, धरणातील पाण्याची नासाडी सुरू आहे. कृष्णा खोरे विभाग गांधारीची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी दुष्काळाचा सामना करत असताना रेल्वेने व टँकरने पाणीपुरवठा करून दुष्काळग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये पाण्यावर व चारा छावण्यांवर खर्च करत होते. दुसरीकडे शासन पाणी अडवण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रम राबवत आहे. मात्र वांग-मराठवाडी धरणाच्या पाण्याची अक्षरश: नासाडी सुरू आहे. याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. सध्या वांग-मराठवाडी जलाशयाने तळ गाठला असून, धरणात अती अल्प पाणीसाठा दिसून येत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर विभागातील जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. (प्रतिनिधी)‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ला अक्षता....शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार सुरू असून, शासनाने या सर्व बाबींचा विचार करायला हवा. वांग-मराठवाडी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन व्हायला हवे. अन्यथा ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा लाभ क्षेत्रातील जनतेला सोसाव्या लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. पावसाळा संपताच धरणातील पाण्याने तळ गाठला असून ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.वांग-मराठवाडी धरणातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असून, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. हे त्वरित थांबले पाहिजे नाहीतर गतवर्षीपेक्षा मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. - हिंदुराव पाटील, प्रांतिक प्रतिनिधी काँग्रेसदुष्काळी गावांना टँकरने व रेल्वेने पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र, येथे धरणातील पाण्याची नियोजनाअभावी नासाडी सुरू असून, संबंधित विभागने याचा गांभीर्याने विचार करावा.- जगन्नाथ विभुते, धरणग्रस्त प्रतिनिधी