शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

वाई-पाचगणी घाट... काय त्याची बिकट वाट!

By admin | Updated: August 4, 2015 23:15 IST

दरडी कोसळण्याची चिन्हे : प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

वाई : निसर्गाची देणगी लाभलेल्या पाचगणी-महाबळेश्वर या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक वाई-पाचगणी या अत्यंत नागमोडी वळणे तीव्र चढ-उताराच्या घाटातून जात असतात. पावसाळ्यात या घाटात अनेकवेळा दरडी कोसळून रस्ता बंद होऊन प्रवाशांचे शिक्षणासाठी येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होतात. आजही अनेक ठिकाणी डोंगर कपाऱ्यातील दरडी कोसळून अपघात व अडचणी निर्माण होण्याची परिस्थिती असून शासनाने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून पाचगणी-महाबळेश्वरला ओळखले जाते येथील निसर्ग सौंदर्य उंच उंच पर्वत थंड हवामान यामुळे येथे जगभरातून हजारो पर्यटक येत असतात. त्यांच जाण्या-येण्याचा मुख्य रस्ता हा पाचगणी हा घाट असून हा अत्यंत नागमोडी वळणे तीव्र चढ-उताराचा आहे. रस्ता रुंदीकरणाच्या वेळी मोठ-मोठ्या मशिनरी, दगड फोडण्याचे स्फोटके याचा वापर केल्याने अनेक कडे-कपारींना तडे गेले आहेत. त्यावर ऊन-वारा व हवामान याचा परिणाम होऊन पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी सुटण्याचे प्रकार घडले आहेत. पायाखालची भर खचल्याने अनेक मोठमोठे महाकाय दगडही कोसळले आहेत. त्यामुळे अनेकवेळा अपघाताची व अडचणीची परिस्थिती निर्माण होते. यापुढेही अशी परिस्थिती घडण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत. यास्तव मोठा निधी उभारुन सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)