शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

वाई नगर परिषदेची फरते पथक मोहीम यशस्वी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:14 IST

वाई : कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी व वाई शहरातील बाजारपेठेत तसेच मुख्य ठिकाणी कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांची ...

वाई : कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी व वाई शहरातील बाजारपेठेत तसेच मुख्य ठिकाणी कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांची जागेवरच कोरोना फिरत्या पथकाद्वारे कोरोना तपासणी केली जात आहे. पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी केली जाते.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या निर्देशांनुसार शहरातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. यामध्ये अत्यावश्यक बाबींची तसेच इतरही दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी आहे. याबाबतची नियमावलीदेखील जाहीर करण्यात आलेली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या सर्वांसाठीच वाई नगर परिषद, पोलीस व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे मोहीम सुरू करण्यात आली होती. संपूर्ण महिन्यात रॅट आणि आरटीपीसीआर मिळून एकूण २ हजार सहाशेच्या वर टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २६ जणांचे अहवाल

पॉझिटिव्ह आढळले आहेत.

या मोहिमेंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्केटमधील कोरोना प्रसार टाळण्यासाठी नगर परिषदेकडून जागेवरच कोरोना चाचणी करण्यात येत आहे व चाचणी करून पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना थेट कोविड केअर सेंटर येथे पाठवण्यात येत आहे. त्यामुळे सुपर स्प्रेडर्सकडून होणारा कोरोनाचा प्रसार वेळीच रोखण्यात प्रशासनाला मदत होत आहे. ही मोहीम राबविताना प्रामुख्याने ज्या प्रभागामध्ये सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे, अशा प्रभागामध्ये प्राधान्याने चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे वेळीच कोरोनाबाधित रुग्णांना योग्य तो औषधोपचार मिळाल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास अटकाव होत आहे. वाई नगर परिषदेच्या फिरते पथक या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या घटण्यास मोठी मदत झालेली आहे. फिरते पथक या मोहिमेला शहरातील नागरिकांचा प्रतिसाद लाभला असून, यापुढेही वाई शहरात ही मोहीम अशीच चालू राहणार आहे.

(कोट..)

शहरात कोणत्याही कारणाने

येणाऱ्या नागरिकांनी तसेच खेडोपाड्यातील लोकांनी कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनीच सर्वतोपरी प्रयत्न

करणे आवश्यक आहे. त्यामुळे मार्केट उघडले असले तरी कोरोनाविषयक नियमांच्या पालनात कोणताही हलगर्जीपणा करू नये.

-विद्यादेवी पोळ, मुख्याधिकारी